शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

नांदेड-दिल्ली विमानाचा बसणार औरंगाबादला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 00:18 IST

एअर इंडिया लवकरच अमृतसर किंवा चंदीगडमार्गे नांदेड-दिल्ली ही विमानसेवा सुरूकरणार आहे. या विमानसेवेमुळे नांदेड विमानतळाचा औरंगाबादला आणखी एक फटका बसणार आहे. चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दिल्लीसाठी ये-जा करणा-या विमान प्रवाशांमध्ये घट होण्याची चिंता व्यक्त होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : एअर इंडिया लवकरच अमृतसर किंवा चंदीगडमार्गे नांदेड-दिल्ली ही विमानसेवा सुरूकरणार आहे. या विमानसेवेमुळे नांदेड विमानतळाचा औरंगाबादला आणखी एक फटका बसणार आहे. चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दिल्लीसाठी ये-जा करणा-या विमान प्रवाशांमध्ये घट होण्याची चिंता व्यक्त होत आहे.लहान विमानतळ जोडण्यासाठी केंद्र शासनाने ‘उडान’ ही योजना सुरू केली़ यामध्ये राज्यातील सहा विमानतळांची निवड करण्यात आली होती़ त्यात नांदेडचाही समावेश आहे़ या योजनेतून सुरुवातीला नांदेड-हैदराबाद ही विमानसेवा सुरू झाली़ या सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला़ नोव्हेंबरमध्ये नांदेड-मुंबई विमानसेवेला हिरवा कंदिल मिळाला़ त्यामुळे नांदेडवरून हैदराबाद आणि मुंबई जाणाºया प्रवाशांची गैरसोय दूर झाली. आता नांदेड-दिल्ली विमानसेवा सुरू होत आहे. नांदेड आणि आजूबाजूंच्या भागातील विमान प्रवाशांची सोय होत आहे; परंतु याचा थेट परिणाम औरंगाबादवर होत आहे.चिकलठाणा विमानतळावरून सध्या एअर इंडिया, जेट एअरवेज आणि ट्रूजेट कंपनीची विमानसेवा सुरू आहे. या सेवेमुळे औरंगाबाद शहर दिल्ली, मुंबई, हैदराबाद, तिरुपतीशी हवाई सेवेने जोडले आहे. यापूर्वी नांदेड-हैदराबाद विमानसेवा सुरू झाली, तसेच नांदेड-मुंबई विमानसेवाही सुरू आहे. यामुळे औरंगाबादेतील विमानसेवेला घरघर लागत आहे. विमानसेवेसाठी पूर्वी नांदेड येथील नागरिकांना औरंगाबादचा पर्याय होता; परंतु आता औरंगाबादऐवजी नांदेडवरूनच विमान उपलब्ध होत आहे. सध्या दिल्ली विमानसेवेसाठी लातूर, परभणी, नांदेड येथील प्रवाशांना औरंगाबादला यावे लागते; परंतु नांदेड येथून आगामी काही दिवसांत ही विमानसेवा सुरू होईल. त्यामुळे औरंगाबादला येण्याचा फेरा टळणार आहे; मात्र यामुळे औरंगाबादहून दिल्लीला जाणा-या प्रवाशांची संख्या कमी होण्याची भीती व्यक्त होत आहे.थोडा परिणामनांदेड-दिल्ली विमानसेवा कधीपासून सुरू होत आहे, हे अद्याप निश्चित झालेले नाही. या विमानसेवेचा थोडाफार परिणाम होऊ शकतो. नांदेडसह लातूर, परभणीहून येणारे प्रवासी नांदेडहूनच दिल्लीला जातील; परंतु औरंगाबादेतील विमानाला अधिक फरक पडणार नाही.-रमेश नंदे, स्टेशन मॅनेजर, एअर इंडिया