शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर, नाशिक, पिंपरी चिंचवडसोबत औरंगाबाद मनपाला विशेष दर्जा

By | Updated: December 9, 2020 04:03 IST

औरंगाबाद : राज्य शासनाने मागील महिन्यात नवीन विकास नियंत्रण नियमावली (डीसी रुल्स) जाहीर केली. या नियमावलीत औरंगाबाद महापालिकेला क ...

औरंगाबाद : राज्य शासनाने मागील महिन्यात नवीन विकास नियंत्रण नियमावली (डीसी रुल्स) जाहीर केली. या नियमावलीत औरंगाबाद महापालिकेला क दर्जा असतानाही प्राधान्यक्रम देण्यात आले नाही. मंगळवारी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरातील बांधकाम व्यावसायिक संघटना क्रेडाई आणि आर्किटेक्ट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत औरंगाबाद शहराला नागपूर, नाशिक आणि पिंपरी-चिंचवडसारखा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे शहरातील उंच इमारतींना कोणतेही मर्यादा राहणार नाही, हे विशेष.

मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आ. संजय शिरसाट, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, राज्याच्या नगररचना विभागाचे संचालक नागनुरे, उपसचिव शिंदे, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय, क्रेडाईचे अध्यक्ष नरेंद्र सिंग जबिंदा, उपाध्यक्ष नितीन बगडिया, सदस्य सलीम पटेल यांची उपस्थिती होती. महाराष्ट्र शासनाने नवीन डीसी रुल्स तयार करताना औरंगाबाद महापालिकेला राज्यातील इतर ड वर्ग पालिकांचा दर्जा दिला होता. औरंगाबाद महापालिका क वर्गात असताना नागपूर, नाशिक आणि पिंपरी-चिंचवडप्रमाणे दर्जा द्यावा, अशी मागणी क्रेडाईतर्फे करण्यात आली. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे या मागणीला त्वरित तत्त्वत: मंजुरी दिली. या निर्णयामुळे औरंगाबाद शहरात उंच इमारती उभारण्यासाठी आता कोणतीही अट राहणार नाही. अग्निशमन विभागाची एनओसी घेणे बंधनकारक राहील. या बैठकीत सिडको प्रशासन आणि महानगरपालिका यांच्यात एफएसआयवरून सुरू असलेल्या वादावर ही चर्चा करण्यात आली. सिडकोकडून कशा पद्धतीने अडवणूक करण्यात येते याची माहितीही क्रेडाईच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. शहराच्या विकासासाठी असलेल्या छोट्या-छोट्या गोष्टी या बैठकीत मान्य करण्यात आल्या.

टीडीआरच्या संचिका परत मिळणार

महाराष्ट्र शासनाने औरंगाबाद महापालिकेतील टीडीआरशी संबंधित २३४ फाइल चौकशीसाठी ताब्यात घेतल्या आहेत. मागील चार वर्षांपासून या फाइल शासनाकडे प्रलंबित आहेत. नवीन टीडीआर लोड करण्यासाठी प्रचंड अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. वादग्रस्त संचिका शासनाने आपल्याकडे चौकशीसाठी ठेवाव्यात. ज्या संचिकांमध्ये कोणताही घोळ नाही त्या संचिता परत देण्याचा निर्णय यावेळी झाला.