शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

नाफेडने नाकारले, बाजारभावही पडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 23:58 IST

मोठा गाजावाजा करुन नाफेडमार्फत धान्य खरेदी केंद्र सुरु केले असलेतरी उत्पादीत धान्यामध्ये ओलाव्याचे प्रमाण जास्त असल्याने या केंद्रांवर माल रिजेक्ट केला जात आहे. तर दुसरीकडे ओला माल खरेदीमुळे होणारे संभाव्य नुकसान लक्षात घेत बाजारात हमीदरापेक्षा कमी भाव मिळत आहे.

अनिल भंडारी ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : मोठा गाजावाजा करुन नाफेडमार्फत धान्य खरेदी केंद्र सुरु केले असलेतरी उत्पादीत धान्यामध्ये ओलाव्याचे प्रमाण जास्त असल्याने या केंद्रांवर माल रिजेक्ट केला जात आहे. तर दुसरीकडे ओला माल खरेदीमुळे होणारे संभाव्य नुकसान लक्षात घेत बाजारात हमीदरापेक्षा कमी भाव मिळत आहे. एकूणच आर्द्रतेच्या कारणांमुळे हमीपेक्षा कमी भाव दिला जात आहे. परतीच्या पावसाचा फटका शेतक-यांना बसला आहे.शासनाने हमीदराने खरेदी केंद्र सुरु करण्याआधी शेतक-यांना आॅनलाईन नोंदणीची सक्ती केली. दरम्यान या नोंदणीसाठी येणा-या तांत्रिक अडचणींमुळे विलंब लागत आहे. महिनाभरात बीड तालुक्यात १८० शेतकºयांनी नोंदणी केल्याची माहिती सुत्रांनी इतर तालुक्यांमध्ये तर नोंदणीचा आकडा ५० च्या पुढे अद्याप सरकला नाही. जिल्ह्यात उडीद व मुगाच्या खरेदीसाठी बीड, गेवराई, माजलगाव, पाटोदा आणि कडा येथे शासनाचे खरेदी केंद्र सुरु झाले आहेत. तर सोयाबीन खरेदीसाठी बीड, गेवराई, माजलगाव आणि कडा येथे केंद्र सुरु केले आहेत. २७ आॅक्टोबरपर्यंत जिल्ह्यातील अकरा तालुक्यात नाफेडचे खरेदी केंद्र सुरु होतील. सुरु असलेल्या केंद्रांवर नाफेडच्या अटींमुळे शेतकºयांचा माल खरेदीसाठी अपात्र ठरत आहे. खरेदी केंद्रांवर येणा-या मालाची आर्द्रता १२ टक्क्यांपर्यंतच असणे आवश्यक आहे, मात्र त्यापेक्षा जास्त आर्द्रता आढळत आहे.