शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

नाळवंडीच्या महिला सरपंचाचे प्रेत आढळले विहिरीत

By admin | Updated: January 29, 2015 01:15 IST

डोंगरकिन्ही : पाटोदा तालुक्यातील नाळवंडी येथील महिला सरपंच कविता सुभाष डोके (वय ४४) यांचे प्रेत बुधवारी गावाजळील विहिरीत आढळले. त्या रविवारपासून बेपत्ता होत्या

डोंगरकिन्ही : पाटोदा तालुक्यातील नाळवंडी येथील महिला सरपंच कविता सुभाष डोके (वय ४४) यांचे प्रेत बुधवारी गावाजळील विहिरीत आढळले. त्या रविवारपासून बेपत्ता होत्या. त्यांचे प्रेत आढळल्याने तालुका हादरून गेला आहे. त्यांच्या मृत्यूबद्दल उलटसुलट चर्चा असून रात्री उशिरापर्यंत पोलिसांना कुठलेच धागेदोरे मिळाले नव्हते. शेती हेच उपजिविकेचे त्यांचे साधन होते. त्यांच्याकडे गुरे आहेत. कधी पती, कधी मुलगा कधी सून तर कधी त्या स्वत: गुरे चारण्यासाठी जात. प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी त्या जनावरे चारण्यासाठी गावाजवळील शेतात गेल्या होत्या. मात्र, सायंकाळी त्या परतल्याच नाहीत़ त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा रात्रभर शोध घेतला़ निराश होऊन नातेवाईकांनी अंमळनेर ठाणे गाठून बेपत्ताची नोंद केली होती. त्यानंतर पोलिसांनीही शोध मोहीम राबविली; परंतु त्या मिळून आल्या नाहीत. नाळवंडी शिवारातीलच एका विहिरीत बुधवारी सायंकाळी सहा वाजता एका महिलेचे प्रेत पाण्यावर तरंगताना आढळले. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. हे प्रेत दुसऱ्या, तिसऱ्या कोणाचे नाही तर सरपंच कविता डोके यांचेच असल्याचे तपासात पुढे आले. दरम्यान, या विहिरीत उतरून दोन दिवसांपूर्वी तपासणी केली होती; पण काहीच मागमूस लागला नव्हता. बुधवारी याच विहिरीत त्यांचे प्रेत आढळले.पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेतला. पाटोदा ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करुन प्रेत नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. त्यांच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे. बुधवारी गावातील चुली पेटल्या नाहीत. त्यांच्यामागे पती, मुलगा, सून असा परिवार आहे. (वार्ताहर)कविता डोके या सामाजिक कार्यात अग्रेसर होत्या़ गावाच्या विकासाची त्यांना सतत तळमळ होती. त्यांनी गेल्या काही महिन्यांपूर्वी गावातील अवैध धंदे बंद पाडले होते़ त्यामुळे गाव व्यसनमुक्त झाले होते. रस्ते, नळयोजना, पथदिवे, पांदणमुक्तीसाठी त्यांचा पाठपुरावा सुरु होता. बचत गटांमधून त्यांनी महिलांना स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न केला होता.जानेवारी २०१३ मध्ये कविता डोके नाळवंडीच्या सरपंच झाल्या. त्यांचे शिक्षण आठवीपर्यंत झाले होते. ४प्रजासत्ताक दिनी त्यांनी ‘बेटी बढाओ, बेटी पढाओ’ यासह बचतटांच्या महिलांसाठी ग्रामसभा बोलावली होती. ४प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येलाच त्या बेपत्ता झाल्या. त्यामुळे ग्रामसेवकांच्या हस्तेच ध्वजारोहण झाले. ग्रामसभाही झाली नाही.