शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; दुबईत बॉलिवूडकरांसमोर संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

मुलांना गल्लीत खेळायला सोडून मातेची घरात आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:05 IST

औरंगाबाद : सहा वर्षे आणि साडेतीन वर्षांच्या दोन्ही मुलांना गल्लीत खेळायला जाण्यास सांगून, महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ...

औरंगाबाद : सहा वर्षे आणि साडेतीन वर्षांच्या दोन्ही मुलांना गल्लीत खेळायला जाण्यास सांगून, महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना जयभवानीनगरात मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्पना कृष्णा पाखरे (२६) असे मयत विवाहितेचे नाव आहे. कल्पना आणि कृष्णा यांचे ८ वर्षांपूर्वी लग्न झाले. त्यांना ६ वर्षे आणि साडेतीन वर्षांची दोन मुले आहेत. घरगुती कारणावरून पती कृष्णा हा दारू पिऊन आणि इतर अनेक कारणांवरून कल्पना यांना मारहाण करून त्रास देत होता. सोमवारी रात्री त्यांच्यामध्ये रात्री २ वाजेपर्यंत भांडण सुरू होते. शेजाऱ्यांनी त्यांचे भांडण सोडविले होते. आज सकाळी ९ वाजता पुन्हा त्यांच्यात भांडण सुरू झाले. या वेळी कल्पना यांना मारहाण करून कृष्णा घराबाहेर निघून गेला. काही वेळाने कल्पना यांनी दोन्ही मुलांना अंगणात खेळण्यासाठी जाण्यास सांगितले. आईच्या सांगण्यावरून मुले समोर खेळण्यासाठी गेली. नंतर ते जवळच राहणाऱ्या आजीकडे गेले. घरी एकट्या असलेल्या कल्पना यांनी पतीच्या त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. सुमारे साडेअकरा वाजेच्या सुमारास हा प्रकार नजरेस पडल्यावर कल्पना यांना तातडीने घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. अपघात विभागातील डॉक्टरांनी कल्पना यांना तपासून मयत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक अमोल म्हस्के यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी मुकुंदवाडी ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस हवालदार शिरसाट तपास करीत आहेत.