शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

महावितरणने तीन दिवसांत साडेबाराशे शेतकऱ्यांची केली वीज कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:05 IST

गंगापूर : तालुक्यात महावितरणने थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या तीन दिवसांतं तब्बल साडेबाराशे शेतकऱ्यांची वीज कपात केल्याने शेतकऱ्यांच्या ...

गंगापूर : तालुक्यात महावितरणने थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या तीन दिवसांतं तब्बल साडेबाराशे शेतकऱ्यांची वीज कपात केल्याने शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांवर संकट उभारले आहे. तर शेतकरी वर्गात महावितरणविरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे याच तीन दिवसाच्या कालावधीत १५ लाखांची वसुली झाल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.

गेल्या अनेक वर्षांच्या कालखंडानंतर यावर्षी समाधानकारक पाऊस झाला. मात्र अतिवृष्टीने खरीप पिकाचे नुकसान झाले आहे. त्यानंतर रब्बी पिकाची लागवड शेतकऱ्यांनी केली. रब्बी पिकाची वाढ होताना त्याला पाणी देणे आवश्यक आहे, अशाच कालावधीत महावितरणकडून कमी दाबाने वीजपुरवठा केला जात असल्याने अनेक त्रास सहन करून पाणी द्यावे लागत आहे. त्यात आणखी भरीस भर म्हणजे दि. १० फेब्रुवारीपासून थकबाकीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे ऐन बहरात आलेली पीक कोमजल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

यंदा सगळीकडेच रब्बी पीक जोमात आले आहे. मात्र, महावितरणच्या वक्रदृष्टीमुळे बळीराजा संकटात सापडला आहे. तालुक्यात एकूण २७,८०७ नोंदणीकृत वीजग्राहकांकडे सप्टेंबर २०२०प्रमाणे ३९५.६२ कोटी थकबाकी आहे. त्यावरील व्याज शासनाने माफ करून सुधारित निव्वळ थकबाकी २४१.६७ कोटी आहे. 'कृषी धोरण-२०२०' प्रमाणे भरणा केल्यास १३०.०६ कोटी रुपये ग्राहकांना भरावे लागणार आहे. त्याप्रमाणे महावितरणकडून सध्या जोरदार वसुली सुरू आहे. थकबाकी न भरणाऱ्यां शेतकऱ्यांचा वीजपुरवठा थेट खंडित केला जात असून, आतापर्यंत ११० रोहित्रासहित १,२५० शेतकऱ्यांची वीज कापण्यात आली आहे. त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. याविरोधात अनेक पक्ष संघटनानी आवाज उठवला असून, मोठ्या आंदोलनाची तयारी केली जात आहे.

-----

तीन दिवसांत पंधरा लाखांची वसुली

महावितरणकडून थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. दि. १० फेब्रुवारीपासून तालुक्यातील वसुलीचे काम केले जात आहे. महावितरणच्या या सक्तीच्या वसुलीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत, तर या तीन दिवसांत गंगापूर महावितरण कार्यालयाने पंधरा लाखांची वसुली केली आहे.

---------

प्रतिक्रिया

यापूर्वी व्याज आणि विलंब शुल्कात सूट दिली जायची, पण क्रांतिकारी 'कृषी वीज धोरण २०२०' नुसार मूळ मुद्दलात सूट दिल्याने शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. वीजबिल थकबाकी शेतकऱ्यांनी स्वतःपुढे येऊन वीजबिल भरणा करण्यास हातभार लावावा. या धोरणाप्रमाणे बिले भरणाऱ्या ग्राहकांचा आम्ही सत्कार करून जनजागृती करणार आहोत.

- रवींद्र गायकवाड, उपकार्यकारी अभियंता, महावितरण, गंगापूर

लॉकडाऊनमुळे मालाचे भाव पडले असून अतिवृष्टीमुळे रब्बीचे उत्पन्न वाया गेले होते. यातच शासनाकडून अद्याप नुकसानभरपाईदेखील मिळाली नसल्याने आमच्याकडे वीजबिलं भरण्यास पैसे नाही. सक्तीने वीजपुरवठा खंडित केल्यास आम्ही त्याला तीव्र विरोध करणार आहोत.

-भाऊसाहेब पाटील शेळके, शेतकरी

------