शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
3
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
4
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
5
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
6
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
7
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
8
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
9
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
10
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
11
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
12
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
13
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
14
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
15
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
16
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
17
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
18
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
19
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम

शहर बस चालविण्यासाठी मनपा प्रशासन सरसावले

By admin | Updated: November 14, 2015 00:54 IST

औरंगाबाद : स्थायी समिती सभापतींच्या पत्रानंतर आता मनपा प्रशासनही शहर बससेवा सुरू करण्यासाठी सरसावले आहे. मनपाची शहर बससेवा सुरू करण्याच्या

औरंगाबाद : स्थायी समिती सभापतींच्या पत्रानंतर आता मनपा प्रशासनही शहर बससेवा सुरू करण्यासाठी सरसावले आहे. मनपाची शहर बससेवा सुरू करण्याच्या दृष्टीने खाजगी व्यक्तींकडून प्रस्ताव मागविण्याची तयारी प्रशासनाकडून करण्यात येत असल्याचे पालिकेतील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. दरम्यान, शहर बससेवेच्या प्रक्रियेला वेग आणण्यासाठी येत्या आठवड्यात पालिकेतील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची बैठकही होणार आहे. शहरात सध्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची शहर बससेवा सुरू आहे. मात्र, परिवहन महामंडळाकडून मोजक्याच बस रस्त्यावर उतरविण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे शहरवासीयांना सक्षम बससेवा मिळत नसल्याची परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर मनपातील स्थायी समिती सभापती दिलीप थोरात यांनी आठवडाभरापूर्वीच आयुक्तांना याबाबत पत्र दिले आहे. मनपाने ही सेवा पुन्हा स्वत:च्या ताब्यात घेण्यासाठी कार्यवाही सुरू करावी, असे यात म्हटले आहे. त्यानंतर आता प्रशासनानेही या दृष्टीने कार्यवाही सुरू केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. विशेष म्हणजे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनीही काही महिन्यांपूर्वीच मनपाने शहर बससेवा पुन्हा सुरू करावी, अशी सूचना केली होती. त्यामुळे आता मनपा प्रशासनही पूर्ण क्षमतेने कामाला लागले आहे. याआधीही मनपाने २००६ ते २०१० या काळात खाजगी ठेकेदाराच्या माध्यमातून शहर बससेवा चालविलेली आहे. आताही खाजगी ठेकेदाराच्या माध्यमातून ही सेवा चालविण्याचा पालिकेतील अधिकारी, पदाधिकाऱ्यांचा विचार आहे. हे करताना मागील वेळच्या चुका मात्र टाळण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचेही सूत्रांनी सांगितले. खाजगी ठेकेदारांकडून शहर बससेवा चालविण्यासंदर्भात लवकरच प्रस्ताव मागविले जाणार आहेत. त्यासाठीही तयारी प्रशासनाकडून केली जात आहे.