शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

तक्रारींचे निरसन करण्यासाठी मनपाचे वॉररूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 00:29 IST

नागरिकांच्या तक्रारी त्वरित सोडविण्यासाठी खास एका वॉररूमची स्थापना करण्यात येणार आहे. मनपाशी संबंधित माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सोशल मीडियाचा वापरही प्रभावीपणे करण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिकेच्या कोणत्याही विभागात अथवा वॉर्ड कार्यालयात नागरिकांनी साध्या कागदावर तक्रार केली तर त्याची अजिबात दखल घेण्यात येत नव्हती, त्यामुळे नागरिकांनी महापालिकेला दूषणे देत तक्रारी करणेच बंद करून टाकले होते. महापालिकेची ही प्रतिमा बदलण्यासाठी आता सकारात्मक प्रयत्न सुरू झाले आहेत. नागरिकांच्या तक्रारी त्वरित सोडविण्यासाठी खास एका वॉररूमची स्थापना करण्यात येणार आहे. मनपाशी संबंधित माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सोशल मीडियाचा वापरही प्रभावीपणे करण्यात येणार आहे.स्मार्ट सिटी योजनेंतर्गत महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात वॉररूम सुरू केली जाणार असल्याची माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली. नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर अधिकारी व कर्मचारी अजिबात दखल घेत नव्हते. मनपा प्रशासनाच्या या हेकेखोर भूमिकेमुळे नागरिकांचा मनपा प्रशासनावर रोष वाढला आहे. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेतली जावी, समस्यांचे निराकरण व्हावे, यासाठी स्मार्ट सिटी योजनेंतर्र्गत मनपाच्या मुख्य कार्यालयात वॉर रूम सुरू करण्याचा निर्णय महापौर घोडेले यांनी घेतला आहे. वॉररूम सुरू करण्यासाठी आयुक्त डी.एम. मुगळीकर यांच्याशी चर्चा केली असून, त्यांनीही त्वरित तयारी दर्शवली. वॉर रूममध्ये प्राप्त होणाºया तक्रारींची नोंद घेतली जाणार आहे. नागरिकांकडून प्राप्त होणारी तक्रार संबंधित विभागाकडे पाठविण्यात येईल, त्या विभागाकडे पाठपुरावा करून तक्रारींचे निराकरण करण्यात येऊन नागरिकांना त्याबद्दलची माहिती वॉर रूमद्वारे कळवण्यात येईल.तक्रार सोडवण्यासाठी ७ दिवसांपेक्षा अधिक कालावधी लागणार नाही. या तक्रारींचा दररोजचा अहवाल महापौर कार्यालयात मागवण्यात येईल. त्याचबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिक आणि मनपा प्रशासन यांच्यात समन्वय साधला जाईल.