शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्प रद्द न केल्यास आंदोलन

By admin | Updated: June 29, 2016 01:08 IST

औरंगाबाद : शहरातील १५ लाख नागरिकांना वेठीस धरणारा प्रकल्प म्हणजे समांतर जलवाहिनी होय. मनपा प्रशासनाने ३० जून रोजीच्या सर्वसाधारण

औरंगाबाद : शहरातील १५ लाख नागरिकांना वेठीस धरणारा प्रकल्प म्हणजे समांतर जलवाहिनी होय. मनपा प्रशासनाने ३० जून रोजीच्या सर्वसाधारण सभेत कंत्राटदाराची हकालपट्टी करा असा प्रस्ताव ठेवला आहे. नगरसेवकांनी हा प्रस्ताव मंजूर न केल्यास शहरात तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा प्रा. विजय दिवाण यांनी दिला. समांतर पाणीपुरवठा खासगीकरणविरोधी नागरी कृती समितीचा मेळावा मंगळवारी भानुदासराव चव्हाण सभागृहात घेण्यात आला. यावेळी कृती समितीचे सदस्य एच.आर. ठोलिया, प्रदीप पुरंदरे, कलीम अख्तर, मुळावे, विजय सिरसाट, आचार्य यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करताना प्रा. दिवाण यांनी सांगितले की, शहरातील पाणीपुरवठ्याचे खाजगीकरण करण्याचे पाप शिवसेना-भाजप युतीने केले. खाजगीकरणातून हा प्रकल्प उभा राहिल्यास सर्वसामान्य नागरिकांना तो अजिबात परवडणार नाही. दरवर्षी ६९ हजार रुपये प्रत्येक नागरिकाला मोजावे लागतील. पगारापेक्षा पाणीपट्टी जास्त अशी वेळ निर्माण होईल. खाजगीकरणाच्या माध्यमातून नागरिकांना हा बोजा लादण्यात येत असतानाही सर्वसामान्य नागरिक या मुद्यावर बोलायला तयार नाही. आपण कोणाला घाबरतो असा प्रश्नही दिवाण यांनी उपस्थित केला. नगरसेवकांनी हा प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. नगरसेवकांनी प्रकल्प रद्द न करता तो सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला तर समांतरविरोधी आंदोलनाला लोकक्षोभाचे रूप द्यावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी विजय सिरसाट, मुळावे, पुरंदरे, प्रभाकर चौधरी, अण्णासाहेब खंदारे, रमेशभाई खंडागळे, होनकळसे, डॉ. भालचंद्र कानगो यांनीही मनोगत व्यक्त केले. उद्या धरणे आंदोलन समांतर जलवाहिनी प्रकल्पासंदर्भात गुरुवारी महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा सुरू झाल्यावर मनपा मुख्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय मेळाव्यात जाहीर करण्यात आला. सकाळी ११ वाजता धरणे आंदोलनाला सुरुवात होईल.