शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई ते अजिंठा हेलिकॉप्टर सेवा!

By admin | Updated: October 30, 2014 00:31 IST

औरंगाबाद : जगप्रसिद्ध अजिंठा लेण्या पाहण्यासाठी विदेशी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. विमानाने येणाऱ्या पर्यटकांना औरंगाबादहून वाहनाद्वारे ये-जा करावी लागते.

औरंगाबाद : जगप्रसिद्ध अजिंठा लेण्या पाहण्यासाठी विदेशी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. विमानाने येणाऱ्या पर्यटकांना औरंगाबादहून वाहनाद्वारे ये-जा करावी लागते. वेळ आणि पैसा जास्त जात असल्याने एमटीडीसीने मुंबई ते अजिंठा हवाईसेवा करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. दोन खाजगी कंपन्यांसोबत प्रशासनाचे चर्चाही सुरू केली आहे.दरमहा दीड हजारहून अधिक विदेशी पर्यटक अजिंठा लेण्या पाहण्यासाठी येतात. बहुतांश पर्यटक मुंबईहून विमानाद्वारे किंवा रेल्वेने औरंगाबादेत दाखल होतात. औरंगाबादहून १०९ कि.मी. वाहनाने प्रवास करून त्यांना अजिंठा येथे पोहोचावे लागते. काही विदेशी पर्यटकांना ही प्रक्रिया खूपच कठीण आणि क्लिष्ट वाटते. मुंबईहून थेट अजिंठा लेण्यापर्यंत किमान हेलिकॉप्टर सेवा असावी, अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे.यापूर्वी जिल्हा प्रशासनाने औरंगाबाद ते शिर्डी आणि अजिंठा हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्यासंदर्भात विचारविमर्श केला होता. मात्र, ही योजना प्रत्यक्षात अमलात आली नव्हती. महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या मुंबई कार्यालयाने यासंदर्भात पुन्हा एकदा पुढाकार घेतला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.अजिंठा येथे एमटीडीसीच्या जागेवर हेलिपॅड बांधण्यात आलेला आहे. मागील अनेक वर्षांपासून या हेलिपॅडचा वापरच होत नाही. मुंबईहून हेलिकॉप्टर सेवा सुरू केल्यास पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा एमटीडीसी प्रशासनाला आहे. या सेवेतून एमटीडीसीला काही उत्पन्न मिळेल. कारण हेलिपॅड एमटीडीसीच्या जागेवर आहे. विमानाने मुंबईहून औरंगाबादला येण्यासाठी किमान पाच हजार रुपये आणि औरंगाबाहून टॅक्सीद्वारे अजिंठा येथे जाण्यासाठी किमान दोन हजार रुपये खर्च येतो. मुंबईहून रेल्वेने पर्यटक आले तरी किमान ७०० ते ८०० रुपये लागतात. खर्चाचा सर्व हिशेब गृहीत धरून मुंबई ते अजिंठा हेलिकॉप्टर सेवेचे भाडेही पर्यटकांना परवडेल असेच ठेवण्याचा मानस एमटीडीसीने व्यक्त केला आहे.