शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
3
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
4
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
5
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
6
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
7
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
8
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
9
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
10
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
11
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
12
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
13
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
14
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
15
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
16
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
17
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
18
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
19
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
20
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश

कौटुंबिक कलहातून आईची दोन चिमुकल्यांसह आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:04 IST

औरंगाबाद: कौटुंबिक कलहाला कंटाळलेल्या विवाहितेने दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि.१५) सकाळी ११ वाजता ...

औरंगाबाद: कौटुंबिक कलहाला कंटाळलेल्या विवाहितेने दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि.१५) सकाळी ११ वाजता पैठण रोडवरील गेवराई तांडा परिसरात उघडकीस आली.

वैशाली रवींद्र थोरात ( २५), आरोही (६) व आयुष (३), अशी मृतांची नाव आहेत. क्रांतीनगर हे महिलेचे माहेर असून, गेवराई हे तिचे सासर आहे. पती रवींद्र सोबतच्या भांडणातून तिने हे टोकाचे पाऊल उचलले असावे असे पोलिसांचे म्हणणे आहे. परिसरातील पडीक विहिरीकडे वैशाली आपल्या दोन चिमुकल्यांना घेऊन जातांना गावातील काही लोकांनी पाहिले. तिने मुलांसह उडी घेतल्याचे समजल्याने घटनेची माहिती चिकलठाणा पोलीस ठाण्याला देण्यात आली. माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक पाटील तसेच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक अधिकारी विजय राठोड आणि अन्य जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन वैशाली, आरोही आणि आयुषचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढले. घटनास्थळी मयताचे नातेवाईक जमा झाले होते.

अन्‌ त्यांनी फोडला हंबरडा...

अग्निशामक दलाच्या पथकाने पडीक विहिरीतून तिघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले तेव्हा नातेवाईकांनी हंबरडा फोडला. स्थानिकांच्या डोळ्यातही अश्रू आले होते.

पती पसार, शोध सुरू...

मृतदेह, शासकीय दवाखान्यात हलविण्यात आले. कलहानंतर पती रवींद्र थोरात हा पसार झाला आहे. त्याचा शोध सायंकाळपर्यंत पोलिसांना लागलेला नव्हता.

आत्महत्येचे नेमके कारण पोलीस शोधत आहेत...

आत्महत्येचे कारण प्रथम दर्शनी कौटुंबिक कलह असावा, परंतु नक्की काय कारण आहे याचा तपास पोलीस करीत आहेत.

शवविच्छेदन अहवालानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. सध्या चिकलठाणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे, असे सहायक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी सांगितले.

कॅप्शन... वैशाली थोरात या विवाहितेने आरोही,आयुष या दोन चिमुकल्यांना घेऊन गुरूवारी गेवराई येथे पडीक विहिरीत आत्महत्या केली.