शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
4
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
5
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
6
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
7
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
8
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
9
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
11
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
12
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
13
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
14
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
15
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
16
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
17
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
18
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
19
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
20
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर, नाशिक, पिंपरी चिंचवडसोबत औरंगाबाद मनपाला विशेष दर्जा

By | Updated: December 9, 2020 04:03 IST

औरंगाबाद : राज्य शासनाने मागील महिन्यात नवीन विकास नियंत्रण नियमावली (डीसी रुल्स) जाहीर केली. या नियमावलीत औरंगाबाद महापालिकेला क ...

औरंगाबाद : राज्य शासनाने मागील महिन्यात नवीन विकास नियंत्रण नियमावली (डीसी रुल्स) जाहीर केली. या नियमावलीत औरंगाबाद महापालिकेला क दर्जा असतानाही प्राधान्यक्रम देण्यात आले नाही. मंगळवारी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरातील बांधकाम व्यावसायिक संघटना क्रेडाई आणि आर्किटेक्ट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत औरंगाबाद शहराला नागपूर, नाशिक आणि पिंपरी-चिंचवडसारखा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे शहरातील उंच इमारतींना कोणतेही मर्यादा राहणार नाही, हे विशेष.

मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आ. संजय शिरसाट, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, राज्याच्या नगररचना विभागाचे संचालक नागनुरे, उपसचिव शिंदे, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय, क्रेडाईचे अध्यक्ष नरेंद्र सिंग जबिंदा, उपाध्यक्ष नितीन बगडिया, सदस्य सलीम पटेल यांची उपस्थिती होती. महाराष्ट्र शासनाने नवीन डीसी रुल्स तयार करताना औरंगाबाद महापालिकेला राज्यातील इतर ड वर्ग पालिकांचा दर्जा दिला होता. औरंगाबाद महापालिका क वर्गात असताना नागपूर, नाशिक आणि पिंपरी-चिंचवडप्रमाणे दर्जा द्यावा, अशी मागणी क्रेडाईतर्फे करण्यात आली. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे या मागणीला त्वरित तत्त्वत: मंजुरी दिली. या निर्णयामुळे औरंगाबाद शहरात उंच इमारती उभारण्यासाठी आता कोणतीही अट राहणार नाही. अग्निशमन विभागाची एनओसी घेणे बंधनकारक राहील. या बैठकीत सिडको प्रशासन आणि महानगरपालिका यांच्यात एफएसआयवरून सुरू असलेल्या वादावर ही चर्चा करण्यात आली. सिडकोकडून कशा पद्धतीने अडवणूक करण्यात येते याची माहितीही क्रेडाईच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. शहराच्या विकासासाठी असलेल्या छोट्या-छोट्या गोष्टी या बैठकीत मान्य करण्यात आल्या.

टीडीआरच्या संचिका परत मिळणार

महाराष्ट्र शासनाने औरंगाबाद महापालिकेतील टीडीआरशी संबंधित २३४ फाइल चौकशीसाठी ताब्यात घेतल्या आहेत. मागील चार वर्षांपासून या फाइल शासनाकडे प्रलंबित आहेत. नवीन टीडीआर लोड करण्यासाठी प्रचंड अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. वादग्रस्त संचिका शासनाने आपल्याकडे चौकशीसाठी ठेवाव्यात. ज्या संचिकांमध्ये कोणताही घोळ नाही त्या संचिता परत देण्याचा निर्णय यावेळी झाला.