शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

व्यवस्थापनाविना मनपा

By admin | Updated: August 5, 2016 00:14 IST

लातूर : शहराची प्रमुख स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या महानगरपालिकेत किमान पावसाळ्यात २४ तास आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित असणे अपेक्षित आहे़

लातूर : शहराची प्रमुख स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या महानगरपालिकेत किमान पावसाळ्यात २४ तास आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित असणे अपेक्षित आहे़ मात्र लातूर मनपात असा कक्ष कार्यान्वित नाही़ गेल्या शनिवारी झालेल्या मोठ्या पावसात शहरातील अनेक नगरांतील घरामध्ये पाणी शिरले़ परंतु, मनपाला शहाणपण आले नाही़ ना आपत्ती व्यवस्थापन कक्ष ना नाले सफाई, अशी स्थिती आहे़गेल्या शनिवारी लातूर शहर व जिल्ह्यात मोठा पाऊस झाला़ नद्या, नाले, ओढे ओसंडून वाहिले़ लातूर शहरातल्या नाल्यांची साफ सफाई न केल्यामुळे पाण्याचा निचरा होवू शकला पाणी़ परिणामी, गरूड चौक, हत्ते नगर, कस्तूरे गार्डन, सिद्धेश्वर चौक, बरकत नगर आदी परिसरातील अनेकांच्या घरात पाणी शिरले़ पाच वर्षांपूर्वी असाच मोठा पाऊस झाला होता़ त्यावेळी तर शहरातील सकल भागात असलेल्या वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले होते़ दोन-चार दिवसांसाठी त्या परिसरातील नागरिकांचे तात्पुरते पुनर्वसन करावे लागले होते़ हा पूर्वानुभव असताना मनपात अद्याप आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन झालेला नाही़ अग्निशमन दल, आरोग्य विभाग आणि स्वच्छता विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची संयुक्त टीम तयार करून आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करता येवू शकतो़ मात्र मनपात असा कक्ष स्थापन झाला नाही़ अपुरे मनुष्यबळ, पैशाची कमतरता आदी कारणे सांगून, याकडे मनपा प्रशासनाचे सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे़ रात्री-बेरात्री पाऊस झाला तर नागरिकांनी कोणाशी संपर्क साधावा, अशी सद्यस्थिती आहे़ गेल्या शनिवारी झालेल्या पावसामुळे गरूड चौकात एका माजी नगरसेविकेच्या घरात पाणी शिरले़ त्यांनी मनपा प्रशासनाकडे नाले सफाईची मागणी केली, परंतु, अद्याप सफाई करण्यात आलेली नाही़ काही भागात नाल्या सफाई न केल्यामुळे तर काही भागात नाल्याच नसल्यामुळे घरात पाणी शिरत आहे़ महानगरपालिकेत आपत्ती व्यवस्थापन कक्ष नसल्यामुळे नागरिकांनी मदत कोणाकडे मागावी असा प्रश्न आहे़ सकल भागातील नाल्यांमध्ये गाळ साचला आहे़ दगड-गोट्यांचे प्रमाणही आहे़ त्याची दुरूस्ती केली जात नाही़ त्यामुळे नाल्या तुंबून पाणी घरात येत आहे़ शनिवारी झालेल्या एका मोठ्या पावसामुळे अनेक नगरांतील घरात पाणी घुसले होते़ तरीही प्रशासन थंड आहे़