शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
6
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
7
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
8
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
9
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
10
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
11
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
12
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
13
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
14
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
15
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
16
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
17
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
18
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
19
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी

सर्वोत्कृष्ट बस सेवेबद्दल औरंगाबादला राष्ट्रीय पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:02 IST

औरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेत औरंगाबाद शहराने शुक्रवारी सर्वोत्कृष्ट शहर वाहतूक बस सेवेबद्दल ...

औरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेत औरंगाबाद शहराने शुक्रवारी सर्वोत्कृष्ट शहर वाहतूक बस सेवेबद्दल राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. अर्बन मोबिलिटी या प्रकारात औरंगाबाद स्मार्ट सिटीने प्रथम क्रमांक मिळविला. सुरत दुसऱ्या तर अहमदाबादला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

केंद्र शासनाच्या गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयातर्फे शुक्रवारी दुपारी ४.३० वाजता आभासी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. स्मार्ट सिटी मिशनच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी, सचिव दुर्गा शंकर मिश्रा, संचालक कुणालकुमार यांच्या उपस्थितीत पाच वेगवेगळ्या प्रवर्गात पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. आभासी बैठकीत औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे सहभागी झाले होते. औरंगाबाद स्मार्ट सिटीला ‘माझी स्मार्ट बस’साठी प्रथम पुरस्कार घोषित करण्यात आला. सुरत शहराला ‘डायनमिक शेड्यूलिंग ऑफ बस’साठी दुसरा तर अहमदाबाद शहराला 'ऑटोमेटेड पार्किंग सिस्टीम’साठी तृतीय पुरस्कार घोषित केला.

तीन वर्षांपासून सेवा

केंद्र शासनाने दिलेला निधी पडून असताना २०१८ मध्ये सार्वजनिक बस सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. जानेवारी २०१९ मध्ये सेनेचे तत्कालीन युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते बससेवेचा शुभारंभ करण्यात आला. १०० बसेस ३२ प्रमुख मार्गांवर नागरिकांना सेवा देत आहेत. आत्तापर्यंत ८७ लाख प्रवाशांनी बससेवेचा लाभ घेतला.

कोविडमध्ये बजावली महत्त्वाची भूमिका

मार्च २०२० मध्ये शहरात कोरोनाची पहिली लाट आलेली असताना स्मार्ट सिटी बसने अत्यंत मोलाची भूमिका बजावली. रुग्णांना ने-आण करणे. कोविड योद्ध्यांना ने-आण करण्याचे काम केले. मागील पंधरा महिन्यांत ४ लाख कि.मी. अंतर पूर्ण केले.

प्रवाशांसाठी नावीन्यपूर्ण योजना

नोव्हेंबर २०२० मध्ये बस सेवा पुन्हा सुरू करण्यात आली. ई-तिकिटिंग, स्मार्ट कार्ड, मोबाइल ॲपसह अनेक नवीन आणि आकर्षक योजनांचा समावेश करण्यात आला. भविष्यात आणखी काही नावीन्यपूर्ण योजना बस सेवेशी निगडित सुरू करण्यात येणार आहेत.

स्मार्ट सिटीचे सांघिक यश

स्मार्ट सिटीच्या संपूर्ण टीमने मागील काही वर्षांमध्ये स्वत:ला झोकून देऊन काम केले. सांघिक प्रयत्नांमुळे हे यश संपादन करता आले. पुरस्काराचे श्रेय औरंगाबाद शहरातील नागरिकांनाही तेवढेच द्यायला हवे. माझी स्मार्ट बस म्हणून त्यांनी शहर बससेवेवर प्रेम केले. बससेवेचा लाभ घेतला. प्रवाशांनी स्मार्ट बसच्या डिजिटल सेवांचा लाभ घ्यावा.

आस्तिककुमार पाण्डेय, सीईओ, स्मार्ट सिटी.