शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा निकाल लागताच राज ठाकरे वर्षा निवासस्थानी; CM देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
4
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
5
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
7
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
8
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
9
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
10
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
11
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
12
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
13
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
14
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
15
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
16
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
17
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
18
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
19
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
20
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...

मनपाचे अधिकारीच समन्वय ठेवत नाहीत

By admin | Updated: January 6, 2015 01:10 IST

औरंगाबाद : मनपाचे अधिकारी समन्वय ठेवत नसल्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याचे खा.चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीत झालेल्या विशेष बैठकीत समोर आले.

औरंगाबाद : मनपाचे अधिकारी समन्वय ठेवत नसल्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याचे खा.चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीत झालेल्या विशेष बैठकीत समोर आले. मनपा आणि कंपनीतील असमन्वयामुळे जलवाहिनीच्या कामाला उशीर होत असल्याचेही बैठकीत निष्पन्न झाले. पैठण ते नक्षत्रवाडीपर्यंत जलवाहिनीचे काम तातडीने सुरू करण्यासाठी यावेळी कंपनी व मनपा अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या. शिवसेनेचा औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीला काहीही विरोध नाही. कंपनीने आधी काम करावे, नंतर पाणीपट्टी वसूल करावी, असे माजी आ. प्रदीप जैस्वाल म्हणाले. आयुक्त पी. एम. महाजन म्हणाले, कंपनीने तातडीने जलवाहिनीचे काम सुरू केले पाहिजे. पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यानंतर कंपनीने मोफत टँकर दिले पाहिजेत. गळत्या दुरुस्त करून रेंगाळलेली कामे पूर्ण करण्याबाबत कंपनीला सूचना करण्यात आल्या. गळतीचे पाणी रस्त्यांवरून वाहते. त्यामुळे रस्त्यांचेही नुकसान होत असल्याचे कंपनीच्या निदर्शनास आणून दिले.यावेळी महापौर कला ओझा, सभागृह नेते किशोर नागरे, गटनेता गजानन बारवाल, विरोधी पक्षनेते रावसाहेब गायकवाड, मीर हिदायत अली, शहरप्रमुख राजू वैद्य, बाळासाहेब थोरात, अनिल जैस्वाल, मोहन मेघावाले, गोपाळ कुलकर्णी, छाया वेताळ, सुनीता बरथुने, आगा खान, अनिल पोलकर, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, के. एम. फालक, यू.जी. शिरसाट, शिवाजी झनझन, कंपनीचे अरनाळ घोष, राम मुंदडा, कीर्तिकेयन, जहागीरदार उपस्थित होते.४शहर अभियंता एस. डी. पानझडे म्हणाले, बल्क वॉटर आणि हायड्रोक्लोरिक वर्क या दोन वेगळ्या बाबी आहेत. कंपनीने ही दोन्ही कामे वेगवेगळी केल्यास अडचण येणार नाही. यापुढील सर्व बैठकींना कंपनीचे प्रमुख अशोक अग्रवाल यांना उपस्थित राहण्याचे सांगण्यात आले. पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची कारणे शोधावीत. तसेच कंपनीच्या मुंबई आॅफिसचे सर्वाधिकार येथील आॅफिसला देण्यात यावेत. शहरातील नवीन २३ जलकुंभांच्या जागा निश्चित करून त्या अंतिम केल्यावर डीपीआर मंजुरीकडे लक्ष देण्यात यावे. डीपीआर प्लॅनच्या मंजुरीअभावी काम सुरू करण्यास उशीर होतो आहे, असे कंपनी अधिकाऱ्यांनी सांगितले.