शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
4
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
5
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
6
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
7
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
8
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
9
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
10
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
11
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
12
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
13
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
14
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
15
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
16
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
17
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
18
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
19
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

नाल्यांचे पाणी शाळेच्या आवारात

By admin | Updated: July 21, 2014 00:20 IST

माजलगाव : शहरातील सन्मित्र कॉलनी भागासह विविध भागांतील पाणी रस्त्यावर सोडले जात आहे़ तसेच नाल्याही वेळेवर स्वच्छ केल्या जात नसल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे़

माजलगाव : शहरातील सन्मित्र कॉलनी भागासह विविध भागांतील पाणी रस्त्यावर सोडले जात आहे़ तसेच नाल्याही वेळेवर स्वच्छ केल्या जात नसल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे़ शहरातील अनेक भागात हीच परिस्थिती असून रस्त्यावरील घाण पाण्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे़ नाल्यातील पाणी शाळेच्या आवारात येत असल्याने संताप व्यक्त होत आहे़शहरातील जुने बसस्थानक परिसरात मोंढा भाग, आझाद नगर, आंबेडकर चौक, आदी भागातील नाल्यातील पाणी हे शहराच्या मुख्य रस्त्यावरील नालीमधून थेट सिंदफणा नदी पात्रात सोडण्यात आलेले आहे़ या मुख्य रस्त्याच्या कडेला सन्मित्र कॉलनी भागात छत्रपती विद्यालय आहे़ मुख्य रस्त्यावरील नाल्या दोन वर्षापासून स्वच्छ न केल्यामुळे नाल्यांमध्ये कचरा साचला आहे़ या कचऱ्याला अडून पाणी रस्त्यावर येऊन शाळेच्या आवारात साचत आहे़ शाळेच्या आवारात मागील दोन वर्षापासून हे पाणी असे साचत आहे़ ही नाली कोणी स्वच्छ करावी, याबाबत वाद सुरु आहे़सार्वजनिक बांधकाम विभाग व नगर पालिका यांच्यातील वादामुळे या नालीची सफाई दोन वर्षापासून रखडली आहे़ याचा त्रास मात्र शहरातील सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे़ विशेष म्हणजे याच भागातून शाळेतील विद्यार्थी जात असल्याने त्यांना येथे साचलेल्या दुर्गंधीचा सामना करतच शाळेला जावे लागत आहे़ लहान मुलांसह वृध्द, महिला यांनाही याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे़ मुख्य रस्त्यावरील नाल्या साफ करुन शाळेच्या आवारात येणारे घाणी पाणी थांबवावे यासाठी मुख्य रस्त्यावर काही दिवसापूर्वी रास्ता रोको करण्यात आला़ मात्र याची दखल अद्यापही नगर पालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाने न घेतल्याने संताप व्यक्त केला जात आहे़शाळेच्या आवारात येणारे घाण पाणी थांबवावे यासाठी मुख्य रस्त्यावरील नाल्या साफ करण्यात याव्यात यासाठी आम्ही पालिका व सा़ बां़ विभागाला अनेक वेळा लेखी व तोंडी कळविले आहे़ मात्र त्याची अद्यापही दखल घेतली गेलेली नाही़ शाळेच्या आवारात घाणी पाणी साचत असल्याने डासाची उत्पत्ती होत असून विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचे छत्रपती विद्यालयाचे मुख्याध्यापक नीळकंठ जाधव यांनी सांगितले़ विद्यार्थ्यांमधूनही स्वच्छतेबाबत संताप व्यक्त केला जात आहे़ स्वच्छता करण्याची मागणी होत आहे़ (वार्ताहर)