शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

समृद्धीच्या बछड्यांचे नाव नागरिकांनीच ठरवावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:03 IST

औरंगाबाद : सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयातील समृद्धी वाघिणीने जन्म दिलेल्या पाचही मादी बछड्यांच्या नामकरणाची तयारी मनपाने सुरू केली आहे. प्रशासक ...

औरंगाबाद : सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयातील समृद्धी वाघिणीने जन्म दिलेल्या पाचही मादी बछड्यांच्या नामकरणाची तयारी मनपाने सुरू केली आहे. प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी शहरवासीयांना बछड्यांसाठी नावे सुचविण्याचे आवाहन केले आहे. २७ फेब्रुवारीपर्यंत नागरिकांनी सिद्धार्थ उद्यान, प्राणिसंग्रहालयात बछड्यांसाठीची नावे आपल्या मोबाइल क्रमांक व पत्त्यासह पाठवावीत, असे आवाहन केले आहे.

समृद्धी वाघिणीने २५ डिसेंबर २०२० रोजी ५ बछड्यांना जन्म दिला. सध्या या बछड्यांसह वाघिणीची तब्येत चांगली आहे. बछड्यांचा सहा आठवड्यांचा अतिदक्षतेचा कालावधी पूर्ण झाला असून, त्यांचे वजनदेखील आता वाढत आहे. बछड्यांनी डोळेही उघडले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी बछड्यांची तपासणी केली. पाचही बछडे मादी आहेत. तीन महिन्यांचे होईपर्यंत या बछड्यांना पिंजऱ्यात ठेवले जाणार आहे. यापूर्वी समृद्धीच्या चार बछड्यांच्या नामकरणासाठी नागरिकांना नावे सुचविण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार शहरवासीयांनी सुचविलेल्या नावांच्या चिठ्ठ्या काढून त्या चार बछड्यांचे ८ जून २०१९ रोजी कुश, अर्पिता, देविका, प्रगती असे नामकरण करण्यात आले. आता या पाच बछड्यांचा नामकरण सोहळा लवकरच आयोजित केला जाणार आहे. २७ फेब्रुवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत शहरवासीयांनी आपली नावे मोबाइल क्रमांक व पत्त्यासह पालिकेच्या सिद्धार्थ उद्यान व पाणिसंग्रहालयात जमा करावीत, असे पालिकेने कळविले आहे.