शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आठ वर्षे जुने पाईप टाकणार मनपा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 00:42 IST

पुंडलिकनगर जलकुंभ ते एन-५ पर्यंत ५०० मि.मी.ची जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे २०११ मध्ये उत्पादित केलेले पाईप २०१८ मध्ये वापरण्यात येणार असून, त्या पाईपची विल्हेवाट लावण्यासाठीच हे काम हाती घेण्यात आल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिकेच्या वेंधळ्या कारभाराचा एक नमुना पुन्हा एकदा समोर आला आहे. आयुक्त डी.एम. मुगळीकर यांनी नवीन जलवाहिनी टाकण्याच्या कामांना ब्रेक लावण्याचे आदेश दिलेले असतानाही पुंडलिकनगर जलकुंभ ते एन-५ पर्यंत ५०० मि.मी.ची जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे २०११ मध्ये उत्पादित केलेले पाईप २०१८ मध्ये वापरण्यात येणार असून, त्या पाईपची विल्हेवाट लावण्यासाठीच हे काम हाती घेण्यात आल्याचे दिसून येत आहे. रस्त्यावर पाईप पडले असून, ते नवीन वाटण्याऐवजी एकदम जुनाट झाल्याचे लक्षात येते.कुठल्याही पाईपची जल निर्वाहन क्षमता ही साधारणत: २० वर्षांची असते. मग ८ वर्षे जुने पाईप येथे का वापरण्यात येत आहेत? समांतर जलवाहिनीसाठी काम करणा-या कंपनीने खरेदी केलेले हे पाईप पालिकेतील महाभागांनी दडवून ठेवत आज बाहेर काढून हे काम काढले तर नाही ना, अशी शंका येत आहे.पुंडलिकनगर जलकुंभ पूर्णक्षमतेने भरत नसताना त्या जलकुंभावर ती पाईपलाईन एन-५ टाकण्यात येत असून, त्या कामाचे भूमिपूजनही लगबगीने उरकण्यात आले आहे. मागील अनेक वर्षांपासून कुठेतरी दडवून ठेवलेले पाईप या कामासाठी काढण्यात आल्याचे दिसते. १८ लाख रुपयांतून हे काम करण्यात येणार आहे.गेल्या सभेमध्ये प्रशासनाने पाणीपुरवठ्याचे स्पष्टीकरण देताना सांगितले की, मुकुंदवाडी, जयभवानीनगर, रामनगर, अंबिकानगर, चिकलठाणा, मसनतपूर, ठाकरेनगर या भागांना पाणीपुरवठा करण्यासाठी एन-५ ऐवजी पुंडलिकननगर जलकुंभावरून जलवाहिनी टाकण्यात येणार आहे; परंतु सध्या पाईप हनुमान चौक ते एन-४ च्या दिशेने येऊन पडले आहेत. मग ही जलवाहिनी वरील भागांना पाणीपुरवठा करण्याऐवजी कोणत्या भागासाठी टाकली जात आहे, असा प्रश्न आहे....तर रस्त्यावर उतरणारनगरसेवक तथा माजी सभागृह नेते गजानन मनगटे म्हणाले, पुंडलिकनगर जलकुंभ सद्य:स्थितीत पूर्ण क्षमतेने भरत नाही. १ लाख लोकांना पाणी देण्यासाठी तो जलकुंभ पूर्ण क्षमतेने भरण्याची जोपर्यंत व्यवस्था पालिका करीत नाही, तोपर्यंत येथून नवीन जलवाहिनी टाकण्याच्या कामाला आमचा विरोध राहील. या विरोधाला दुर्लक्ष करीत जर जलवाहिनी टाकली, तर ती उखडून फेकण्यात येईल, तसेच वेळप्रसंगी पुंडलिकनगर, न्यायनगर, गजानननगर परिसरातील नागरिकांना सोबत घेऊन आंदोलन केले जाईल.