शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

हगणदारीमुक्त शहरासाठी पालिकेची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 00:10 IST

जालना : शहर हगणदारीमुक्त झाल्याचा ठराव पालिकेने घेतला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहर हगणदारीमुक्त झाल्याचा ठराव पालिकेने घेतला आहे. मात्र, प्रत्यक्षात अनेक ठिकाणी नागरिक आजही उघड्यावर शौचास जात आहेत. वैयक्तिक शौचालयांचे कामही अपूर्ण आहे. लवकरच राज्यस्तरीय पथक शहरात तपासणीसाठी येणार असल्याने पालिका प्रशासनाची धावपळ सुरू आहे.स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत प्रत्येक शहर व गाव हगणदारीमुक्त करण्याचा शासनाचा निर्धार आहे. त्यासाठी व्यापक प्रयत्न सुरू आहेत. या अभियानात सहभाग घेतलेल्या जालना नगरपालिकेने शहर संपूर्ण हगणदारीमुक्त झाल्याचा ठराव घेतला आहे. परंतु प्रत्यक्षात शहरातील स्थिती वेगळी आहे. २०१५-१६ मध्ये केलेल्या सर्वेनुसार पालिकेला तेरा हजार २०२ शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट होते. पैकी पाच हजार २१० शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले असून, त्याचा वापर सुरू आहे. उर्वरित शौचालयांचे काम ७० टक्के काम पूर्ण झाल्याचे पालिका प्रशासन सांगत आहे. ज्या भागात नागरिक उघड्यावर शौचास जातात तिथे पालिकेने सार्वजनिक स्वच्छतागृहे बांधली आहेत. उघड्यावर न बसता या स्वच्छतागृहांचा वापराच्या सूचना नागरिकांना देण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी गुड मॉर्निंग पथकांच्या माध्यमातून कारवाई करण्यात येत आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत जिल्हास्तरीय पथकाने नुकतीच शहरात येऊन तपासणी केली. आता लवकरच राज्य व केंद्र स्तरावरील पथक शहरात अचानक तपासणी करणार आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत:हून शौचालयाचा वापर करावा यासाठी प्रत्येक प्रभागात पथनाट्ये, पोस्टर, बॅनर व अन्य माध्यमातून जनजागृती करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.