शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

बोगस बिलांना मनपा जबाबदार

By admin | Updated: December 27, 2014 00:47 IST

औरंगाबाद : सिटी वॉटर युटिलिटी कंपनीकडून देण्यात येणारी वाढीव पाणीपट्टीची बिले महापालिका प्रशासनाच्या कृपेनेच येत असल्याचा खळबळजनक खुलासा शहर अभियंता एस. डी. पानझडे यांनी आज आयुक्तांच्या दालनात केला.

औरंगाबाद : सिटी वॉटर युटिलिटी कंपनीकडून देण्यात येणारी वाढीव पाणीपट्टीची बिले महापालिका प्रशासनाच्या कृपेनेच येत असल्याचा खळबळजनक खुलासा शहर अभियंता एस. डी. पानझडे यांनी आज आयुक्तांच्या दालनात केला. कंपनीची बाजू योग्य असल्याचे सांगण्यासाठी त्यांनी मनपातील कर्मचाऱ्यांच्या श्रम संस्कृतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. शिवसेना आणि भाजपाच्या पदाधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांमध्ये याप्रकरणी संतापाची लाट उसळण्याची शक्यता आहे. माजी आ.जैस्वाल यांनी पाणीपट्टी वसुली मनपाने करावी, या मागणीचे निवेदन आयुक्त पी. एम. महाजन यांना दिले. त्यावेळी वाढीव बिलांप्रकरणी स्पष्टीकरण देताना शहर अभियंता पानझडे म्हणाले, पाणीपट्टीची वाढीव बिले मनपाच्या चुकीमुळे येत आहेत. आजवर ज्या नागरिकांनी पाणीपट्टी भरली आहे, त्याची नोंद संबंधित विभागाने घेतलेलीच नाही. बिलांची नोंद न घेताच नळधारकांचे रेकॉर्ड कंपनीला दिले आहे. आपण रेकॉर्ड अपडेट करून देणे गरजेचे होते. आपल्या लोकांच्या चुकीमुळेच वाढीव बिले दिली जात आहेत.