शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्ग पुन्हा अतिक्रमणाच्या विळख्यात

By admin | Updated: October 26, 2014 23:39 IST

सोमनाथ खताळ , बीड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाला सध्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. या अतिक्रमणामुळे महामार्ग अरूंद झाला असून वाहतूक कोंडी होत आहे.

सोमनाथ खताळ , बीडशहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाला सध्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. या अतिक्रमणामुळे महामार्ग अरूंद झाला असून वाहतूक कोंडी होत आहे. महिनाभरापूर्वीच हे अतिक्रमणे हटविण्यात आले होते, मात्र पालिकेने केलेल्या हा कारवाईचा बार फुसकाच ठरल्याचे दिसून येत आहे. अतिक्रमणधारकांनी नगर पालिका, पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नाकावर टिच्चून शहरात अतिक्रमणे केले आहेत. यामुळे अपघातासही निमंत्रण मिळत आहे.बीड शहरातून सोलापूर-धुळे हा राष्ट्रीय महामार्ग जातो. येथून दररोज हजारो वाहनांची वाहतूक असते. यामध्ये अवजड वाहनांसह छोट्या-मोठ्या वाहनांचाही समावेश असतो. शहराला बायपास नसल्याने अवजड वाहनांची वाहतूक ही शहराच्या मध्यातूनच होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. शहरातून जाणाऱ्या अवजड वाहनांमुळे यापूर्वी अनेकांचे बळी गेलेले आहेत. एवढे प्रकार घडूनही अद्याप ही अतिक्रमणे हटलेले नाहीत. त्यामुळे यानंतरही ही अपघाताची मालिका चालूच राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हे अतिक्रमण हटवून महामार्ग मोकळा करावा, अशी मागणी वाहनधारकांसह सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे.पोलीस घेतात बघ्याची भूमिकाशहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी नेमण्यात आलेले आहेत. या पोलिसांसमोरच अतिक्रमणे केलेली असतात. हिच अतिक्रमणे वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरत असतानाही ते हटविण्यास कोणीही पुढे येत नाहीत. या ठिकाणी वाढत असलेले अतिक्रमणे पाहता पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेतात, त्यामुळे पोलिसांनीही यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.कडक कारवाईची आवश्यकताराष्ट्रीय महामार्गावरील तसेच इतर ठिकाणी जी अतिक्रमणे थाटली आहेत, अशा अतिक्रमणधारकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. या अतिक्रमणधारकांना अनेकवेळा संबंधित विभागाकडून केवळ नोटिसा पाठविल्या जातात, मात्र कडक कारवाई होत नसल्याने त्यांचे मनोधैर्य आणखीनच वाढत जाते. या अतिक्रमणांवर कायमचा हातोडा फिरवून वाहतूक कोंडी सोडविण्याची मागणीही वाहनधारकांमधून केली जात आहे.साठे चौकात होतो अधिक त्रासशहरातील मुख्य बाजारपेठ म्हणून सुभाष रोडची ओळख आहे. या मार्केटमध्ये जाण्यासाठी साठे चौकातून जावे लागते. मात्र याठिकाणी छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांनी अतिक्रमणे केल्यामुळे मोठी अडचण होते. अनेकांचे या ठिकाणी अवजड वाहनाखाली चिरडून बळीही गेलेले आहेत. या ठिकाणी वाहनधारकांना अधिक त्रास सहन करावा लागतो.अवैध वाहतूक करणारे वाहनेही करतात अडचणशहरातील अण्णा भाऊ साठे चौक, जालना रोड, बार्शी रोड, सरकारी दवाखाना परिसर, नगर रोड, शिवाजी चौक, बसस्थानक परिसर, नगर नाका या भागात मोठ्या प्रमाणात खाजगी वाहनधारक मोठ्या प्रमाणात क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी बसवून अवैध प्रवाशी वाहतूक करतात. ही वाहनेही वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण करीत आहेत. यांच्यावरही कारवाईची मागणी होत आहे. याबाबत पालिकेचे मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसिंग यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.