शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
2
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
3
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
4
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
5
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
6
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
7
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
8
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
9
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
10
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
11
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
12
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
13
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
14
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
15
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
16
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
17
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
18
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
19
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
20
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी

राष्ट्रीय महामार्ग पुन्हा अतिक्रमणाच्या विळख्यात

By admin | Updated: October 26, 2014 23:39 IST

सोमनाथ खताळ , बीड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाला सध्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. या अतिक्रमणामुळे महामार्ग अरूंद झाला असून वाहतूक कोंडी होत आहे.

सोमनाथ खताळ , बीडशहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाला सध्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. या अतिक्रमणामुळे महामार्ग अरूंद झाला असून वाहतूक कोंडी होत आहे. महिनाभरापूर्वीच हे अतिक्रमणे हटविण्यात आले होते, मात्र पालिकेने केलेल्या हा कारवाईचा बार फुसकाच ठरल्याचे दिसून येत आहे. अतिक्रमणधारकांनी नगर पालिका, पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नाकावर टिच्चून शहरात अतिक्रमणे केले आहेत. यामुळे अपघातासही निमंत्रण मिळत आहे.बीड शहरातून सोलापूर-धुळे हा राष्ट्रीय महामार्ग जातो. येथून दररोज हजारो वाहनांची वाहतूक असते. यामध्ये अवजड वाहनांसह छोट्या-मोठ्या वाहनांचाही समावेश असतो. शहराला बायपास नसल्याने अवजड वाहनांची वाहतूक ही शहराच्या मध्यातूनच होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. शहरातून जाणाऱ्या अवजड वाहनांमुळे यापूर्वी अनेकांचे बळी गेलेले आहेत. एवढे प्रकार घडूनही अद्याप ही अतिक्रमणे हटलेले नाहीत. त्यामुळे यानंतरही ही अपघाताची मालिका चालूच राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हे अतिक्रमण हटवून महामार्ग मोकळा करावा, अशी मागणी वाहनधारकांसह सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे.पोलीस घेतात बघ्याची भूमिकाशहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी नेमण्यात आलेले आहेत. या पोलिसांसमोरच अतिक्रमणे केलेली असतात. हिच अतिक्रमणे वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरत असतानाही ते हटविण्यास कोणीही पुढे येत नाहीत. या ठिकाणी वाढत असलेले अतिक्रमणे पाहता पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेतात, त्यामुळे पोलिसांनीही यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.कडक कारवाईची आवश्यकताराष्ट्रीय महामार्गावरील तसेच इतर ठिकाणी जी अतिक्रमणे थाटली आहेत, अशा अतिक्रमणधारकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. या अतिक्रमणधारकांना अनेकवेळा संबंधित विभागाकडून केवळ नोटिसा पाठविल्या जातात, मात्र कडक कारवाई होत नसल्याने त्यांचे मनोधैर्य आणखीनच वाढत जाते. या अतिक्रमणांवर कायमचा हातोडा फिरवून वाहतूक कोंडी सोडविण्याची मागणीही वाहनधारकांमधून केली जात आहे.साठे चौकात होतो अधिक त्रासशहरातील मुख्य बाजारपेठ म्हणून सुभाष रोडची ओळख आहे. या मार्केटमध्ये जाण्यासाठी साठे चौकातून जावे लागते. मात्र याठिकाणी छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांनी अतिक्रमणे केल्यामुळे मोठी अडचण होते. अनेकांचे या ठिकाणी अवजड वाहनाखाली चिरडून बळीही गेलेले आहेत. या ठिकाणी वाहनधारकांना अधिक त्रास सहन करावा लागतो.अवैध वाहतूक करणारे वाहनेही करतात अडचणशहरातील अण्णा भाऊ साठे चौक, जालना रोड, बार्शी रोड, सरकारी दवाखाना परिसर, नगर रोड, शिवाजी चौक, बसस्थानक परिसर, नगर नाका या भागात मोठ्या प्रमाणात खाजगी वाहनधारक मोठ्या प्रमाणात क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी बसवून अवैध प्रवाशी वाहतूक करतात. ही वाहनेही वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण करीत आहेत. यांच्यावरही कारवाईची मागणी होत आहे. याबाबत पालिकेचे मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसिंग यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.