शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
2
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
3
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
4
₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
5
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
6
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
7
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
8
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
9
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
10
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
11
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
12
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
13
"बँकर नाही, तुम्ही DJ बना," गोल्डमॅन सॅक्सच्या सीईओंवर डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप; म्हणाले, "तुमचे अंदाज..."
14
Lunchbox Recipe: ढोबळी मिरचीची 'अशी' करा पीठ पेरून भाजी; कोरडी नाही लागणार, डब्यातही नेता येणार 
15
म्युच्युअल फंड-स्टॉक नाही! 'या' ठिकाणी पैसे गुंतवण्यासाठी लोकांचा कल वाढला, पाहा तुमच्याकडे संधी आहे का?
16
६ शिफ्टमध्ये २८ मंत्र्यांची ड्युटी...यूपी विधानसभेत २४ तासांचं ऐतिहासिक कामकाज, कारण काय?
17
Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ योजनेकडे महिलांची पाठ? ५ महिन्यांत एकही नवा अर्ज नाही! क्रेझ ओसरल्याची चर्चा
18
ट्रम्पमुळे ज्यांचे रक्त खवळतेय त्या सामान्यांना काहीच नाही; तेल कंपन्यांना २५ टक्के नफा, सरकार घेतेय ४५ टक्के टॅक्स...
19
जगाच्या नकाशावरचा 'हा' देश बनलाय भूकंपाचं केंद्र; दर तासाला जाणवतात १८ भूकंपाचे झटके!
20
३ वर्षांपूर्वी बिझनेसला सुरुवात! आता थेट गुगलला क्रोम ब्राउझर खरेदी करण्याची ऑफर; कोण आहे अरविंद श्रीनिवास?

औरंगाबादेत १६ सप्टेंबरला बँकप्रमुखांची राष्ट्रीय परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:02 IST

औरंगाबाद : प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा नवउद्योजकांना लाभ व्हावा, प्रधानमंत्री सुरक्षा योजना, जनधन योजना प्रभावी राबवावी, डिजिटल ट्रान्सफर कसे ...

औरंगाबाद : प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा नवउद्योजकांना लाभ व्हावा, प्रधानमंत्री सुरक्षा योजना, जनधन योजना प्रभावी राबवावी, डिजिटल ट्रान्सफर कसे करता येईल, यासह शेतकरी बँक कर्ज योजना या चार मुद्द्यांवर राष्ट्रीय पातळीवरील बँकप्रमुखांची बैठक १६ सप्टेंबरला औरंगाबादेतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये होत आहे. दिवसभर चालणाऱ्या या बैठकीत डीएमआयसीत गुंतवणुकीच्या संधी आणि बँकांचे सहकार्य, यावरही सादरीकरण होणार असल्याचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांंनी सांगितले.

सोमवारी डॉ. कराड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, या बैठका आजवर महानगरांत झाल्या आहेत. पहिल्यांदाच औरंगाबादमध्ये अशी बैठक होत आहे. ही शासकीय बैठक असून, यात देशातील नॅशनलाईज बँकांचे चेअरमन, कार्यकारी संचालकांना आमंत्रित केले आहे. देशाच्या अर्थ खात्याचे सचिव, अतिरिक्त सचिव, नाबार्डचे चेअरमन बैठकीला असतील. दिवसभर ही बैठक चालणार आहे.

या बैठकीचा औरंगाबादला काय फायदा होईल, यावर डॉ. कराड म्हणाले, डीएमआयसी पूर्णपणे तयार आहे. डीएमआयसीत येणाऱ्या उद्योगांना बँकांनी सहकार्य करावे, यासाठी ही बैठक आहे. शेतकऱ्यांना बँकांकडून मिळणाऱ्या वागणुकीबाबत चर्चा होईल काय, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी नाबार्डला येथे बोलावले आहे. मार्च ते जूनमध्ये बँकांचे ट्रान्सफर होतात. शेतकऱ्यांची कर्ज प्रकरणे याच काळात असतात. त्यामुळे बँक सुविधा, बदल्या याबाबत निर्णय होणारच आहेत. ४१ कोटी ७० लाख खाती देशभराच्या बँकेत असून, ८७ कोटी खातेधारक हे १८ वर्षांपुढील आहेत. तसेच प्रधानमंत्र्यांच्या नावाने ज्या योजना आहेत, त्याचे महत्त्व राष्टीयीकृत बँकांमध्ये आहे, खासगी बँकांमध्ये नाही. सामान्यांसाठी असलेल्या योजनांचा किती फायदा झाला, याची चर्चा बैठकीत होऊ शकते. त्यात मुद्रालोन, हॉकर्स योजना, शेतकरी कर्ज मुद्द्यांवर माहिती समोर येऊ शकते, असेही डॉ. कराड यांनी स्पष्ट केले.

डीएमआयसीतील गुंतवणुकीबाबत सादरीकरण

औरंगाबादच्या डीएमआयसीत उद्योग व्हावे, यासाठी बँकांच्या चेअरमनला माहिती असावी, यासाठी डीएमआयसीचे राष्ट्रीय संचालक अभिषेक चौधरी यांना बोलविले आहे. त्यांच्या उपस्थितीत डीएमआयसीत असलेल्या संधीचे सादरीकरण करता येईल. नीती आयोगाचे कार्यकारी संचालक हे देखील बैठकीत सहभागी होतील. औरंगाबादमधील उद्योजक, काही बँकर्स यांच्यात एका चर्चासत्राचे नियोजन सुरू आहे. यातून राष्ट्रीय पातळीवरील निर्णय असेल. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी चर्चा करून या बैठकीची फलनिष्पत्ती समोर आणली जाईल. युनियन बँकेचे चेअरमन, बँक ऑफ महाराष्ट्राचे चेअरमन, स्टेट बँक ऑफ इंडियाचे चेअरमन येथे येणार आहेत.