शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

महावितरणने तीन दिवसांत साडेबाराशे शेतकऱ्यांची केली वीज कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:05 IST

गंगापूर : तालुक्यात महावितरणने थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या तीन दिवसांतं तब्बल साडेबाराशे शेतकऱ्यांची वीज कपात केल्याने शेतकऱ्यांच्या ...

गंगापूर : तालुक्यात महावितरणने थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या तीन दिवसांतं तब्बल साडेबाराशे शेतकऱ्यांची वीज कपात केल्याने शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांवर संकट उभारले आहे. तर शेतकरी वर्गात महावितरणविरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे याच तीन दिवसाच्या कालावधीत १५ लाखांची वसुली झाल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.

गेल्या अनेक वर्षांच्या कालखंडानंतर यावर्षी समाधानकारक पाऊस झाला. मात्र अतिवृष्टीने खरीप पिकाचे नुकसान झाले आहे. त्यानंतर रब्बी पिकाची लागवड शेतकऱ्यांनी केली. रब्बी पिकाची वाढ होताना त्याला पाणी देणे आवश्यक आहे, अशाच कालावधीत महावितरणकडून कमी दाबाने वीजपुरवठा केला जात असल्याने अनेक त्रास सहन करून पाणी द्यावे लागत आहे. त्यात आणखी भरीस भर म्हणजे दि. १० फेब्रुवारीपासून थकबाकीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे ऐन बहरात आलेली पीक कोमजल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

यंदा सगळीकडेच रब्बी पीक जोमात आले आहे. मात्र, महावितरणच्या वक्रदृष्टीमुळे बळीराजा संकटात सापडला आहे. तालुक्यात एकूण २७,८०७ नोंदणीकृत वीजग्राहकांकडे सप्टेंबर २०२०प्रमाणे ३९५.६२ कोटी थकबाकी आहे. त्यावरील व्याज शासनाने माफ करून सुधारित निव्वळ थकबाकी २४१.६७ कोटी आहे. 'कृषी धोरण-२०२०' प्रमाणे भरणा केल्यास १३०.०६ कोटी रुपये ग्राहकांना भरावे लागणार आहे. त्याप्रमाणे महावितरणकडून सध्या जोरदार वसुली सुरू आहे. थकबाकी न भरणाऱ्यां शेतकऱ्यांचा वीजपुरवठा थेट खंडित केला जात असून, आतापर्यंत ११० रोहित्रासहित १,२५० शेतकऱ्यांची वीज कापण्यात आली आहे. त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. याविरोधात अनेक पक्ष संघटनानी आवाज उठवला असून, मोठ्या आंदोलनाची तयारी केली जात आहे.

-----

तीन दिवसांत पंधरा लाखांची वसुली

महावितरणकडून थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. दि. १० फेब्रुवारीपासून तालुक्यातील वसुलीचे काम केले जात आहे. महावितरणच्या या सक्तीच्या वसुलीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत, तर या तीन दिवसांत गंगापूर महावितरण कार्यालयाने पंधरा लाखांची वसुली केली आहे.

---------

प्रतिक्रिया

यापूर्वी व्याज आणि विलंब शुल्कात सूट दिली जायची, पण क्रांतिकारी 'कृषी वीज धोरण २०२०' नुसार मूळ मुद्दलात सूट दिल्याने शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. वीजबिल थकबाकी शेतकऱ्यांनी स्वतःपुढे येऊन वीजबिल भरणा करण्यास हातभार लावावा. या धोरणाप्रमाणे बिले भरणाऱ्या ग्राहकांचा आम्ही सत्कार करून जनजागृती करणार आहोत.

- रवींद्र गायकवाड, उपकार्यकारी अभियंता, महावितरण, गंगापूर

लॉकडाऊनमुळे मालाचे भाव पडले असून अतिवृष्टीमुळे रब्बीचे उत्पन्न वाया गेले होते. यातच शासनाकडून अद्याप नुकसानभरपाईदेखील मिळाली नसल्याने आमच्याकडे वीजबिलं भरण्यास पैसे नाही. सक्तीने वीजपुरवठा खंडित केल्यास आम्ही त्याला तीव्र विरोध करणार आहोत.

-भाऊसाहेब पाटील शेळके, शेतकरी

------