शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मागणी नसल्याने नांदूरमधमेश्वर कालव्याचे आवर्तन रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:04 IST

वैजापूर : नांदूरमधमेश्वर कालव्यातून ५ एप्रिल रोजी सोडण्यात येणारे उन्हाळी आवर्तन मागणी नसल्याने रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची ...

वैजापूर : नांदूरमधमेश्वर कालव्यातून ५ एप्रिल रोजी सोडण्यात येणारे उन्हाळी आवर्तन मागणी नसल्याने रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पिके धोक्यात येणार आहेत.

कोपरगाव, वैजापूर व गंगापूर तालुक्यातील सिंचनासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी उन्हाळी हंगामाचे पहिले पाणी आवर्तन ५ एप्रिल रोजी सोडण्याचे निश्चित झाले होते. त्यासाठी नांदूरमधमेश्वर कालवा विभागाने सिंचनासाठी शेतकऱ्यांकडून व पिण्याच्या पाण्यासाठी संबंधित यंत्रणेकडून मागणी नोंदविण्याचे आवाहन केले होते. या कालव्यावर २६ वितरिका असून, दोन शाखा कालवे आहेत. ५ एप्रिल रोजी पाणी आवर्तन प्रस्तावित करण्यात आले होते. पाणीवापर संस्थेमार्फत शाखाधिकारी यांच्याकडे संबंधितांनी पाणी मागणी करणे आवश्यक होते. पाणीवापर संस्थानिहाय शाखा कार्यालयात मागणी आवश्यक होती. तसेच गाव तलाव, पाझर तलाव व कोल्हापुरी बंधारे पाणी पिण्यासाठी भरावयाचे असल्यास संबंधित यंत्रणेकडून मागणी नोंदवावी, असे आवाहन नांदूरमधमेश्वर कालवा विभागाने केले होते. मात्र एकाही शेतकरी अथवा यंत्रणेकडून मागणी न आल्याने शासकीय नियमानुसार हे आवर्तन रद्द करण्यात आले असल्याचे कार्यकारी अभियंता अनिल निंभोरे यांनी सांगितले. आवर्तनाच्या भरवशावर उभी केलेली भुसार व बारमाही पिके करपणार आहे. नांदूरमधमेश्वर कालवा व पाणीवापर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याचे दिसून येत आहे. नांमकाचे अधिकारी पाणीवापर संस्थेच्या अधिकाऱ्यांना अधिकार देण्यास तयार नाहीत. पाणीवापर संस्था कार्यरत असताना वसुलीचे काम नांमकाचे अधिकारीच करतात. मुख्य कालवा, शेततळे, डोंगळे व इतर माध्यमातून पाणी उचलल्यास त्याची वसुली अधिकारीच करतात. त्यातही बहुतांश अधिकारी पावती न देता हातावरच वसुली करतात. कोणत्याही शेतकऱ्यांच्या शेतात कालव्याचे पाणी जात नाही. अनेक वर्षांपासूनचा हा प्रकल्प अद्यापही अपूर्णच असल्याने मागणी करूनही शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही. मागणी न करताच अनेक वर्षांपासून पाणी सोडण्यात येत असल्याने शेतकरी निश्चितपणे पाणी मिळते या भरवाशावर असतात. मात्र मागणीअभावी पाणी न सोडण्याचा निर्णय अचानक नांमकाने घेतल्याने शेतकऱ्यांची पिके करपणार असल्याने शेतकरी संतापले आहेत.

चौकट

पाणीवापर संस्था व अधिकाऱ्यांत समन्वयाचा अभाव

पाणीवापर संस्था व अधिकाऱ्यांत समन्वय नसल्याने मागणी कोणाकडे करावी, असा प्रश्न आहे. कार्यालयात न येता बाहेरगावाहून अधिकारी कामकाज करतात. शेतकऱ्यांशी उद्धटपणे वागतात. अधिकाऱ्यामुळे पिकांचे नुकसान झाल्यास आंदोलन छेडले जाईल. असा इशारा शिवसेना विभागप्रमुख व लाभार्थी रमेश सावंत यांनी दिला आहे.