शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
5
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
6
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
7
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
8
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
9
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
10
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
11
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
12
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
13
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
14
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
15
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
16
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
17
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
18
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
19
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
20
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...

मनपा कर्मचाऱ्यांचे वेतन थकले !

By admin | Updated: May 11, 2017 23:42 IST

लातूर : लातूर मनपातील ६५० सफाई कामगार आणि वर्ग-३ च्या १५० कर्मचाऱ्यांचे वेतन थकले

लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : लातूर मनपातील ६५० सफाई कामगार आणि वर्ग-३ च्या १५० कर्मचाऱ्यांचे वेतन थकले असून, साह्य अनुदान बंद झाल्याने मनपाचा कोष बिघडला आहे. परिणामी, कर्मचाऱ्यांवरही उपासमारीची वेळ आली आहे. लातूर मनपाच्या आस्थापनातील कर्मचाऱ्यांचे दरमहा वेतन २ कोटी २५ लाखांचे आहे. शासनाकडून २ कोटी ८० लाख साह्य अनुदान मिळत होते. मात्र ते वर्षभरापासून बंद झाल्याने मनपाच्या तिजोरीवर ताण पडत आहे. विकास कामे तर सोडाच, कर्मचाऱ्यांचे वेतन करणेही मुश्किलीचे झाले आहे. महानगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुका मनपा फंडातून झाल्या आहेत. त्यामुळेही कोष बिघडला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून वर्ग-३ च्या दीडशे कर्मचाऱ्यांचे वेतन थकले आहे. तर ६५० सफाई कामगारांचे एप्रिल महिन्याचे वेतन थकले आहे. केवळ साह्य अनुदान बंद झाल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनेचे पैसे वेतन अथवा आस्थापना खर्चासाठी वापरता येत नाही. त्यामुळे साह्य अनुदानावर कर्मचाऱ्यांचे वेतन अवलंबून होते. मात्र साह्य अनुदान बंद झाल्यामुळे वेतनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दोन महिन्यांपासून वर्ग-३ च्या कर्मचाऱ्यांचे तर एक महिन्यापासून सफाई कामगारांचे वेतन रखडले आहे. त्यांच्याकडून दररोज वेतनाची मागणी होत आहे. मात्र अद्याप काहीही तोडगा निघाला नाही. कर्मचारी वेतनासाठी त्रस्त आहेत. (अधिक वृत्त हॅलो/२ वर)