शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर, नाशिक, पिंपरी चिंचवडसोबत औरंगाबाद मनपाला विशेष दर्जा

By | Updated: December 9, 2020 04:03 IST

औरंगाबाद : राज्य शासनाने मागील महिन्यात नवीन विकास नियंत्रण नियमावली (डीसी रुल्स) जाहीर केली. या नियमावलीत औरंगाबाद महापालिकेला क ...

औरंगाबाद : राज्य शासनाने मागील महिन्यात नवीन विकास नियंत्रण नियमावली (डीसी रुल्स) जाहीर केली. या नियमावलीत औरंगाबाद महापालिकेला क दर्जा असतानाही प्राधान्यक्रम देण्यात आले नाही. मंगळवारी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरातील बांधकाम व्यावसायिक संघटना क्रेडाई आणि आर्किटेक्ट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत औरंगाबाद शहराला नागपूर, नाशिक आणि पिंपरी-चिंचवडसारखा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे शहरातील उंच इमारतींना कोणतेही मर्यादा राहणार नाही, हे विशेष.

मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आ. संजय शिरसाट, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, राज्याच्या नगररचना विभागाचे संचालक नागनुरे, उपसचिव शिंदे, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय, क्रेडाईचे अध्यक्ष नरेंद्र सिंग जबिंदा, उपाध्यक्ष नितीन बगडिया, सदस्य सलीम पटेल यांची उपस्थिती होती. महाराष्ट्र शासनाने नवीन डीसी रुल्स तयार करताना औरंगाबाद महापालिकेला राज्यातील इतर ड वर्ग पालिकांचा दर्जा दिला होता. औरंगाबाद महापालिका क वर्गात असताना नागपूर, नाशिक आणि पिंपरी-चिंचवडप्रमाणे दर्जा द्यावा, अशी मागणी क्रेडाईतर्फे करण्यात आली. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे या मागणीला त्वरित तत्त्वत: मंजुरी दिली. या निर्णयामुळे औरंगाबाद शहरात उंच इमारती उभारण्यासाठी आता कोणतीही अट राहणार नाही. अग्निशमन विभागाची एनओसी घेणे बंधनकारक राहील. या बैठकीत सिडको प्रशासन आणि महानगरपालिका यांच्यात एफएसआयवरून सुरू असलेल्या वादावर ही चर्चा करण्यात आली. सिडकोकडून कशा पद्धतीने अडवणूक करण्यात येते याची माहितीही क्रेडाईच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. शहराच्या विकासासाठी असलेल्या छोट्या-छोट्या गोष्टी या बैठकीत मान्य करण्यात आल्या.

टीडीआरच्या संचिका परत मिळणार

महाराष्ट्र शासनाने औरंगाबाद महापालिकेतील टीडीआरशी संबंधित २३४ फाइल चौकशीसाठी ताब्यात घेतल्या आहेत. मागील चार वर्षांपासून या फाइल शासनाकडे प्रलंबित आहेत. नवीन टीडीआर लोड करण्यासाठी प्रचंड अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. वादग्रस्त संचिका शासनाने आपल्याकडे चौकशीसाठी ठेवाव्यात. ज्या संचिकांमध्ये कोणताही घोळ नाही त्या संचिता परत देण्याचा निर्णय यावेळी झाला.