शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

महावितरणने तीन दिवसांत साडेबाराशे शेतकऱ्यांची केली वीज कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:05 IST

गंगापूर : तालुक्यात महावितरणने थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या तीन दिवसांतं तब्बल साडेबाराशे शेतकऱ्यांची वीज कपात केल्याने शेतकऱ्यांच्या ...

गंगापूर : तालुक्यात महावितरणने थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या तीन दिवसांतं तब्बल साडेबाराशे शेतकऱ्यांची वीज कपात केल्याने शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांवर संकट उभारले आहे. तर शेतकरी वर्गात महावितरणविरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे याच तीन दिवसाच्या कालावधीत १५ लाखांची वसुली झाल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.

गेल्या अनेक वर्षांच्या कालखंडानंतर यावर्षी समाधानकारक पाऊस झाला. मात्र अतिवृष्टीने खरीप पिकाचे नुकसान झाले आहे. त्यानंतर रब्बी पिकाची लागवड शेतकऱ्यांनी केली. रब्बी पिकाची वाढ होताना त्याला पाणी देणे आवश्यक आहे, अशाच कालावधीत महावितरणकडून कमी दाबाने वीजपुरवठा केला जात असल्याने अनेक त्रास सहन करून पाणी द्यावे लागत आहे. त्यात आणखी भरीस भर म्हणजे दि. १० फेब्रुवारीपासून थकबाकीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे ऐन बहरात आलेली पीक कोमजल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

यंदा सगळीकडेच रब्बी पीक जोमात आले आहे. मात्र, महावितरणच्या वक्रदृष्टीमुळे बळीराजा संकटात सापडला आहे. तालुक्यात एकूण २७,८०७ नोंदणीकृत वीजग्राहकांकडे सप्टेंबर २०२०प्रमाणे ३९५.६२ कोटी थकबाकी आहे. त्यावरील व्याज शासनाने माफ करून सुधारित निव्वळ थकबाकी २४१.६७ कोटी आहे. 'कृषी धोरण-२०२०' प्रमाणे भरणा केल्यास १३०.०६ कोटी रुपये ग्राहकांना भरावे लागणार आहे. त्याप्रमाणे महावितरणकडून सध्या जोरदार वसुली सुरू आहे. थकबाकी न भरणाऱ्यां शेतकऱ्यांचा वीजपुरवठा थेट खंडित केला जात असून, आतापर्यंत ११० रोहित्रासहित १,२५० शेतकऱ्यांची वीज कापण्यात आली आहे. त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. याविरोधात अनेक पक्ष संघटनानी आवाज उठवला असून, मोठ्या आंदोलनाची तयारी केली जात आहे.

-----

तीन दिवसांत पंधरा लाखांची वसुली

महावितरणकडून थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. दि. १० फेब्रुवारीपासून तालुक्यातील वसुलीचे काम केले जात आहे. महावितरणच्या या सक्तीच्या वसुलीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत, तर या तीन दिवसांत गंगापूर महावितरण कार्यालयाने पंधरा लाखांची वसुली केली आहे.

---------

प्रतिक्रिया

यापूर्वी व्याज आणि विलंब शुल्कात सूट दिली जायची, पण क्रांतिकारी 'कृषी वीज धोरण २०२०' नुसार मूळ मुद्दलात सूट दिल्याने शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. वीजबिल थकबाकी शेतकऱ्यांनी स्वतःपुढे येऊन वीजबिल भरणा करण्यास हातभार लावावा. या धोरणाप्रमाणे बिले भरणाऱ्या ग्राहकांचा आम्ही सत्कार करून जनजागृती करणार आहोत.

- रवींद्र गायकवाड, उपकार्यकारी अभियंता, महावितरण, गंगापूर

लॉकडाऊनमुळे मालाचे भाव पडले असून अतिवृष्टीमुळे रब्बीचे उत्पन्न वाया गेले होते. यातच शासनाकडून अद्याप नुकसानभरपाईदेखील मिळाली नसल्याने आमच्याकडे वीजबिलं भरण्यास पैसे नाही. सक्तीने वीजपुरवठा खंडित केल्यास आम्ही त्याला तीव्र विरोध करणार आहोत.

-भाऊसाहेब पाटील शेळके, शेतकरी

------