शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

खासदारकीमुळे महायुतीचे मनोबल वाढले

By admin | Updated: June 10, 2014 00:55 IST

उन्मेष पाटील , कळंब जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात कधीही पराभव न पाहणारे डॉ. पद्मसिंह पाटील यांना सव्वादोन लाख मतांनी पराभूत करून महायुतीने उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघावर झेंडा फडकविला आहे.

उन्मेष पाटील , कळंबजिल्ह्याच्या राजकीय इतिहासात कधीही पराभव न पाहणारे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते डॉ. पद्मसिंह पाटील यांना जवळपास सव्वादोन लाख मतांनी पराभूत करून महायुतीने उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघावर झेंडा फडकविला आहे. उस्मानाबाद-कळंब विधानसभा मतदारसंघावर सध्या शिवसेनेचे वर्चस्व असून, लोकसभेतील विजयामुळे महायुतीतील नेतेमंडळींसह कार्यकर्त्यांचेही मनोबल वाढले आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतेमंडळी, कार्यकर्त्यांनी उस्मानाबाद-कळंब मतदारसंघावर पुन्हा वर्चस्व निर्माण करण्यासाठी तगडी फिल्डींग लावली असून, गावपातळीवर बुथनिहाय मोर्चेबांधणी सुरू केली आहे. वास्तविक उस्मानाबाद तालुका हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला तर कळंब तालुका हा एकेकाळी शेतकरी कामगार पक्षासारख्या पुरोगामी विचारांना मानणारा तालुका होता. १९९५ साली युतीच्या लाटेत कळंब मतदारसंघातून प्रथमच शिवसेनेचा उमेदवार निवडून आला. त्यानंतर १९९९ साली ‘अबकी बारी, अटल बिहारी’चा नारा देत झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पुन्हा शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला. २००४ च्या निवडणुकीत लाट नव्हती; परंतु, सेनेला मानणारा मतदार तयार झाल्याने यावेळी सेनेचा उमेदवार निवडून आला. याउलट उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघावर मात्र माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता कायम ठेवली होती. २००९ साली उस्मानाबाद-कळंब विधानसभा मतदारसंघ एक झाला आणि या निवडणुकीत शिवसेनेचे ओम राजेनिंबाळकर यांनी माजी राज्यमंत्री राणाजगजितसिंह पाटील यांचा पराभव केला. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतही मोदी लाट पुन्हा सेनेसाठी धाऊन आली. या निवडणुकीत महायुतीचा उमेदवार कोण, प्रचारात मुद्दे काय आहेत, प्रचार कोण करतो आहे, हे ग्राह्य न धरता मतदारांनी मोदी फॅक्टरला कौल दिला. त्यामुळे महायुतीचा उमेदवार विजयी झाल्यानंतर कोणत्याही महायुतीच्या पुढाऱ्याची या विजयाचे क्रेडीट घेण्यासाठी पुढे येण्याची हिंमत झाली नाही. या निवडणुकीत उस्मानाबाद-कळंब विधानसभा मतदारसंघातून प्रा. गायकवाड यांना सुमारे वीस हजारांचे मताधिक्य मिळाले. लोकसभेच्या निवडणुकीपेक्षा आगामी विधानसभा निवडणुकीचे चित्र वेगळे राहणार आहे. यावेळी पुन्हा महायुती विरूध्द आघाडी, असे चित्र दिसणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली तर उमेदवार राष्ट्रवादीचाच राहणार आहे. पण, काँग्रेसमध्येही इच्छुकांची भाऊगर्दी आहे. कहींनी अपक्ष म्हणूनही निवडणुकीचे बाशिंग बांधण्याची तयारी सुरू केली आहे. कळंब तालुका हा १९९५ चा अपवाद वगळता नेहमीच सत्तेच्या विरोधात राहिलेला तालुका आहे. त्यामुळे राज्यात राजकीय वारे कोठे आहे, त्याच्या विरोधात तालुक्यातील मतदार मतदानाचा कौल देतो, असा अनुभव आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत होणारी फाईट लक्षणीय असणार आहे. याही निवडणुकीत आ. राणाजगजितसिंह पाटील विरूध्द आ. ओम राजेनिंबाळकर अशीच लढत होण्याची शक्यता आहे. सेनेकडून अन्य काहीजण उमेदवारीसाठी इच्छुक आहेत, विशेषत: आ. रवींद्र गायकवाड यांना मानणारा गट यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला याही निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे सहकार्य मिळणार नसल्याचे लोकसभेच्या निवडणुकीतच स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला स्वबळावर ही निवडणूक लढवावी लागणार आहे. हे ओळखूनच लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून राणाजगजितसिंह पाटील यांनी उस्मानाबाद-कळंब मतदारसंघात प्रचारयंत्रणा राबविण्यास प्रारंभ केला होता. त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीतही काही अंशी दिसून आला. एकूणच उस्मानाबाद-कळंब मतदारसंघात महायुती विरूध्द आघाडी अशी लढत असली तरी लोकसभा निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या बसपाचा ‘हत्ती’ किती जोर लावणार आणि अपक्ष म्हणून कोण रिंगणात उतरणार, यावरच निवडणुकीची रंगत ठरणार आहे.