शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

सुविधा न देताच मनपाची वसुली

By admin | Updated: January 15, 2016 23:55 IST

औरंगाबाद : पाणीपुरवठ्याची बोंब आणि कचरा उचलला गेला नसतानाही महापालिकेने मागील सहा महिन्यांत या सेवा दिल्याचे सांगत सातारा- देवळाई नगर परिषदेकडे ५१ लाखांहून अधिक रकमेची मागणी करणारे पत्र दिले आहे.

औरंगाबाद : पाणीपुरवठ्याची बोंब आणि कचरा उचलला गेला नसतानाही महापालिकेने मागील सहा महिन्यांत या सेवा दिल्याचे सांगत सातारा- देवळाई नगर परिषदेकडे ५१ लाखांहून अधिक रकमेची मागणी करणारे पत्र दिले आहे. महापालिकेच्या मुख्य लेखाधिकाऱ्यांनी शुक्रवारी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना हे पत्र पाठविल्याने सातारा- देवळाईतील नागरिक आणि नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सातारा- देवळाई नगर परिषदेचा भाग महापालिकेत २१ मे रोजी २०१५ रोजी समाविष्ट करण्यात आला. दरम्यानच्या काळात मनपाने येथे आरोग्य केंद्र फक्त तडकाफडकी सुरू केले, एक वैद्यकीय अधिकारी, नर्स व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. ६ कोटी ६५ लाखांच्या जवळपास निधी मनपाने नगर परिषदेच्या खात्यावर वर्ग केला आहे; परंतु पूर्वीची वसुली आणि चालू वर्षाची वसुली, अल्पसंख्याकबहुल वसाहत धनादेश प्राप्त, अशी एकूण १ कोटी २३ लाख २४ हजार १२२ रुपये जमा झाले होते; परंतु या काळात समाविष्टतेचा वाद उफाळून आला आणि कायदेशीररीत्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस काढून हरकती व सूचना मागितल्या. वर्ग झालेली रक्कम व हिशोब परत करावा, असे मागणीपत्र नगर परिषदेने १ जानेवारी १६ रोजी पदभार सोपविल्यावरच दिले. या ६ महिन्यांच्या काळात महापालिकेने पाणीपुरवठ्यासह कर्मचारी वेतन, टँकरद्वारे पाणी खर्च, घनकचरा व्यवस्थापन खर्च, आरोग्य विभाग खर्च, असा एकूण १ कोटी ७४ लाख ३३ हजार १०३ रुपये खर्च झाले असल्याचा दावा केला आहे. महानगरपालिकेने प्राप्त निधीपेक्षा ५१ लाख ८,९८१ रुपये अधिकचे खर्च केले असून, ते नगर परिषदेने मनपाला वर्ग करावेत, असे नोटिसीद्वारे कळविले आहे. नागरी समस्यांसाठी आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपचे बाळासाहेब गायकवाड, अप्पासाहेब हिवाळे, स्वप्नील शिरसाट, दीपक गायकवाड, राहुल शिरसाट, शेख झिया, काँग्रेसचे तालुका सरचिटणीस हरिभाऊ राठोड, राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल शिंदे, अलियार खान आदींनी दिला आहे.