शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

‘फोर-जी’साठी महापालिकेच्या पायघड्या

By admin | Updated: June 24, 2014 01:09 IST

विकास राऊत , औरंगाबाद रिलायन्स कंपनीला शहरात सार्वजनिक जागांवर ‘फोर-जी’चे टॉवर उभे करायचे आहेत. यासाठी कंपनीने महापालिकेसोबत करारही केला आहे.

विकास राऊत , औरंगाबादरिलायन्स कंपनीला शहरात सार्वजनिक जागांवर ‘फोर-जी’चे टॉवर उभे करायचे आहेत. यासाठी कंपनीने महापालिकेसोबत करारही केला आहे. ३० वर्षांसाठी भाडेतत्त्वावर जागा देण्याचा एक ठराव यापूर्वीच सत्ताधाऱ्यांनी स्थायी समितीमध्ये मंजूर केला. ठरावाला विरोध झाल्याने सर्वसाधारण सभेने त्याला स्थगिती दिली. त्यामुळे कंपनीने थेट मुंबई गाठली. मुंबईहून ‘आदेश’ येताच महापालिका कंपनीसमोर पायघड्या घालत आहे. शहरात टॉवर उभारण्याच्या मुद्यावर मनपा प्रशासनाने अजून कोणताही निर्णय घेतलेला नसताना कंपनीने सार्वजनिक ठिकाणी खोदकामही सुरू केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. कालपर्यंत नकार देणारी मनपा आज कंपनीच्या बाजूने उभी असल्याचे चित्र दिसत आहे. शहरात टॉवर उभारणीचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने आज पारिजातनगर, एन-४ मधील उद्यानात खोदकाम करण्यास सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. मॉर्निंग वॉकला येणाऱ्या नागरिकांनी त्याला कडाडून विरोध केला. स्मशानभूमी, कब्रस्तान, उद्यान, मनपा इमारत परिसरात फोर-जी चे टॉवर आगामी ३० वर्षांसाठी उभारण्याच्या हालचालीही सुरू झाल्या आहेत. वास्तविक पाहता प्रशासनाने कंपनीसोबत फक्त एक रजिस्ट्री केली आहे. त्याला मनपाच्या भाषेत भाडेकरार म्हटले जात आहे. मालमत्ता अधिकारी एस. पी. खन्ना यांनी हा करार केला आहे. अशी केली आहे धूळफेकमहापालिका प्रशासनाने प्रत्येक जागेची स्वतंत्र रजिस्ट्री करणे गरजेचे होते. कारण १२५ जागांचे गट क्रमांक वेगळे आहेत. त्यांचा रेडी रेकनर दरही वेगळा आहे. त्यामुळे मनपाचे जास्तीचे उत्पन्न बुडणार आहे. प्रशासनाने सरसकट २ बाय २ ची जागा देण्याचा करार केला आहे. विशेष बाब म्हणजे २ बाय २ च्या जागेमध्ये कंपनीचे दोन शेडस्, एक सेक्युरिटी केबीन, टॉवर जनरेटर कसे बसतील. टॉवरसाठी लागणारी जागा, साहित्याचा कुठेच उल्लेख रजिस्ट्रीमध्ये नाही. कंपनीला खिरापत समजून वाटप केलेल्या या जागांचा सविस्तर तपशीलही नाही.कंपनीला टपरीचा कायदामहाराष्ट्र मनपा अधिनियमातील कलम १९ ब मधील तरतुदीनुसार १२५ ठिकाणची जागा ३० वर्षांसाठी कंपनीला भाडेतत्त्वावर देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. मुळात या कलमानुसार टपरीधारकाला एखादी जागा देण्याचा ठराव भाडेतत्त्वावर सभेची मंजुरी न घेता पारित करता येतो. परंतु १२५ ठिकाणच्या जागांचे बाजारमूल्य जास्त होत आहे. नागरिक कोर्टात जाणारपरिजातनगरमधील संत सावता उद्यानात ‘फोर जी’ च्या टॉवर उभारणी विरोधात उद्यान बचाव कृती समितीने कोर्टात जाण्याची तयारी केली आहे. उद्यानात नागरिक मॉर्निंग वॉकसाठी येतात. टॉवरमधून निघणाऱ्या अतिगंभीर ‘वेव्हज्’ आरोग्यासाठी धोकादायक असतात. त्यामुळे मॉर्निंग वॉक करून आरोग्य सांभाळणाऱ्या नागरिकांना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी कोर्टात जाण्याची तयारी सुरू केली आहे. महापौरांचे आदेश असे- फेबु्रवारी २०१४ मध्ये शहरातील १२५ जागा ‘रिलायन्स फोर-जी’चे टॉवर उभारण्यासाठी भाड्याने देण्याचा ठराव स्थायी समितीने ऐनवेळी मंजूर केला. स्थायी समितीने मंजूर केलेला ठराव स्थगित करण्याचे आदेश देण्यात येत आहेत. महापौर कला ओझा, (२० मे रोजीची सर्वसाधारण सभा)वक्फ बोर्ड कोर्टात जाणारवक्फ बोर्डाची मालकी असलेल्या १४ कब्रस्तानातही टॉवर उभारणीसाठी जागा दिलेली आहे. त्या जागा परस्पर देण्याचा अधिकार मनपाला नाही. त्यामुळे बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सय्यद एजाज हुसैन यांनी कोर्टात धाव घेण्याची तयारी सुरू केली. सिल्लेखाना, बायजीपुरा, शहानूरवाडी, कालाचबुतरा, क्रांतीचौक, किलेअर्क , चिकलठाणा, जामा मशीद, जाफरगेट, पडेगाव, नवखंडा, मिटमिटा, गारखेडा या कब्रस्तानांमधील जागा ‘फोर-जी’ साठी देण्याच्या ठरावाच्या विरोधात कोर्टात जाणार आहे. असा होता ठराव...फोर-जी या सेवेकरिता शहरातील रस्त्यांवर आॅप्टीकल फायबर केबल टाकण्यासाठी रिलायन्स जीवो इन्फ ोकॉम लि.मुंबई यांना सशर्त परवानगी दिली आहे. कंपनीने ग्राऊंड बेस्ड टेलेकॉम मास्टस् उभारणीसाठी परवानगी मागितली आहे. मनपाच्या मालकीच्या स्मशानभूमी, उद्यान, इतर खुल्या जागा, वाहतूक बेट, इमारतीसभोवतालच्या परिसरातील २ बाय २ मीटरची जागा भाडेतत्त्वावर मागितली आहे. शहरात सार्वजनिक ठिकाणी जेथे नागरिकांचा अधिक वावर आहे. अशा भागांमध्ये कंपनी फोर-जी टॉवर उभारणार आहे.