शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

म.प्र. तील घोटाळा चिंतेचा विषय नाही

By admin | Updated: June 29, 2014 01:00 IST

शांतीलाल गायकवाड , औरंगाबाद मध्यप्रदेशातील व्यावसायिक परीक्षा मंडळ घोटाळा हा आमच्यासाठी चिंतेचा विषय नाही. तो घोटाळा सत्यावर आधारितही नाही.

शांतीलाल गायकवाड , औरंगाबादमध्यप्रदेशातील व्यावसायिक परीक्षा मंडळ घोटाळा हा आमच्यासाठी चिंतेचा विषय नाही. तो घोटाळा सत्यावर आधारितही नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी (आरएसएस) कायम शंका निर्माण करण्याचा प्रयत्न होतो. त्यातलाच हा प्रकार असल्याचे मत संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले. ग्रंथ प्रकाशन समारंभानिमित्त भय्याजी जोशी शनिवारी शहरात आले असता, लोकमत प्रतिनिधीने त्यांच्याशी संवाद साधला. मध्यप्रदेशातील राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या व्यावसायिक परीक्षा मंडळ घोटाळ्यावर बोलताना जोशी म्हणाले की, संघ आदर्शाची निर्मिती करतो, अशा कामात संघ नसतो; परंतु संघाविषयी शंका निर्माण करण्यासाठी असे प्रयत्न सातत्याने केले जातात. सीबीआय कुणाचीही चौकशी स्वत:हून करीत नसते. तशी मागणी झाली तर चौकशी होते. मध्यप्रदेशातही मागणी झाल्याने ही चौकशी सुरू झाली आहे; परंतु या चौकशीला सत्याच्या आधार नाही. यामागेही राजकारण आहे. मध्यप्रदेश व केंद्रातही भाजपाचे सरकार असताना सीबीआय कुणाच्या दडपणाखाली काम करते, या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर देणे त्यांनी टाळले. केंद्रात सत्तारूढ झालेल्या मोदी सरकारच्या एक महिन्याच्या कामगिरीकडे संघ कसा पाहतो, असे विचारता ते म्हणाले की, एक महिन्यात सरकारच्या कामगिरीचे आकलन होणे व करणेही न्यायपूर्ण होणार नाही. त्यासाठी काही काळ जाऊ द्यावा लागेल. त्यानंतरच काही ठरविता येईल; परंतु सरकारची काम करण्याची गती पाहता, ते काहीतरी विधायक करील, असे वाटते. रेल्वे प्रवासी भाडेवाढीमुळे जनतेतून संताप व्यक्त होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले असता जोशी म्हणाले की, भाववाढ झाली तर नागरिकांना राग येणे स्वाभाविकच आहे; परंतु रेल्वे तोट्यात होती. गेल्या ५ वर्षांपासून भाडेवाढ झालेली नाही. त्यामुळे तोटा वाढतो आहे.विद्यमान सरकारला रेल्वेला तोट्यातून बाहेर काढायचे आहे. त्याला त्याचे स्वत:चे अर्थतंत्र उभे करायचे असावे, काही सुधारणा हाती घेतल्या असाव्यात, त्यासाठी सरकारने कदाचित नाइलाजानेच दरवाढ केली असावी, असे सांगितले खरे; परंतु रेल्वे भाववाढीचे कोणतेही समर्थन संघ करीत नाही, असेही स्पष्ट करण्यास ते विसरले नाहीत.