रेल्वेस्टेशनवर झालेल्या बैठकीस खा. भागवत कराड यांच्यासह माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, ‘सीआयआय’चे मुकुंद कुलकर्णी, मसिआचे नारायण पवार, ‘सीएमआयए’चे कमलेश धूत, औरंगाबाद फर्स्टचे हेमंत लांडगे, मध्य रेल्वेचे नांदेड आणि सिकंदराबाद येथील अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर खा. कराड यांनी पत्रकारांशी संवाद साधला. औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर सिग्नल कंट्रोल रुम आहे. तर दौलताबादला छावणीची जागा आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी पीटलाईन अशक्य आहे. त्यामुळे चिकलठाणा येथे पीटलाईन करण्यासाठी ३० डिसेंबरपूर्वी प्रस्ताव पाठविण्याची सूचना केल्याचे त्यांनी सांगितले. जागेअभावी चिकलठाणा येथील प्रस्ताव यापूर्वीच प्रस्ताव नाकारण्यात आला आहे. याविषयी उपिंदरसिंग म्हणाले, प्रस्ताव मंजूर करण्याचे काम रेल्वे बोर्डाचे आहे. आमचे काम प्रस्ताव पाठविण्याचे आहे. सर (खा. कराड) प्रेशराईज करत आहे. आम्ही प्रस्ताव पाठवू असे ते म्हणाले.
...अन्यथा मी भूमिपूजन करेन
मनमाड-परभणी या ३२० कि. मी. मार्गाच्या विद्युतीकरणाच्या कामाची निविदाप्रक्रिया पूर्ण झालेली आहे. जानेवारीत रेल्वेमंत्र्याच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन होईल. त्यासाठी रेल्वेमंत्री येतील अथवा आनलाईन पद्धतीने कामाचा प्रारंभ होईल. कोणीही नसेल तर मी करेल, असे खा. कराड म्हणाले.
पार्सल रेल्वे, पंचवटी, गोदावरी एक्स्प्रेसचा विस्तार
शहरातील उद्योजकांनी पंतनगर येथे मालवाहतुकीसाठी पार्सल रेल्वेची मागणी केली. त्यावर सकारात्मक दर्शविण्यात आली. पंचवटी एक्स्प्रेस, गोदावरी एक्स्प्रेसचा औरंगाबादपर्यंत विस्तार करण्याचेही संकेत रेल्वे अधिकाऱ्यांनी दिले.
बैठकीतील निर्णय
-भांगसीमाता गड परिसरातील रेल्वेमार्गावर भुयारी मार्ग.
-शिवाजीनगर येथील भुयारी मार्गासाठी जिल्हाधिकाऱ्यांची एनओसी घेणे.
-औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर बीड बायपासच्या दिशेने तिकीट कक्ष.