शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडकरांनो, जपून वापरा पाणी़

By admin | Updated: June 28, 2014 01:18 IST

नांदेड : विष्णूपुरी प्रकल्पात सध्या फक्त १०़ दलघमी पाणीसाठा उपलब्ध असून नांदेड शहराला जुलै अखेरपर्यंत हे पाणी पुरणार आहे़त्यात पावसाचे दोन नक्षत्र कोरडे गेल्याने परिस्थिती आणखीच चिंताजनक बनली आहे़

नांदेड : विष्णूपुरी प्रकल्पात सध्या फक्त १०़ दलघमी पाणीसाठा उपलब्ध असून नांदेड शहराला जुलै अखेरपर्यंत हे पाणी पुरणार आहे़त्यात पावसाचे दोन नक्षत्र कोरडे गेल्याने परिस्थिती आणखीच चिंताजनक बनली आहे़ त्यामुळे शहरावर पाणीकपातीची वेळ येण्याची शक्यता असून नांदेडकरांनी जपून पाणी वापरण्याची गरज आहे़मागील वर्षी १ ते १९ जून या कालावधीत जिल्ह्यात एकूण २२९०़६३ मि़ मी़ तर १४३़१६ एवढे सरासरी पर्जन्यमान झाले होते़ मात्र यंदा आजपर्यंत नांदेड जिल्ह्यात एकूण २५़३४ मि. मी़ पाऊस झाला आहे़ त्यात यंदाच्या तीव्र उन्हामुळे विष्णूपुरीतील पाण्याचेही मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन झाले़ सध्या १० दलघमी साठा असून प्रकल्पात एकूण १३़२६ टक्के साठा आहे़ हा उपलब्ध साठा जुलैअखेर पर्यंत पुरणार आहे़ त्यामुळे आतापासूनच उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे़ त्यासाठी नांदेडकरांनीही पाण्याचा अपव्यय टाळला पाहिजे़बांधकामावर पाण्याचा बेसुमार वापरबांधकामावर पाण्याचा बेसुमार वापर- शहर व परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरु आहेत़ यापूर्वी पाणीटंचाईच्या काळात बांधकामे थांबविण्याची आदेश देण्यात आले होते़ यंदाही परिस्थिती त्याहून वेगळी नाही़ त्यामुळे या बांधकाम होणारा पाण्याचा वापर थांबविण्याबाबत पावले उचलण्याची गरज आहे़२०१४-१५ ची तालुकानिहाय पेरणीची टक्केवारी अशीनांदेड ० टक्के, अर्धापूर ०.१ टक्के, मुदखेड ० टक्के, लोहा ० टक्के, कंधार ० टक्के, देगलूर ० टक्के, मुखेड ० टक्के, नायगांव ० टक्के, बिलोली ० टक्के, धर्माबाद ० टक्के, किनवट ० टक्के, माहूर ०.३ टक्के, हदगाव ० टक्के, हिमायतनगर ० टक्के, भोकर ० टक्के, उमरी ० टक्के. शुक्रवारी दिवसभर उकाडा अन पावसाचा शिडकावाशुक्रवारी शहरात दिवसभर उकाडा जाणवला़ त्यात सायंकाळच्या वेळी ढगांनी गर्दी केली होती़ पाऊसही सुरु झाला़ पण तो लगेचच थांबला़खरिपासाठी २ लाख ५४ हजार मेट्रिक टन खताची मागणीजिल्ह्यात खरीप हंगामासाठी शासनस्तरावर २ लाख ५४ हजार ६०० मेट्रिक टन खताची मागणी करण्यात आली. यापैकी २ लाख ६ हजार २०० मेट्रिक टन मंजूर झाले असून ८७२३० मे.टन तालुकास्तरावर वितरित करण्यात आले आहे. यंदा खताची टंचाई निर्माण होवू नये म्हणून कृषी विभागाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत़ सध्या तरी, पाहिजे त्या प्रमाणात मागणी नाही़कंपनीनिहाय मंजूर खत असेयुरिया ६८१०० हजार मे.टन, डीएपी ४८५०० हजार मे.टन, एमओपी १४९०० हजार टन, सुंयुक्त खते ३९७०० हजार टन, १५.१५ १०५०० टन, १०.२६.२६-९७०० व इतर असे मिळून एकूण २ लाख ६ हजार मेट्रिक टन खत मंजूर झाले आहे. पैकी एप्रिल महिन्यात आलेले २४ हजार ४२६ मेट्रिक टन, मे महिन्यात ३७३१४ टन तर जून महिन्यात २५ हजार ४९० टन व रबीतील शिल्लक १४ हजार ९ टन असे एकूण १ लाख १२३९ मे.टन खत प्राप्त झाले असून यापैकी ८७२३० टन खत विक्री झाले आहे.२०१३-१४ ची तालुकानिहाय पेरणीची टक्केवारी अशीनांदेड ९४.९६ टक्के, अर्धापूर १२६.२० टक्के, मुदखेड १२३.६५ टक्के, लोहा ७४.१९ टक्के, कंधार ९९.११ टक्के, देगलूर ७७.१९ टक्के, मुखेड ९२.२७ टक्के, नायगाव ९०.९१ टक्के, बिलोली १४६.५९ टक्के, धर्माबाद १०८.