शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
7
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
8
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
9
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
10
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
11
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
12
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
13
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
14
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
15
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
16
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
17
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
18
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
19
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
20
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...

प्लास्टिक कंपनीला नारेगावात आग

By admin | Updated: July 2, 2014 01:01 IST

औरंगाबाद : नारेगाव परिसरातील गट नं. ३ मध्ये असलेल्या राजकमल एंटरप्रायजेस या प्लास्टिकचे दाणे उत्पादन करणाऱ्या कंपनीला मंगळवारी पहाटे अचानक आग लागली.

औरंगाबाद : नारेगाव परिसरातील गट नं. ३ मध्ये असलेल्या राजकमल एंटरप्रायजेस या प्लास्टिकचे दाणे उत्पादन करणाऱ्या कंपनीला मंगळवारी पहाटे अचानक आग लागली. तब्बल ५ तासांच्या अथक परिश्रमांनंतर महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. आगीमध्ये तीन वाहनांसह कंपनीचे सुमारे ७० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. यासंदर्भात अग्निशामक दलाच्या सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, प्लास्टिकच्या भंगार मालापासून दाणे उत्पादन करणारी नारेगावमध्ये राजकमल एंटरप्रायजेस ही कंपनी आहे. या कंपनीत मंगळवारी पहाटे ६ वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. सकाळी वाहत असलेल्या जोरदार वाऱ्यामुळे आग भडकली. आजूबाजूच्या कंपनीतील कामगार व व्यवस्थापनाने एमआयडीसी सिडको पोलीस व अग्निशामक दलास आगीची माहिती दिली. त्यानुसार चिकलठाणा अग्निशामक दलाचे प्रभारी एस.एम. शकील, कृष्णा होळंबे, अब्दुल अजीज, अशोक खोतकर, एम.के. झाडे, के.एस. भगत, आर.के. सुरे, के.पी. दांगडे, एस.वाय. घुगे आदी जवानांसह ४ बंब व ४ टँकर घटनास्थळी पोहोचले. कंपनी परिसरात सर्वत्र प्लास्टिकचे भंगार विखुरले असल्यामुळे चोहोबाजूंनी आग पसरली होती. त्यामुळे अग्निशामक दलाचे जवान ही आग शेजारच्या कंपनीपर्यंत पोहोचू नये म्हणून शर्थीचे प्रयत्न करीत होते. शेजारच्या कंपनीनेही स्वत:चे ६ टँकर अग्निशामक दलाच्या मदतीला दिले. आग विझविण्यासाठी जवानांना तब्बल २४ टँकर पाण्याचा मारा करावा लागला. आगीत प्लास्टिकचे भंगार, प्लायवूड, कंपनीत उत्पादित केलेले प्लास्टिकचे दाणे, मोठमोठ्या ५-६ मशिनरी, परिसरात उभा असलेला ट्रक (क्र. एमएच-०४- ९००९), छोटा हत्ती-लोडिंग रिक्षा (क्र. एमएच-४२ एसई- ६०८४) व बोलेरो (क्र. एमएच-०४ बीटी- ५६६७) जळून भस्मसात झाली. जवळपास ७० लाख रुपयांची हानी झाल्याचा दावा कंपनीचे मालक शेख नुरुलहक अब्दुल लतीफ (रा. माणिकनगर, नारेगाव) यांनी केला आहे. बांधलेला घोडा भाजलाराजकमल एंटरप्रायजेस कंपनीच्या आवारात बांधलेला घोडा आगीमध्ये भाजला. कंपनीचे मालक शेख नुरुलहक व काही कर्मचारी सकाळीच नमाज अदा करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी कंपनीच्या आवारात घोडा बांधून ठेवला होता.कंपनीच्या संरक्षक भिंतीजवळच विद्युत डीपी असून आतमध्ये लागूनच मीटरची खोली आहे. या खोलीत शॉर्टसर्किट झाले आणि आगीचा भडका उडाला. पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले. आगीचे चटके लागत असल्यामुळे घोडा सुटकेसाठी धडपडत होता; पण त्याची सुटका करण्याची हिंमत कोणीच करू शकले नाही. अग्निशामक दलाचे जवान तेथे पोहोचले तेव्हा त्यांनी सर्वप्रथम त्याची सुटका केली.