शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
5
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
6
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
7
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
8
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
9
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
10
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
11
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
12
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
13
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
14
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
15
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
16
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
17
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
18
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
19
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
20
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...

नांदेड-दिल्ली विमानाचा बसणार औरंगाबादला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 00:18 IST

एअर इंडिया लवकरच अमृतसर किंवा चंदीगडमार्गे नांदेड-दिल्ली ही विमानसेवा सुरूकरणार आहे. या विमानसेवेमुळे नांदेड विमानतळाचा औरंगाबादला आणखी एक फटका बसणार आहे. चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दिल्लीसाठी ये-जा करणा-या विमान प्रवाशांमध्ये घट होण्याची चिंता व्यक्त होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : एअर इंडिया लवकरच अमृतसर किंवा चंदीगडमार्गे नांदेड-दिल्ली ही विमानसेवा सुरूकरणार आहे. या विमानसेवेमुळे नांदेड विमानतळाचा औरंगाबादला आणखी एक फटका बसणार आहे. चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दिल्लीसाठी ये-जा करणा-या विमान प्रवाशांमध्ये घट होण्याची चिंता व्यक्त होत आहे.लहान विमानतळ जोडण्यासाठी केंद्र शासनाने ‘उडान’ ही योजना सुरू केली़ यामध्ये राज्यातील सहा विमानतळांची निवड करण्यात आली होती़ त्यात नांदेडचाही समावेश आहे़ या योजनेतून सुरुवातीला नांदेड-हैदराबाद ही विमानसेवा सुरू झाली़ या सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला़ नोव्हेंबरमध्ये नांदेड-मुंबई विमानसेवेला हिरवा कंदिल मिळाला़ त्यामुळे नांदेडवरून हैदराबाद आणि मुंबई जाणाºया प्रवाशांची गैरसोय दूर झाली. आता नांदेड-दिल्ली विमानसेवा सुरू होत आहे. नांदेड आणि आजूबाजूंच्या भागातील विमान प्रवाशांची सोय होत आहे; परंतु याचा थेट परिणाम औरंगाबादवर होत आहे.चिकलठाणा विमानतळावरून सध्या एअर इंडिया, जेट एअरवेज आणि ट्रूजेट कंपनीची विमानसेवा सुरू आहे. या सेवेमुळे औरंगाबाद शहर दिल्ली, मुंबई, हैदराबाद, तिरुपतीशी हवाई सेवेने जोडले आहे. यापूर्वी नांदेड-हैदराबाद विमानसेवा सुरू झाली, तसेच नांदेड-मुंबई विमानसेवाही सुरू आहे. यामुळे औरंगाबादेतील विमानसेवेला घरघर लागत आहे. विमानसेवेसाठी पूर्वी नांदेड येथील नागरिकांना औरंगाबादचा पर्याय होता; परंतु आता औरंगाबादऐवजी नांदेडवरूनच विमान उपलब्ध होत आहे. सध्या दिल्ली विमानसेवेसाठी लातूर, परभणी, नांदेड येथील प्रवाशांना औरंगाबादला यावे लागते; परंतु नांदेड येथून आगामी काही दिवसांत ही विमानसेवा सुरू होईल. त्यामुळे औरंगाबादला येण्याचा फेरा टळणार आहे; मात्र यामुळे औरंगाबादहून दिल्लीला जाणा-या प्रवाशांची संख्या कमी होण्याची भीती व्यक्त होत आहे.थोडा परिणामनांदेड-दिल्ली विमानसेवा कधीपासून सुरू होत आहे, हे अद्याप निश्चित झालेले नाही. या विमानसेवेचा थोडाफार परिणाम होऊ शकतो. नांदेडसह लातूर, परभणीहून येणारे प्रवासी नांदेडहूनच दिल्लीला जातील; परंतु औरंगाबादेतील विमानाला अधिक फरक पडणार नाही.-रमेश नंदे, स्टेशन मॅनेजर, एअर इंडिया