शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

राष्ट्रीय महामार्ग पुन्हा अतिक्रमणाच्या विळख्यात

By admin | Updated: October 26, 2014 23:39 IST

सोमनाथ खताळ , बीड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाला सध्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. या अतिक्रमणामुळे महामार्ग अरूंद झाला असून वाहतूक कोंडी होत आहे.

सोमनाथ खताळ , बीडशहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाला सध्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. या अतिक्रमणामुळे महामार्ग अरूंद झाला असून वाहतूक कोंडी होत आहे. महिनाभरापूर्वीच हे अतिक्रमणे हटविण्यात आले होते, मात्र पालिकेने केलेल्या हा कारवाईचा बार फुसकाच ठरल्याचे दिसून येत आहे. अतिक्रमणधारकांनी नगर पालिका, पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नाकावर टिच्चून शहरात अतिक्रमणे केले आहेत. यामुळे अपघातासही निमंत्रण मिळत आहे.बीड शहरातून सोलापूर-धुळे हा राष्ट्रीय महामार्ग जातो. येथून दररोज हजारो वाहनांची वाहतूक असते. यामध्ये अवजड वाहनांसह छोट्या-मोठ्या वाहनांचाही समावेश असतो. शहराला बायपास नसल्याने अवजड वाहनांची वाहतूक ही शहराच्या मध्यातूनच होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. शहरातून जाणाऱ्या अवजड वाहनांमुळे यापूर्वी अनेकांचे बळी गेलेले आहेत. एवढे प्रकार घडूनही अद्याप ही अतिक्रमणे हटलेले नाहीत. त्यामुळे यानंतरही ही अपघाताची मालिका चालूच राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हे अतिक्रमण हटवून महामार्ग मोकळा करावा, अशी मागणी वाहनधारकांसह सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे.पोलीस घेतात बघ्याची भूमिकाशहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी नेमण्यात आलेले आहेत. या पोलिसांसमोरच अतिक्रमणे केलेली असतात. हिच अतिक्रमणे वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरत असतानाही ते हटविण्यास कोणीही पुढे येत नाहीत. या ठिकाणी वाढत असलेले अतिक्रमणे पाहता पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेतात, त्यामुळे पोलिसांनीही यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.कडक कारवाईची आवश्यकताराष्ट्रीय महामार्गावरील तसेच इतर ठिकाणी जी अतिक्रमणे थाटली आहेत, अशा अतिक्रमणधारकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. या अतिक्रमणधारकांना अनेकवेळा संबंधित विभागाकडून केवळ नोटिसा पाठविल्या जातात, मात्र कडक कारवाई होत नसल्याने त्यांचे मनोधैर्य आणखीनच वाढत जाते. या अतिक्रमणांवर कायमचा हातोडा फिरवून वाहतूक कोंडी सोडविण्याची मागणीही वाहनधारकांमधून केली जात आहे.साठे चौकात होतो अधिक त्रासशहरातील मुख्य बाजारपेठ म्हणून सुभाष रोडची ओळख आहे. या मार्केटमध्ये जाण्यासाठी साठे चौकातून जावे लागते. मात्र याठिकाणी छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांनी अतिक्रमणे केल्यामुळे मोठी अडचण होते. अनेकांचे या ठिकाणी अवजड वाहनाखाली चिरडून बळीही गेलेले आहेत. या ठिकाणी वाहनधारकांना अधिक त्रास सहन करावा लागतो.अवैध वाहतूक करणारे वाहनेही करतात अडचणशहरातील अण्णा भाऊ साठे चौक, जालना रोड, बार्शी रोड, सरकारी दवाखाना परिसर, नगर रोड, शिवाजी चौक, बसस्थानक परिसर, नगर नाका या भागात मोठ्या प्रमाणात खाजगी वाहनधारक मोठ्या प्रमाणात क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी बसवून अवैध प्रवाशी वाहतूक करतात. ही वाहनेही वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण करीत आहेत. यांच्यावरही कारवाईची मागणी होत आहे. याबाबत पालिकेचे मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसिंग यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.