शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
2
Pahalgam Terror Attack : दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
3
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
4
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
5
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
6
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
7
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
8
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
9
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
10
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
11
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
12
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
13
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
14
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
15
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
16
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
17
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
18
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
19
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
20
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता

नगराध्यक्षांनी पोसले गुत्तेदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 00:06 IST

शासनाच्या विविध योजनांसाठी आपणच प्रयत्न केले. आपल्यामुळेच योजना कार्यान्वित झाली, असे म्हणून नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर स्वत:ची पाठ थोपटून घेत आहेत. वास्तविक पाहता हे नगराध्यक्ष विविध कामांत अव्वाच्च सव्वा बिले लावून केवळ गुत्तेदार पोसण्याचे काम करीत असल्याचा आरोप उपनगराध्यक्ष तथा नगराध्यक्षांचे पुतणे हेमंत क्षीरसागर यांनी केला.

ठळक मुद्देपत्रपरिषदेत काकांवर आरोपशासनाच्या योजनांचे श्रेय घेतले - हेमंत क्षीरसागर

बीड : शासनाच्या विविध योजनांसाठी आपणच प्रयत्न केले. आपल्यामुळेच योजना कार्यान्वित झाली, असे म्हणून नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर स्वत:ची पाठ थोपटून घेत आहेत. वास्तविक पाहता हे नगराध्यक्ष विविध कामांत अव्वाच्च सव्वा बिले लावून केवळ गुत्तेदार पोसण्याचे काम करीत असल्याचा आरोप उपनगराध्यक्ष तथा नगराध्यक्षांचे पुतणे हेमंत क्षीरसागर यांनी केला.

बीड नगर पालिकेत बुधवारी सायंकाळी काकु-नाना आघाडीचे उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर, पाणीपुरवठा सभापती फारूक पटेल, बांधकाम सभापती अमर नाईकवाडे यांनी पत्रकार परिषद घेऊन नगराध्यक्षांवर सडेतोड टिका करण्याबरोबच विविध योजना व रखडलेल्या टेंडरची माहिती दिली.

हेमंत क्षीरसागर म्हणाले, बीड शहरात सध्या आपण विविध योजना आणण्यसाठी प्रयत्न केले. आपल्यामुळेच उद्यान, स्वच्छता, पाणी पुरवठा, भुयारी गटार कार्यान्वीत होत आहेत. वास्तविक पाहता या सर्व योजना केंद्र शासनाच्या अमृत योजनेंतर्गत झालेल्या आहेत. यासाठी सर्वांनीच परिश्रम घेतलेले आहेत. परंतु नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागर आपणच हे सर्व केले असे म्हणून स्वत:ची पाठ थोपटून घेत आहेत. हे श्रेय घेण्याचे त्यांनी सोडून द्यावे. हे करण्यापेक्षा विकास कामांत लक्ष घातले तर शहर हरीत होईल, असे म्हणून हेमंत क्षीरसागर यांनी काकाला टोला लगावला. स्वच्छतेचे टेंडर पास करण्यासाठी नगराध्यक्षांनी रोगराई पसरण्याची वाट पाहिली, असा आरोपही हेमंत क्षीरसागर यांनी यावेळी केला.

पाणी पुरवठा सभापती फारूक पटेल म्हणाले, हरीत शहर करण्यासाठी लावलेले झाडे नियमात नव्हती. त्यांची उंची कमी होती. तसेच ते जगविलेही नाहीत. परंतु गुत्तेदार पोसण्यासाठी २२०० रूपये बील यासाठी अदा करण्यात आला. हे काम केवळ नगराध्यक्ष गुत्तेदार पोसण्यासाठी करीत आहेत. पाणी पुरवठा विभागाच्या योजनाही शासनाच्या आहेत. यामध्ये नगराध्यक्षांनी श्रेऊ नये. स्वता:ची पाठ थोपटून घेण्याचे काम बंद करावे, असा सुचक सल्लाही पटेल यांनी केला. तसेच दरडोई १३५ लिटर पाणी देणे बंधनकारक असून त्यासाठी आघाडी प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले. नगराध्यक्षांनी विकास कामाच्या नावाखाली जनतेची दिशाभूल करु नये असे ते म्हणाले.अमर नाईकवाडे झाले आक्रमकबीड पालिकेतील सर्व कारभार नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर हे धाब्यावर बसून करीत आहेत. जिल्हा रूग्णालयाजवळील रस्त्याचे काम आमदार फंडातून होत असल्याचा गाजावाजा त्यांनी केला. परंतु हे आमदार फंडातून नव्हे तर दलीत वस्ती सुधार योजनेंतर्गत करण्यात आलेले आहे. त्याचा पुरावाही नाईकवाडे यांनी यावेळी सादर केला. शहरातील शासकीय योजनांमधून झालेली कामे, विकास याबाबत नाईकवाडे यांनी पुरावे सादर केले. पुढे ते म्हणाले, विशेष सभेबाबत वारंवार पत्र दिले, परंतु आठवडा उलटूनही त्यांनी याकडे लक्ष दिले नाही. असेच प्रकार वारंवार होत आहेत. आम्ही श्रेयासाठी नव्हे तर विकासासाठी लढत आहोत, असा खुलासाही अमर नाईकवाडे यांनी केला.