शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

एमपीएससीचे विद्यार्थी गोंधळात; परीक्षांच्या तारखांचा लागला घोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:04 IST

विजय सरवदे औरंगाबाद : राज्य आयोगाने २०२० मध्ये जाहीर केलेली राज्य सेवा पूर्वपरीक्षा सातत्याने पुढे ढकलली जात असल्याने विद्यार्थी ...

विजय सरवदे

औरंगाबाद : राज्य आयोगाने २०२० मध्ये जाहीर केलेली राज्य सेवा पूर्वपरीक्षा सातत्याने पुढे ढकलली जात असल्याने विद्यार्थी यंदाच्या मार्च महिन्यात रस्त्यावर उतरले. राज्यभरात आक्रमक आंदोलन झाल्यानंतर अखेर २१ मार्च रोजी ती परीक्षा घेतली. मात्र, त्या परीक्षेचा निकाल अजूनही जाहीर केलेला नाही. कधी कोविडचे, तर कधी मराठा आरक्षणाचे कारण सांगत सतत परीक्षा पुढे ढकलल्या जात आहेत. नवीन जाहिरात येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चालले असून ते नैराश्याच्या गर्तेत सापडले आहेत. दोन वर्षांपूर्वी पोलीस उपनिरीक्षक पदाची मुख्य परीक्षा परीक्षा पास झाली. मात्र, एमपीएससीकडून अजूनही शारीरिक चाचणी व मुलाखत घेतली जात नाही. सन २०१८ मध्ये झालेल्या राजपत्रित अधिकाऱ्यांच्या जागांवर निवड झालेल्या उमेदवारांना अद्यापही नियुक्ती दिलेली नाही. एकंदरीतच राज्य लोकसेवा आयोगाच्या गोंधळाचा परिणाम विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर होत आहे. दोन वर्षांत नवीन एकही जाहिरात जाहीरात नाही. संयुक्त पूर्वपरीक्षा पाचवेळा पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नैराश्याची भावना निर्माण झाली. केंद्रीय लोकसेवा आयोगाप्रमाणे राज्य लोकसेवा आयोगाने परीक्षा, निकाल व निवडप्रक्रियेचे वेळापत्रक राबवावे, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांची आहे. एकंदरीत राज्य लोकसेवा आयोगाचे बिघडलेले वेळापत्रक पूर्वपदावर कधी येणार, याकडे विद्यार्थी डोळे लावून बसले आहेत.

चौकट.....

या वर्षीच्या परीक्षांच्या तारखा कधी जाहीर होणार

- यंदा परीक्षा होईल की नाही, ते निश्चितपणे कोणीही सांगू शकत नाही. मागील अडीच वर्षांपासून राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे वेळापत्रक बिघडले आहे. राज्य लोकसेवा आयोगाकडे परीक्षा घेण्याचे नियोजन नाही.

- परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी गोंधळात पडले असून, अनेक विद्यार्थी नैराश्याच्या गर्तेत सापडले आहेत, तर दोन दिवसांपूर्वी एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने नैराश्यातून आत्महत्या केल्यामुळे पालकांनाही चिंता सतावत आहे.

चौकट....

ऑनलाइन क्लास किती दिवस चालणार

- कोरोनामुळे मागील दीड वर्षांहून अधिक काळापासून ऑफलाइन क्लास घेण्यासाठी शासनाने बंदी घातली आहे. त्यामुळे ऑनलाइन क्लास घेतले जातात. यापुढे आणखी किती दिवस हे असेच चालेले हे सांगता येत नाही.

- विद्यार्थी म्हणतात, ऑनलाइन क्लासमध्ये संकल्पना स्पष्ट होत नाहीत. त्यामुळे या क्लासेसला फारसा प्रतिसाद भेटत नाही.

- प्रतिसाद मिळत नसला तरी क्लासेसचे सातत्य टिकवून ठेवण्यासाठी ऑनलाइन क्लासेस चालवावे लागतात, असे क्लासेस चालकांचे म्हणणे आहे.

चौकट.............

क्लासचालकही अडचणीत

१८ महिन्यांपासून शासनाने क्लासेसला ऑफलाइन चालविण्यासाठी परवानगी दिलेली नाही. ऑनलाइनला प्रतिसाद मिळत नाही. औरंगाबादेत पाच हजार शिक्षक बेजरोगार झाले आहेत. आमच्यासमोर भाड्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. प्रवेश नाहीत. त्यामुळे क्लासचालक कर्जबाजारी झाले आहेत. आमच्यावर बेंच विकण्याची वेळ आली आहे.

- धनंजय आकात, क्लास चालक

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या क्लासेसच्या विद्यार्थ्यांना सरकारने शालेय विद्यार्थ्यांप्रमाणे ग्राह्य धरले व कोरोनाचे कारण देत क्लासेस बंद ठेवले आहेत. क्लास बंद असले, तरी आम्हाला दरमहा भाडे द्यावेच लागते. मागच्या १८ महिन्यांपासून आम्ही भाडे भरत आहोत. आता आमच्याकडेच पैसे नाहीत, तर शिक्षकांना आम्ही कुठपर्यंत आणि कोठून पैसे देणार.

- कृष्णा जाधव, क्लासचालक

चौकट..........

विद्यार्थ्यांचे वय निघून चालले

ऑनलाइन क्लासमध्ये फारसे समजत नाहीत. प्रश्न विचारता येत नाही. प्रश्न विचारले तर, त्याचे नीट निरसन होत नाही. दोन-अडीच वर्षांपासून आम्ही तयारी करती आहोत; पण परीक्षाच झाली नाही. आम्ही आणखी किती दिवस तयारी करायची. आमची निराशा झाली आहे. वय वाढत चालले आहे. काय करावे सूचत नाही.

- संतोष जाधव, विद्यार्थी

कोरोनामुळे परीक्षा पुढे ढकलाव्या लागत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. मग, या काळात मोर्चे, आंदोलने, बैठका चालतात आणि विद्यार्थ्यांच्या परीक्षाच चालत नाही, हा कुठला न्याय आहे. एमपीएससी परीक्षेची अनिश्चितता, वाढत चालले वय आणि दुसरीकडे नातेवाइकांकडून होणारी विचारपूस, यामुळे मनोबल खचत चालले आहे.

- रोहिणी जाधव, विद्यार्थिनी