शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
2
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
3
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
4
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
5
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
6
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
7
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
8
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
9
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
10
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
11
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
12
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
13
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
14
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
16
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
17
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
19
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
20
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

८४ गावांत राबविणार राष्ट्रीय पेयजल योजना

By admin | Updated: May 7, 2014 00:22 IST

जालना : राष्ट्रीय पेयजल योजनेच्या ८४ कामांचे सन २०१४-१५ या आर्थिक वर्षासाठी उद्दिष्ट असून त्यापैकी २५ कामे सुरू असून एक योजना पूर्ण झाली

जालना : राष्ट्रीय पेयजल योजनेच्या ८४ कामांचे सन २०१४-१५ या आर्थिक वर्षासाठी उद्दिष्ट असून त्यापैकी २५ कामे सुरू असून एक योजना पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील सूत्रांनी दिली. जिल्ह्यात एकूण ९७१ गावे आहेत. मात्र अनेक ठिकाणी आजही कायमस्वरूपी पाणीपुरवठा नाही. किंवा काही ठिकाणी कालबाह्य झालेल्या योजना आहेत. त्यामुळे तेथे ग्रामस्थांना पिण्याचे पाणी मिळण्यास अडचण निर्माण होते. मात्र केंद्र सरकारच्या सुरूवातीची भारत निर्माण तर आता राष्ट्रीय पेयजल या नावाने राबविण्यात येत असलेल्या योजनेमुळे अनेक गावांमधील पिण्याचा कायमस्वरूपी प्रश्न मिटविण्यास हातभार लागलेला आहे. या योजनेअंतर्गत २५५ गावांमध्ये कामे राबविण्यात येणार आहेत. त्यासाठी एकूण १४१ कोटी २७ लाख ५ हजारांचा खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी ८४ कामे यावर्षी राबविण्यात येणार असून त्यासाठी ३३.७३ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. एप्रिलमध्ये २६ योजनांची कामे सुरू झाली होती. त्यापैकी एक काम पूर्ण असून अन्य प्रगतीपथावर असल्याचे सांगण्यात आले. या कामांमध्ये अंबड तालुक्यात ११, घनसावंगी ५, जालना २२, बदनापूर ७, परतूर ६, जाफराबाद ८, भोकरदन १४ तर मंठा तालुक्यात ११ कामांचा समावेश आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत पेयजल योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. (प्रतिनिधी) टप्प्याटप्प्याने पूर्ण करणार उद्दिष्ट गतवर्षी भीषण दुष्काळाच्या काळात या योजनेअंतर्गत ८३ गावांमध्ये पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाल्या होत्या. यंदा टप्प्याटप्प्याने मार्च २०१५ पर्यंत उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. याबाबत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस.एम. कदम म्हणाले की, गेल्यावर्षी दुष्काळाच्या काळात टंचाई निवारणासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबविण्यात येत असताना जिल्ह्यात पेयजल योजनेची ८३ कामे झाली. हे सांघिक प्रयत्नांमुळेच होऊ शकले. यावर्षीही दिलेले उद्दिष्ट पार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.