शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

८४ गावांत राबविणार राष्ट्रीय पेयजल योजना

By admin | Updated: May 7, 2014 00:22 IST

जालना : राष्ट्रीय पेयजल योजनेच्या ८४ कामांचे सन २०१४-१५ या आर्थिक वर्षासाठी उद्दिष्ट असून त्यापैकी २५ कामे सुरू असून एक योजना पूर्ण झाली

जालना : राष्ट्रीय पेयजल योजनेच्या ८४ कामांचे सन २०१४-१५ या आर्थिक वर्षासाठी उद्दिष्ट असून त्यापैकी २५ कामे सुरू असून एक योजना पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील सूत्रांनी दिली. जिल्ह्यात एकूण ९७१ गावे आहेत. मात्र अनेक ठिकाणी आजही कायमस्वरूपी पाणीपुरवठा नाही. किंवा काही ठिकाणी कालबाह्य झालेल्या योजना आहेत. त्यामुळे तेथे ग्रामस्थांना पिण्याचे पाणी मिळण्यास अडचण निर्माण होते. मात्र केंद्र सरकारच्या सुरूवातीची भारत निर्माण तर आता राष्ट्रीय पेयजल या नावाने राबविण्यात येत असलेल्या योजनेमुळे अनेक गावांमधील पिण्याचा कायमस्वरूपी प्रश्न मिटविण्यास हातभार लागलेला आहे. या योजनेअंतर्गत २५५ गावांमध्ये कामे राबविण्यात येणार आहेत. त्यासाठी एकूण १४१ कोटी २७ लाख ५ हजारांचा खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी ८४ कामे यावर्षी राबविण्यात येणार असून त्यासाठी ३३.७३ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. एप्रिलमध्ये २६ योजनांची कामे सुरू झाली होती. त्यापैकी एक काम पूर्ण असून अन्य प्रगतीपथावर असल्याचे सांगण्यात आले. या कामांमध्ये अंबड तालुक्यात ११, घनसावंगी ५, जालना २२, बदनापूर ७, परतूर ६, जाफराबाद ८, भोकरदन १४ तर मंठा तालुक्यात ११ कामांचा समावेश आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत पेयजल योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. (प्रतिनिधी) टप्प्याटप्प्याने पूर्ण करणार उद्दिष्ट गतवर्षी भीषण दुष्काळाच्या काळात या योजनेअंतर्गत ८३ गावांमध्ये पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाल्या होत्या. यंदा टप्प्याटप्प्याने मार्च २०१५ पर्यंत उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. याबाबत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस.एम. कदम म्हणाले की, गेल्यावर्षी दुष्काळाच्या काळात टंचाई निवारणासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबविण्यात येत असताना जिल्ह्यात पेयजल योजनेची ८३ कामे झाली. हे सांघिक प्रयत्नांमुळेच होऊ शकले. यावर्षीही दिलेले उद्दिष्ट पार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.