शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
2
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
3
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
4
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
5
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
6
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
7
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
8
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
9
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
10
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
11
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती
12
महिला विश्वचषक : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दिला धडा, मूनीचे निर्णायक शतक
13
जब गिल पर आया दिल, तो रोहित क्या चीज हैं !
14
महिला विश्वचषक : फलंदाजांना दाखवावा लागेल दम, आज दक्षिण आफ्रिकेच्या कडव्या आव्हानाचा करणार सामना
15
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
16
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
17
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
18
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
19
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
20
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या

१३२ एकरमध्ये तुतीची लागवड

By admin | Updated: December 20, 2015 00:07 IST

हिंगोली : जिल्ह्यात रेशीम उत्पादनाचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत असून, १३२ एकरमध्ये १३४ शेतकरी रेशीमचे उत्पादन घेत आहेत.

हिंगोली : जिल्ह्यात रेशीम उत्पादनाचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत असून, १३२ एकरमध्ये १३४ शेतकरी रेशीमचे उत्पादन घेत आहेत. आतापर्यंत ५२ हजार १६५ अंडीपुंजचे वाटप शेतकऱ्यांना रेशीम कार्यालयातून केल्याची नोंद आहे. सुरुवातीच्या काळात जम्मू काश्मीर व पश्चिम बंगालमध्ये रेशीमची शेती फुलविली जात होती. आता महाराष्ट्रात रेशीम शेतीला उपयोगी हवामान असल्याने येथील शेतकरीही रेशीम शेतीकडे वळले आहेत. त्यातच हिंगोली जिल्ह्यातही रेशीम शेतीचे जाळे पसरले असून, शेतकरी लाखो रुपये उत्पन्न घेत आहेत. इतर पिकाच्या तुलनेत रेशीम शेतीमध्ये जोखीम कमी असून उत्पन्न मोठ्या प्रमाणात आहे. आज घडीला १३४ शेतकरी १३२ एकरवर रेशीमचे पीक घेत आहेत. त्यांना सन २०१४- १५ मध्ये ६५ हजार ५०० अंडीपुंजांचे संगोपन करुन ३० टन कोषाचे उत्पादन काढले. यात ७८ लाख रुपये उत्पन्न जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाले आहे. तर सन २०१५- १६ मध्ये वातावरण तुती लागवडीसाठी अनुकूल नसताना ८८ एकरवर तुतीची लावगड झालेली आहे. जुन्या आणि नवीन तुती लागवडीवर नोव्हेंबर २०१५ अखेर ५४ हजार अंडीपुंजाच्या वापरातून २५ टन कोषाचे उत्पादन घेवून त्यापासून ५४ लाख ५७ हजार २३१ रुपयाचे उत्पन्न कोष विक्रीतून प्राप्त झाले आहे. इतर पारंपरिक पिकांसारखी पाच ते सहा महिने उत्पादनाची प्रतीक्षा करण्याची गरज नाही. आजमितीला रेशीमचे उत्पन्न महिन्याकाठी ३० ते ४० हजारांचे होत असल्याने, शेतकऱ्यावर अडचणीचा सामना करण्याची वेळ येत नाही. आजपावेतो ५४९ शेतकरी अळीसंगोपन करीत असून ५० शेतकरी पिके घेत आहेत.