२९ टक्के, किनवट १३३.६९ टक्के, माहूर ८१.५५ टक्के, हदगाव ८३.९६ टक्के, हिमायतनगर १२८.१५ टक्के, भोकर ९३.२५ टक्के, उमरी १०८.५५ टक्के. १ लाख ८० हजार क्विंटल बियाणांची मागणीखरीप हंगामासाठी १ लाख ८० हजार क्विंटल बियाणांची मागणी करण्यात आली. यात सोयाबीन १ लाख ५७५०० क्विंटल, संकरित कापूस ७३६३ क्विंटल, सुधारित कापूस ४६५ क्विंटल, ज्वारी ५४५० क्विंटल, बाजरी १ क्विंटल, भात १७१ क्विंटल, तूर ३६०७ क्विंटल, मूग १६६५ क्विंटल, उडिद ३०२२ क्विंटल, मका १०३ क्विंटल, भुईमूग ३७, सूर्यफुल १७, तीळ ११ क्विंटल या बियाणांचा समावेश आहे. यात खाजगी कंपन्यांची १ लाख ७ हजार ७० क्विंटल तर महाबीज व अन्य कंपन्यांचे ७२३४२ क्विंटल बियाणे आहे. बळीराजाची प्रतीक्षा संपेनानांदेड : यावर्षीच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात ७ लाख ६५ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित असून २८ जूनपर्यंत २४३०० हेक्टरवर म्हणजे केवळ तीन टक्के पेरणी झाली. यात कापूस २१६०० हेक्टर, सोयाबीन ३०० हेक्टर व अन्य तूर, उडीद व मूग या पिकांचा समावेश आहे. मृग नक्षत्राच्या प्रारंभीच खत-बियाणांची खरेदी करुन ठेवली ्असली तरी अद्याप पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आहेत.गतवर्षी २०१३-१४ च्या खरीप हंगामात जिल्ह्यात ७ लाख २१ हजार ८०० हेक्टर क्षेत्र प्रास्तावित होते, यापैकी २८ जून अखेर ९६ टक्के पेरणी पूर्ण झाली होती. यात ज्वार ७१ हजार ८०० हेक्टर, तूर ५० हजार ३०० हजार हेक्टर, मूग २५ हजार हेक्टर, उडीद २८ हजार १०० हेक्टर, सोयाबीन २ लाख ३३ हजार ९०० हेक्टर, गळीत धान्य १९०० हेक्टर, कापूस २ लाख ५९ हजार २०० हेक्टर याप्रमाणे एकूण ६ लाख ७६ हजार ७०० हेक्टरवर पेरणी झाली होती. परंतु मान्सून वेळेवर दाखल न झाल्यामुळे केवळ ३ टक्के पेरणी झाली.खत-बियाणाच्या दरात यावर्षी जवळपास दीडपटीने वाढ झाल्याने बियाणे खरेदीसाठी दमछाक होत आहे. मृग नक्षत्र सुरु होऊनही महिना उलटला तरी अद्याप पावसाने हजेरी लावली नाही. परिणामी लाखो हेक्टर जमिन काळीभोर राहिली.२०१४ च्या खरीप हंगामामध्ये सोयाबीनची ३ लाख हेक्टरवर, कापूस २ लाख २५ हजार हेक्टर, ज्वारी ७९००० हेक्टर, तुर ६७००० हेक्टर, मूग ३३००० हेक्टर तर उडदाचे ३२००० हेक्टर क्षेत्रावर पेरणी अपेक्षित आहे. पीकविम्यासाठी २ दिवसांची मुदतनांदेड : खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील सर्व गावांचा हवामान आधारित पीकविमा योजनेत समावेश केला असून विमा भरण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी असून ३० जून शेवटची मुदत आहे. शेतकऱ्यांना संभाव्य पेरणीच्या आधारे विमा भरता येणार असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक एस.जी.पडवळ यांनी केले आहे. खरीप हंगामातील मूग, उडीद, सोयाबीन, कापूस या पिकांचा समावेश केलेला आहे. पीक पेरल्यापासून पीक तयार होण्याच्या कालावधीत अपुरा पाऊस, पावसात खंड, अतिवृष्टीपासून नुकसान झाल्यास विमा संरक्षण मिळणार आहे.सदर योजनमध्ये कर्जदार, बिगर कर्जदार शेतकऱ्यांना भाग घेता येणार असून विमा भरण्याची अंतिम मुदत ३० जून आहे. शेतकऱ्यांनी प्रतिहेक्टरी कापसासाठी ९५० रुपये, सोयाबीन ९२३ रुपये, उडदासाठी ७५६ तर मुगासाठी ६१२ रुपये भरावयाचे आहेत. ज्या शेतकऱ्यांनी पिकांची पेरणी केली त्यांनी पीक पेऱ्याचे प्रमाणपत्र द्यावे, पेरणी प्रमाणपत्र नसणाऱ्या शेतकऱ्यांनाही या योजनेत सहभाग घेता येणार आहे.बँकांनी पेरणी प्रमाणपत्रासाठी आडवणूक करु नये, असे अ‍ॅग्रीकल्चर इन्श्युरन्स कंपनीने सर्व बँकांना पत्र पाठवून सूचित केले आहे.(प्रतिनिधी)