शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

एमपीएससी विद्यार्थ्यानो इकडे लक्ष द्या; चेकनाक्यावर कोरोना पॉझिटिव्ह येणारे मुकणार परीक्षेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 15:49 IST

रविवारी होणाऱ्या परीक्षेसाठी ५० टक्क्यांहून अधिक विद्यार्थी बाहेरच्या जिल्ह्यातून येणार असून त्यांना अँटिजेन तपासणीला सामोरे जावे लागणार आहे.

ठळक मुद्दे काहीजण पॉझिटिव्ह आले, तर त्यांना मात्र परीक्षेला मुकावे लागणार आहे. त्यांना परीक्षा केंद्रापर्यंत नेण्याची कोणतीही सुविधा करण्यात येणार नाही

औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्यामुळे शहरात प्रवेश करणाऱ्या सर्व मार्गावर, बसस्थानक, रेल्वेस्टेशन येथे बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवशांची शनिवारपासून अँटिजेन तपासणी केली जाणार आहे. तथापि, रविवारी होणाऱ्या परीक्षेसाठी ५० टक्क्यांहून अधिक विद्यार्थी बाहेरच्या जिल्ह्यातून येणार असून त्यांना अँटिजेन तपासणीला सामोरे जावे लागणार आहे. यापैकी काहीजण पॉझिटिव्ह आले, तर त्यांना मात्र परीक्षेला मुकावे लागणार आहे. त्यांना परीक्षा केंद्रापर्यंत नेण्याची कोणतीही सुविधा करण्यात येणार नाही, असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

१४ मार्च रोजी होणारी एमपीएससी राज्यसेवा पूर्वपरीक्षा आता २१ मार्च रोजी घेतली जाणार आहे. या परीक्षेचे नियोजन जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे. औरंगाबादेत ५९ परीक्षा केंद्रांवर १९ हजार ६५६ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. रविवारी सकाळ व दुपार अशा दोन सत्रांत ही परीक्षा होणार आहे. रविवारी संपूर्ण दिवस लॉकडाऊन असल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेला येताना पाणी व जेवणाची व्यवस्था स्वत: करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

रविवारी या परीक्षेसाठी केंद्रप्रमुख, सहकेंद्रप्रमुख, समन्वयक, पर्यवेक्षक, सहपर्यवेक्षक, समावेशक, भरारी पथक, लिपिक, वाहनचालक, बेलमन, स्वच्छता कर्मचारी, केअर टेकर, सहायक कर्मचारी आदी १६५० कर्मचारी- अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. तथापि, दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या प्रशिक्षणादरम्यान, केंद्रप्रमुखांसह परीक्षा केंद्रांवर तैनात कर्मचाऱ्यांना ‘आरटीपीसीआर’ तपासणी सक्तीची केली आहे. जिल्हा प्रशासनाची ही सूचना आजपर्यंत कोणीही गांभिर्याने घेतली नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने याबाबत केंद्राध्यक्षांना तीनेवळा स्मरणपत्र दिले असून केंद्रांवरील नियुक्त कर्मचाऱ्यांच्या तपासणीची जबाबदारी आता केंद्राध्यक्षांवर सोपविण्यात आली आहे.

केंद्रांवर ‘पीपीई किट’ची सुविधाया परीक्षेसाठी ५९ केंद्रांवर विद्यार्थ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रात येण्यापूर्वीच प्रवेशद्वारात विद्यार्थ्यांचे तापमान व ऑक्सिजन पातळी मोजली जणार आहे. काही विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाबाबतची थोडीशी जरी लक्षणे आढळून आली, तर अशा संशयित विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी वेगळी व्यवस्था केली जाणार आहे. गंभीर लक्षणे दिसणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘पीपीई किट’ घालून परीक्षा देण्याचीदेखिल व्यवस्था करण्यात आली असून प्रत्येक केंद्रांवर ‘पीपीई किट’ ठेवले जाणार आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद