शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

सुविधा न देताच मनपाची वसुली

By admin | Updated: January 15, 2016 23:55 IST

औरंगाबाद : पाणीपुरवठ्याची बोंब आणि कचरा उचलला गेला नसतानाही महापालिकेने मागील सहा महिन्यांत या सेवा दिल्याचे सांगत सातारा- देवळाई नगर परिषदेकडे ५१ लाखांहून अधिक रकमेची मागणी करणारे पत्र दिले आहे.

औरंगाबाद : पाणीपुरवठ्याची बोंब आणि कचरा उचलला गेला नसतानाही महापालिकेने मागील सहा महिन्यांत या सेवा दिल्याचे सांगत सातारा- देवळाई नगर परिषदेकडे ५१ लाखांहून अधिक रकमेची मागणी करणारे पत्र दिले आहे. महापालिकेच्या मुख्य लेखाधिकाऱ्यांनी शुक्रवारी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना हे पत्र पाठविल्याने सातारा- देवळाईतील नागरिक आणि नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सातारा- देवळाई नगर परिषदेचा भाग महापालिकेत २१ मे रोजी २०१५ रोजी समाविष्ट करण्यात आला. दरम्यानच्या काळात मनपाने येथे आरोग्य केंद्र फक्त तडकाफडकी सुरू केले, एक वैद्यकीय अधिकारी, नर्स व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. ६ कोटी ६५ लाखांच्या जवळपास निधी मनपाने नगर परिषदेच्या खात्यावर वर्ग केला आहे; परंतु पूर्वीची वसुली आणि चालू वर्षाची वसुली, अल्पसंख्याकबहुल वसाहत धनादेश प्राप्त, अशी एकूण १ कोटी २३ लाख २४ हजार १२२ रुपये जमा झाले होते; परंतु या काळात समाविष्टतेचा वाद उफाळून आला आणि कायदेशीररीत्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस काढून हरकती व सूचना मागितल्या. वर्ग झालेली रक्कम व हिशोब परत करावा, असे मागणीपत्र नगर परिषदेने १ जानेवारी १६ रोजी पदभार सोपविल्यावरच दिले. या ६ महिन्यांच्या काळात महापालिकेने पाणीपुरवठ्यासह कर्मचारी वेतन, टँकरद्वारे पाणी खर्च, घनकचरा व्यवस्थापन खर्च, आरोग्य विभाग खर्च, असा एकूण १ कोटी ७४ लाख ३३ हजार १०३ रुपये खर्च झाले असल्याचा दावा केला आहे. महानगरपालिकेने प्राप्त निधीपेक्षा ५१ लाख ८,९८१ रुपये अधिकचे खर्च केले असून, ते नगर परिषदेने मनपाला वर्ग करावेत, असे नोटिसीद्वारे कळविले आहे. नागरी समस्यांसाठी आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपचे बाळासाहेब गायकवाड, अप्पासाहेब हिवाळे, स्वप्नील शिरसाट, दीपक गायकवाड, राहुल शिरसाट, शेख झिया, काँग्रेसचे तालुका सरचिटणीस हरिभाऊ राठोड, राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल शिंदे, अलियार खान आदींनी दिला आहे.