शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणने तीन दिवसांत साडेबाराशे शेतकऱ्यांची केली वीज कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:05 IST

गंगापूर : तालुक्यात महावितरणने थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या तीन दिवसांतं तब्बल साडेबाराशे शेतकऱ्यांची वीज कपात केल्याने शेतकऱ्यांच्या ...

गंगापूर : तालुक्यात महावितरणने थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या तीन दिवसांतं तब्बल साडेबाराशे शेतकऱ्यांची वीज कपात केल्याने शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांवर संकट उभारले आहे. तर शेतकरी वर्गात महावितरणविरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे याच तीन दिवसाच्या कालावधीत १५ लाखांची वसुली झाल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.

गेल्या अनेक वर्षांच्या कालखंडानंतर यावर्षी समाधानकारक पाऊस झाला. मात्र अतिवृष्टीने खरीप पिकाचे नुकसान झाले आहे. त्यानंतर रब्बी पिकाची लागवड शेतकऱ्यांनी केली. रब्बी पिकाची वाढ होताना त्याला पाणी देणे आवश्यक आहे, अशाच कालावधीत महावितरणकडून कमी दाबाने वीजपुरवठा केला जात असल्याने अनेक त्रास सहन करून पाणी द्यावे लागत आहे. त्यात आणखी भरीस भर म्हणजे दि. १० फेब्रुवारीपासून थकबाकीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे ऐन बहरात आलेली पीक कोमजल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

यंदा सगळीकडेच रब्बी पीक जोमात आले आहे. मात्र, महावितरणच्या वक्रदृष्टीमुळे बळीराजा संकटात सापडला आहे. तालुक्यात एकूण २७,८०७ नोंदणीकृत वीजग्राहकांकडे सप्टेंबर २०२०प्रमाणे ३९५.६२ कोटी थकबाकी आहे. त्यावरील व्याज शासनाने माफ करून सुधारित निव्वळ थकबाकी २४१.६७ कोटी आहे. 'कृषी धोरण-२०२०' प्रमाणे भरणा केल्यास १३०.०६ कोटी रुपये ग्राहकांना भरावे लागणार आहे. त्याप्रमाणे महावितरणकडून सध्या जोरदार वसुली सुरू आहे. थकबाकी न भरणाऱ्यां शेतकऱ्यांचा वीजपुरवठा थेट खंडित केला जात असून, आतापर्यंत ११० रोहित्रासहित १,२५० शेतकऱ्यांची वीज कापण्यात आली आहे. त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. याविरोधात अनेक पक्ष संघटनानी आवाज उठवला असून, मोठ्या आंदोलनाची तयारी केली जात आहे.

-----

तीन दिवसांत पंधरा लाखांची वसुली

महावितरणकडून थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. दि. १० फेब्रुवारीपासून तालुक्यातील वसुलीचे काम केले जात आहे. महावितरणच्या या सक्तीच्या वसुलीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत, तर या तीन दिवसांत गंगापूर महावितरण कार्यालयाने पंधरा लाखांची वसुली केली आहे.

---------

प्रतिक्रिया

यापूर्वी व्याज आणि विलंब शुल्कात सूट दिली जायची, पण क्रांतिकारी 'कृषी वीज धोरण २०२०' नुसार मूळ मुद्दलात सूट दिल्याने शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. वीजबिल थकबाकी शेतकऱ्यांनी स्वतःपुढे येऊन वीजबिल भरणा करण्यास हातभार लावावा. या धोरणाप्रमाणे बिले भरणाऱ्या ग्राहकांचा आम्ही सत्कार करून जनजागृती करणार आहोत.

- रवींद्र गायकवाड, उपकार्यकारी अभियंता, महावितरण, गंगापूर

लॉकडाऊनमुळे मालाचे भाव पडले असून अतिवृष्टीमुळे रब्बीचे उत्पन्न वाया गेले होते. यातच शासनाकडून अद्याप नुकसानभरपाईदेखील मिळाली नसल्याने आमच्याकडे वीजबिलं भरण्यास पैसे नाही. सक्तीने वीजपुरवठा खंडित केल्यास आम्ही त्याला तीव्र विरोध करणार आहोत.

-भाऊसाहेब पाटील शेळके, शेतकरी

------