शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
3
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
4
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
5
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
6
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
7
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
8
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
9
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
10
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
11
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
12
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
13
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
14
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
15
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
16
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
17
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
18
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
19
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
20
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय

मागणी नसल्याने नांदूरमधमेश्वर कालव्याचे आवर्तन रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:04 IST

वैजापूर : नांदूरमधमेश्वर कालव्यातून ५ एप्रिल रोजी सोडण्यात येणारे उन्हाळी आवर्तन मागणी नसल्याने रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची ...

वैजापूर : नांदूरमधमेश्वर कालव्यातून ५ एप्रिल रोजी सोडण्यात येणारे उन्हाळी आवर्तन मागणी नसल्याने रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पिके धोक्यात येणार आहेत.

कोपरगाव, वैजापूर व गंगापूर तालुक्यातील सिंचनासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी उन्हाळी हंगामाचे पहिले पाणी आवर्तन ५ एप्रिल रोजी सोडण्याचे निश्चित झाले होते. त्यासाठी नांदूरमधमेश्वर कालवा विभागाने सिंचनासाठी शेतकऱ्यांकडून व पिण्याच्या पाण्यासाठी संबंधित यंत्रणेकडून मागणी नोंदविण्याचे आवाहन केले होते. या कालव्यावर २६ वितरिका असून, दोन शाखा कालवे आहेत. ५ एप्रिल रोजी पाणी आवर्तन प्रस्तावित करण्यात आले होते. पाणीवापर संस्थेमार्फत शाखाधिकारी यांच्याकडे संबंधितांनी पाणी मागणी करणे आवश्यक होते. पाणीवापर संस्थानिहाय शाखा कार्यालयात मागणी आवश्यक होती. तसेच गाव तलाव, पाझर तलाव व कोल्हापुरी बंधारे पाणी पिण्यासाठी भरावयाचे असल्यास संबंधित यंत्रणेकडून मागणी नोंदवावी, असे आवाहन नांदूरमधमेश्वर कालवा विभागाने केले होते. मात्र एकाही शेतकरी अथवा यंत्रणेकडून मागणी न आल्याने शासकीय नियमानुसार हे आवर्तन रद्द करण्यात आले असल्याचे कार्यकारी अभियंता अनिल निंभोरे यांनी सांगितले. आवर्तनाच्या भरवशावर उभी केलेली भुसार व बारमाही पिके करपणार आहे. नांदूरमधमेश्वर कालवा व पाणीवापर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याचे दिसून येत आहे. नांमकाचे अधिकारी पाणीवापर संस्थेच्या अधिकाऱ्यांना अधिकार देण्यास तयार नाहीत. पाणीवापर संस्था कार्यरत असताना वसुलीचे काम नांमकाचे अधिकारीच करतात. मुख्य कालवा, शेततळे, डोंगळे व इतर माध्यमातून पाणी उचलल्यास त्याची वसुली अधिकारीच करतात. त्यातही बहुतांश अधिकारी पावती न देता हातावरच वसुली करतात. कोणत्याही शेतकऱ्यांच्या शेतात कालव्याचे पाणी जात नाही. अनेक वर्षांपासूनचा हा प्रकल्प अद्यापही अपूर्णच असल्याने मागणी करूनही शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही. मागणी न करताच अनेक वर्षांपासून पाणी सोडण्यात येत असल्याने शेतकरी निश्चितपणे पाणी मिळते या भरवाशावर असतात. मात्र मागणीअभावी पाणी न सोडण्याचा निर्णय अचानक नांमकाने घेतल्याने शेतकऱ्यांची पिके करपणार असल्याने शेतकरी संतापले आहेत.

चौकट

पाणीवापर संस्था व अधिकाऱ्यांत समन्वयाचा अभाव

पाणीवापर संस्था व अधिकाऱ्यांत समन्वय नसल्याने मागणी कोणाकडे करावी, असा प्रश्न आहे. कार्यालयात न येता बाहेरगावाहून अधिकारी कामकाज करतात. शेतकऱ्यांशी उद्धटपणे वागतात. अधिकाऱ्यामुळे पिकांचे नुकसान झाल्यास आंदोलन छेडले जाईल. असा इशारा शिवसेना विभागप्रमुख व लाभार्थी रमेश सावंत यांनी दिला आहे.