शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

महापालिकेची उधळपट्टी; बाजार समितीत मलमपट्टी !

By admin | Updated: December 3, 2015 00:37 IST

लातूर जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीमुळे बाजार समितीच्या सभापतींनी चक्क बाजार समितीची गाडीच वापरायची सोडून दिली आहे.

लातूर जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीमुळे बाजार समितीच्या सभापतींनी चक्क बाजार समितीची गाडीच वापरायची सोडून दिली आहे. तर दुसरीकडे जनतेच्या पैशावर नगरसेवक, पदाधिकारी आणि अधिकारी चक्क केरळ दौऱ्यावर निघाले आहेत. बाजार समितीवर सत्ता काँग्रेसची आहे. महापालिकेवरही सत्ता काँग्रेसचीच आहे. परंतु दोन पदाधिकाऱ्यांच्या स्वभाव व कृतीतील फरक मात्र लक्षात घेण्यासारखे आहेत. एकिकडे सभापती दुष्काळावर काही का होईना मलमपट्टी करताहेत तर दुसरीकडे महापालिकेत उधळपट्टी सुरु आहे. अभ्यास दौऱ्याला विरोध असतानाही त्याची निविदा निघाली आहे.जिल्ह्यातील दुष्काळाचा फटका बाजार समितीला बसतो आहे. याची जाणीव ठेवून गेल्या चार महिन्यांपासून बाजार समितीच्या सभापतीच्या खुर्चीत बसलेल्या सभापती ललितभाई शहा यांनी कार्यालयीन गाडीऐवजी स्वत:च्या मालकीची गाडी वापरणे सुरु केले आहे. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होऊन पाच महिने झाले. या पाच महिन्यात सभापती झालेल्या ललितभाई शहा यांनी बाजार समितीची चारचाकी गाडी न वापरण्याचा निर्णय घेतला. यामागचे कारण सांगताना त्यांनी दुष्काळामुळे बाजार समितीची आर्थिक स्थिती बिघडल्याचे सांगितले. चार महिन्यांपासून त्यांनी हा नियम पाळला आहे. दररोज नित्यनियमाने ते घरातली स्वत:ची गाडी घेऊन येतात. बाजार समितीच्या सभापतींच्या गाडीच्या जागी त्यांची खासगी गाडी दररोज लागते. बाजार समितीच्या कोणत्याही कामासाठी ते खासगी वाहन घेऊनच जातात. लातुरातील सर्वच राजकीय नेत्यांपुढे त्यांनी हा आदर्श ठेवला आहे. जिल्ह्यातील दुष्काळ आणि महापालिकेपुढे असलेला समस्यांचा डोंगर बाजूला ठेवून महापालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक आणि अधिकारी जनतेच्या टॅक्समधून जमा झालेल्या पैशावर केरळ दौऱ्याला निघाले आहेत. ४लातूर महापालिका केरळच्या दौऱ्यावरुन पुरती ढवळून निघाली आहे. आॅनलाईनवर टेंडर निघाल्यापासून तर आता केरळ दौरा हमखास पक्का समजला जात आहे. त्यामुळे माहौल खुशीचा आहे. ‘सभागृहाचे कामकाज’ शिकायला नगरसेवक केरळला जात आहेत. कोचीला प्रशिक्षण आणि बाकीच्या सहा ठिकाणी कशाचे दौरे ? असा प्रश्न विचारला जात आहे. ४या केरळ दौऱ्याच्या फार्ससाठी जी गटनेत्याची बैठक झाल्याचा बनाव केला जात आहे. कारण राष्ट्रवादीचे गटनेते मकरंद सावे यांनी ही बैठकच झाली नसल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले.