शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

एमआरईजीएसच्या विहिरी अजूनही मंजुरीअभावी कोरड्याच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:05 IST

कन्नड : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत पंचायत समितीच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या वैयक्तिक सिंचन विहिरींच्या मंजुरीसाठीची रखडलेली प्रक्रिया अजूनही ...

कन्नड : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत पंचायत समितीच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या वैयक्तिक सिंचन विहिरींच्या मंजुरीसाठीची रखडलेली प्रक्रिया अजूनही मार्गी लागलेली नाही. त्यामुळे एक महिन्यापासून तालुक्यात यावरून उठलेले वादळ हाच मोठा विषय ठरला आहे.

पंचायत समितीच्या माध्यमातून एमआरईजीएस अंतर्गत वैयक्तिक सिंचन विहिरींचा लाभ दिला जातो. त्यासाठी शासनाच्या नियमानुसार फाईल पंचायत समितीत दाखल केल्यानंतर तिची पडताळणी केली जाते. बऱ्याचदा दाखल करण्यात आलेली फाईल आणि प्रत्यक्षात वस्तुस्थिती यामध्ये तफावत आढळून येते, म्हणून स्थळपाहणी हा पर्याय खुला असतो. स्थळपाहणी अहवालात पात्र असलेल्या फाईल मंजुरी प्रक्रियेत समाविष्ट केल्या जातात.

पंचायत समितीत वैयक्तिक सिंचन विहिरींच्या लाभासाठी ८६८ फाईल दाखल करण्यात आलेल्या आहेत. या फाईल मंजूर कराव्यात, यावरून तत्कालीन गटविकास अधिकारी व पंचायत समिती पदाधिकारी यांच्यात बरेच खटके उडाले. गटविकास अधिकारी डॉ. वेणीकर यांनी प्राप्त फाईलींची कार्यालय पातळीवर पडताळणी केली; मात्र एकही फाईल मंजूर झाली नाही. त्यामुळे पं.स.च्या पदाधिकारी व बीडीओ यांच्यात शीतयुद्ध पेटले. बीडीओ डॉ. वेणीकर यांना कार्यमुक्त करण्याचा ठराव पदाधिकाऱ्यांनी घेतला. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदावले यांनी मध्यस्थी करून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार ६७२ फाईलच्या त्रुटींची पूर्तता करून परिपूर्ण फाईलधारकांची स्थळपाहणी करण्यासाठी ८ विस्तार अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. स्थळपाहणीत पात्र असलेल्या फाईल मंजूर करण्याबाबत कार्यवाही होईल, असे अपेक्षित होते; पण त्या अगोदरच २२ जूनपासून बीडीओ डॉ. वेणीकर अर्जित रजेवर गेले आणि खुल्ताबाद बीडीओ प्रवीण सुरडकर यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार देण्यात आला.

चौकट

प्रशासन-पदाधिकाऱ्यांच्या वादात सामान्यांचे नुकसान

सिंचन विहिरींसाठी पात्र फाईल लाभार्थींची स्थळपाहणी अजूनही पूर्ण करण्यात आलेली नाही. यावरून प्रशासकीय यंत्रणा किती बेजबाबदार पद्धतीने वागते, याचा हा नमुना आहे. अशा या नकारात्मक भावना ठेवून काम करणाऱ्या झारीतील शुक्राचार्यांमुळे खऱ्या आणि गरजू लाभार्थींवर अन्याय होत आहे. तर विशिष्ट लाभार्थींचीच स्थळपाहणी करावी, असा दबाव असल्याचे प्रशासकीय अधिकारी खासगीत सांगतात. यात सत्यता किती याचा खुलासा जाहीरपणे कुणी करीत नसले तरी प्रशासन विरुद्ध पदाधिकारी या वादात सर्वसामान्यांचे नुकसान होत आहे.