शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
3
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
4
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
5
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
6
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
7
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
8
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
9
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
10
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
11
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
12
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
13
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
15
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
16
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
17
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
18
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
19
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
20
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

मागणी नसल्याने नांदूरमधमेश्वर कालव्याचे आवर्तन रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:04 IST

वैजापूर : नांदूरमधमेश्वर कालव्यातून ५ एप्रिल रोजी सोडण्यात येणारे उन्हाळी आवर्तन मागणी नसल्याने रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची ...

वैजापूर : नांदूरमधमेश्वर कालव्यातून ५ एप्रिल रोजी सोडण्यात येणारे उन्हाळी आवर्तन मागणी नसल्याने रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पिके धोक्यात येणार आहेत.

कोपरगाव, वैजापूर व गंगापूर तालुक्यातील सिंचनासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी उन्हाळी हंगामाचे पहिले पाणी आवर्तन ५ एप्रिल रोजी सोडण्याचे निश्चित झाले होते. त्यासाठी नांदूरमधमेश्वर कालवा विभागाने सिंचनासाठी शेतकऱ्यांकडून व पिण्याच्या पाण्यासाठी संबंधित यंत्रणेकडून मागणी नोंदविण्याचे आवाहन केले होते. या कालव्यावर २६ वितरिका असून, दोन शाखा कालवे आहेत. ५ एप्रिल रोजी पाणी आवर्तन प्रस्तावित करण्यात आले होते. पाणीवापर संस्थेमार्फत शाखाधिकारी यांच्याकडे संबंधितांनी पाणी मागणी करणे आवश्यक होते. पाणीवापर संस्थानिहाय शाखा कार्यालयात मागणी आवश्यक होती. तसेच गाव तलाव, पाझर तलाव व कोल्हापुरी बंधारे पाणी पिण्यासाठी भरावयाचे असल्यास संबंधित यंत्रणेकडून मागणी नोंदवावी, असे आवाहन नांदूरमधमेश्वर कालवा विभागाने केले होते. मात्र एकाही शेतकरी अथवा यंत्रणेकडून मागणी न आल्याने शासकीय नियमानुसार हे आवर्तन रद्द करण्यात आले असल्याचे कार्यकारी अभियंता अनिल निंभोरे यांनी सांगितले. आवर्तनाच्या भरवशावर उभी केलेली भुसार व बारमाही पिके करपणार आहे. नांदूरमधमेश्वर कालवा व पाणीवापर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याचे दिसून येत आहे. नांमकाचे अधिकारी पाणीवापर संस्थेच्या अधिकाऱ्यांना अधिकार देण्यास तयार नाहीत. पाणीवापर संस्था कार्यरत असताना वसुलीचे काम नांमकाचे अधिकारीच करतात. मुख्य कालवा, शेततळे, डोंगळे व इतर माध्यमातून पाणी उचलल्यास त्याची वसुली अधिकारीच करतात. त्यातही बहुतांश अधिकारी पावती न देता हातावरच वसुली करतात. कोणत्याही शेतकऱ्यांच्या शेतात कालव्याचे पाणी जात नाही. अनेक वर्षांपासूनचा हा प्रकल्प अद्यापही अपूर्णच असल्याने मागणी करूनही शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही. मागणी न करताच अनेक वर्षांपासून पाणी सोडण्यात येत असल्याने शेतकरी निश्चितपणे पाणी मिळते या भरवाशावर असतात. मात्र मागणीअभावी पाणी न सोडण्याचा निर्णय अचानक नांमकाने घेतल्याने शेतकऱ्यांची पिके करपणार असल्याने शेतकरी संतापले आहेत.

चौकट

पाणीवापर संस्था व अधिकाऱ्यांत समन्वयाचा अभाव

पाणीवापर संस्था व अधिकाऱ्यांत समन्वय नसल्याने मागणी कोणाकडे करावी, असा प्रश्न आहे. कार्यालयात न येता बाहेरगावाहून अधिकारी कामकाज करतात. शेतकऱ्यांशी उद्धटपणे वागतात. अधिकाऱ्यामुळे पिकांचे नुकसान झाल्यास आंदोलन छेडले जाईल. असा इशारा शिवसेना विभागप्रमुख व लाभार्थी रमेश सावंत यांनी दिला आहे.