शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

हगणदारीमुक्त शहरासाठी पालिकेची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 00:10 IST

जालना : शहर हगणदारीमुक्त झाल्याचा ठराव पालिकेने घेतला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहर हगणदारीमुक्त झाल्याचा ठराव पालिकेने घेतला आहे. मात्र, प्रत्यक्षात अनेक ठिकाणी नागरिक आजही उघड्यावर शौचास जात आहेत. वैयक्तिक शौचालयांचे कामही अपूर्ण आहे. लवकरच राज्यस्तरीय पथक शहरात तपासणीसाठी येणार असल्याने पालिका प्रशासनाची धावपळ सुरू आहे.स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत प्रत्येक शहर व गाव हगणदारीमुक्त करण्याचा शासनाचा निर्धार आहे. त्यासाठी व्यापक प्रयत्न सुरू आहेत. या अभियानात सहभाग घेतलेल्या जालना नगरपालिकेने शहर संपूर्ण हगणदारीमुक्त झाल्याचा ठराव घेतला आहे. परंतु प्रत्यक्षात शहरातील स्थिती वेगळी आहे. २०१५-१६ मध्ये केलेल्या सर्वेनुसार पालिकेला तेरा हजार २०२ शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट होते. पैकी पाच हजार २१० शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले असून, त्याचा वापर सुरू आहे. उर्वरित शौचालयांचे काम ७० टक्के काम पूर्ण झाल्याचे पालिका प्रशासन सांगत आहे. ज्या भागात नागरिक उघड्यावर शौचास जातात तिथे पालिकेने सार्वजनिक स्वच्छतागृहे बांधली आहेत. उघड्यावर न बसता या स्वच्छतागृहांचा वापराच्या सूचना नागरिकांना देण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी गुड मॉर्निंग पथकांच्या माध्यमातून कारवाई करण्यात येत आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत जिल्हास्तरीय पथकाने नुकतीच शहरात येऊन तपासणी केली. आता लवकरच राज्य व केंद्र स्तरावरील पथक शहरात अचानक तपासणी करणार आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत:हून शौचालयाचा वापर करावा यासाठी प्रत्येक प्रभागात पथनाट्ये, पोस्टर, बॅनर व अन्य माध्यमातून जनजागृती करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.