शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

१३२ एकरमध्ये तुतीची लागवड

By admin | Updated: December 20, 2015 00:07 IST

हिंगोली : जिल्ह्यात रेशीम उत्पादनाचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत असून, १३२ एकरमध्ये १३४ शेतकरी रेशीमचे उत्पादन घेत आहेत.

हिंगोली : जिल्ह्यात रेशीम उत्पादनाचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत असून, १३२ एकरमध्ये १३४ शेतकरी रेशीमचे उत्पादन घेत आहेत. आतापर्यंत ५२ हजार १६५ अंडीपुंजचे वाटप शेतकऱ्यांना रेशीम कार्यालयातून केल्याची नोंद आहे. सुरुवातीच्या काळात जम्मू काश्मीर व पश्चिम बंगालमध्ये रेशीमची शेती फुलविली जात होती. आता महाराष्ट्रात रेशीम शेतीला उपयोगी हवामान असल्याने येथील शेतकरीही रेशीम शेतीकडे वळले आहेत. त्यातच हिंगोली जिल्ह्यातही रेशीम शेतीचे जाळे पसरले असून, शेतकरी लाखो रुपये उत्पन्न घेत आहेत. इतर पिकाच्या तुलनेत रेशीम शेतीमध्ये जोखीम कमी असून उत्पन्न मोठ्या प्रमाणात आहे. आज घडीला १३४ शेतकरी १३२ एकरवर रेशीमचे पीक घेत आहेत. त्यांना सन २०१४- १५ मध्ये ६५ हजार ५०० अंडीपुंजांचे संगोपन करुन ३० टन कोषाचे उत्पादन काढले. यात ७८ लाख रुपये उत्पन्न जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाले आहे. तर सन २०१५- १६ मध्ये वातावरण तुती लागवडीसाठी अनुकूल नसताना ८८ एकरवर तुतीची लावगड झालेली आहे. जुन्या आणि नवीन तुती लागवडीवर नोव्हेंबर २०१५ अखेर ५४ हजार अंडीपुंजाच्या वापरातून २५ टन कोषाचे उत्पादन घेवून त्यापासून ५४ लाख ५७ हजार २३१ रुपयाचे उत्पन्न कोष विक्रीतून प्राप्त झाले आहे. इतर पारंपरिक पिकांसारखी पाच ते सहा महिने उत्पादनाची प्रतीक्षा करण्याची गरज नाही. आजमितीला रेशीमचे उत्पन्न महिन्याकाठी ३० ते ४० हजारांचे होत असल्याने, शेतकऱ्यावर अडचणीचा सामना करण्याची वेळ येत नाही. आजपावेतो ५४९ शेतकरी अळीसंगोपन करीत असून ५० शेतकरी पिके घेत आहेत.