शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
2
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
3
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
4
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
5
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
6
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
9
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
10
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
11
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
12
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
13
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
14
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
15
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
16
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
17
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
18
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
19
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
20
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो

नाळवंडीच्या महिला सरपंचाचे प्रेत आढळले विहिरीत

By admin | Updated: January 29, 2015 01:15 IST

डोंगरकिन्ही : पाटोदा तालुक्यातील नाळवंडी येथील महिला सरपंच कविता सुभाष डोके (वय ४४) यांचे प्रेत बुधवारी गावाजळील विहिरीत आढळले. त्या रविवारपासून बेपत्ता होत्या

डोंगरकिन्ही : पाटोदा तालुक्यातील नाळवंडी येथील महिला सरपंच कविता सुभाष डोके (वय ४४) यांचे प्रेत बुधवारी गावाजळील विहिरीत आढळले. त्या रविवारपासून बेपत्ता होत्या. त्यांचे प्रेत आढळल्याने तालुका हादरून गेला आहे. त्यांच्या मृत्यूबद्दल उलटसुलट चर्चा असून रात्री उशिरापर्यंत पोलिसांना कुठलेच धागेदोरे मिळाले नव्हते. शेती हेच उपजिविकेचे त्यांचे साधन होते. त्यांच्याकडे गुरे आहेत. कधी पती, कधी मुलगा कधी सून तर कधी त्या स्वत: गुरे चारण्यासाठी जात. प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी त्या जनावरे चारण्यासाठी गावाजवळील शेतात गेल्या होत्या. मात्र, सायंकाळी त्या परतल्याच नाहीत़ त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा रात्रभर शोध घेतला़ निराश होऊन नातेवाईकांनी अंमळनेर ठाणे गाठून बेपत्ताची नोंद केली होती. त्यानंतर पोलिसांनीही शोध मोहीम राबविली; परंतु त्या मिळून आल्या नाहीत. नाळवंडी शिवारातीलच एका विहिरीत बुधवारी सायंकाळी सहा वाजता एका महिलेचे प्रेत पाण्यावर तरंगताना आढळले. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. हे प्रेत दुसऱ्या, तिसऱ्या कोणाचे नाही तर सरपंच कविता डोके यांचेच असल्याचे तपासात पुढे आले. दरम्यान, या विहिरीत उतरून दोन दिवसांपूर्वी तपासणी केली होती; पण काहीच मागमूस लागला नव्हता. बुधवारी याच विहिरीत त्यांचे प्रेत आढळले.पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेतला. पाटोदा ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करुन प्रेत नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. त्यांच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे. बुधवारी गावातील चुली पेटल्या नाहीत. त्यांच्यामागे पती, मुलगा, सून असा परिवार आहे. (वार्ताहर)कविता डोके या सामाजिक कार्यात अग्रेसर होत्या़ गावाच्या विकासाची त्यांना सतत तळमळ होती. त्यांनी गेल्या काही महिन्यांपूर्वी गावातील अवैध धंदे बंद पाडले होते़ त्यामुळे गाव व्यसनमुक्त झाले होते. रस्ते, नळयोजना, पथदिवे, पांदणमुक्तीसाठी त्यांचा पाठपुरावा सुरु होता. बचत गटांमधून त्यांनी महिलांना स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न केला होता.जानेवारी २०१३ मध्ये कविता डोके नाळवंडीच्या सरपंच झाल्या. त्यांचे शिक्षण आठवीपर्यंत झाले होते. ४प्रजासत्ताक दिनी त्यांनी ‘बेटी बढाओ, बेटी पढाओ’ यासह बचतटांच्या महिलांसाठी ग्रामसभा बोलावली होती. ४प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येलाच त्या बेपत्ता झाल्या. त्यामुळे ग्रामसेवकांच्या हस्तेच ध्वजारोहण झाले. ग्रामसभाही झाली नाही.