लातूर : डिझेलचे दर कमी होऊनही एस.टी. महामंडळाचे प्रवासभाडे कमी होत नाहीत, याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एस.टी.च्या विभागीय कार्यालयासमोर बुधवारी आंदोलन करण्यात आले. १ रुपयांचे हजार नाणे देऊन अनोखे आंदोलन करण्यात आले. सध्या महाराष्ट्रात दुष्काळ आहे. पर्जन्यमान कमी झाल्यामुळे शेतीत उत्पन्न निघाले नाही. नागरिकांना महागाईचा सामना करावा लागत आहे. सध्या डिझेलचे भाव कमी झाले आहे. परंतु, प्रवासीभाडे पूर्वीचेच आहे. तिकीट दर कमी होण्याची अपेक्षा होती. मात्र आणखी काही दिवसांनी डिझेलचे भाव वाढणार आहेत. त्यामुळे थोड्या दिवसांनी तिकिटाचे दर कशाला कमी करायचे म्हणून महामंडळाने पूर्वीचेच भाडे ठेवले आहे. एस.टी.ने प्रवास करणाऱ्या नागरिकांची आर्थिक स्थिती सर्वसामान्य असते. त्यामुळे प्रवास भाडे कमी करावे, अशी मागणी विभाग नियंत्रकांना दिलेल्या निवेदनात केली आहे. आंदोलनात संतोष नागरगोजे, गणेश गवारे, अॅड. विनोद गोमसाळे, अॅड. बालाजी चापोलीकर, शिवकुमार नागराळे, फुलचंद कावळे, निलेश भंडे, प्रमोद जोशी, लताताई गायकवाड, किरण चव्हाण, सय्यद सरफराज, सतीश कदम, युवराज कांबळे, फिरोज पटेल, नविद खान, राहुल चिताडे, भागवत कोंदे आदींचा सहभाग होता.केंद्र शासनाने डिझेलच्या किंमती दोनदा कमी करूनही एस.टी. महामंडळाने मात्र प्रवासी भाड्यात कपात केली नाही. उलट भाडे वाढविल्याचे निवेदनात म्हटले आहे.
१ रुपयांचे हजार नाणे देऊन आंदोलन
By admin | Updated: March 5, 2015 00:03 IST