शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे काय होणार? आज ‘सर्वोच्च’ फैसला
2
आजचे राशीभविष्य, २८ नोव्हेंबर २०२५: संयम राखा आणि विचारपूर्वक व्यवहार करा!
3
२ मोठे नेते, २ दावे...राज्यात २ डिसेंबरनंतर राजकीय भूकंप?; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू
4
पहाटे ५ वाजता शिंदेसेनेच्या आमदाराच्या घरी १०० पोलिसांची धाड; घराची झाडाझडती, भाजपावर आरोप
5
महाराष्ट्रासह १० राज्यांतील मेडिकल कॉलेजांवर ईडीचे छापे; ३६ जणांवर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
6
राज-उद्धव ठाकरे भेट, ‘शिवतीर्थ’वर बंद दाराआड २ तास चर्चा; एकजुटीने महायुतीला थोपवण्याचा निर्णय?
7
इमारतींच्या छतांवर आणि महामार्गावर आता ‘नो होर्डिंग्ज; मुंबई महापालिकेचे जाहिरात धोरण जाहीर
8
दिशा सालियन आत्महत्या प्रकरणी हायकोर्टाचा पोलिसांना सवाल; "मृत्यूला ५ वर्ष झाली, आणखी किती..."
9
सिंधुदुर्गनंतर बदलापूरात पैसे वाटताना रंगेहाथ पकडले; महायुतीत शिंदेसेना-अजित पवार गटात जुंपली
10
श्रेयवाद, आरोप प्रत्यारोप अन् ‘अरे’ला ‘कारे’ने उत्तर; सत्ताधारी भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष वाढला
11
खराब हवेचे खापर इथिओपियातील ज्वालामुखीवर फोडू नका; प्रदूषणावरून हायकोर्टाने सरकारला सुनावले
12
गर्जेच्या शरीरावरही जखमा, संवादाचे रेकॉर्डिंग पोलिसांकडे; दाेन डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी 
13
ठाण्याची झणझणीत मिसळ की पुण्याचे श्रीखंड; शंभराव्या मराठी साहित्य संमेलनासाठी रस्सीखेच?
14
१०० वर्षांनी पंचग्रही योग, २०२६ला ७ राशींची मनासारखी कमाई; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-लाभ भरभराट!
15
ट्रेनमध्ये प्रवास करताना नेटवर्क का जाते? इंटरनेट का होते स्लो? जाणून घ्या 'या' समस्येवरचा उपाय
16
एकपेक्षा जास्त लग्न करणे गुन्हा...'या' राज्यात विधेयक मंजूर; दंडासह कठोर शिक्षेची तरतूद
17
ॲपल अडकली? भारतात ₹३.२० लाख कोटी दंडाची टांगती तलवार; कायदा बदलला अन्...
18
३०० सीट वाढणार, ४ कोच कायमस्वरुपी जोडले जाणार; वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद
19
मन हेलावून टाकणारी घटना...! पती, पत्‍नी, प्रियकर अन् एक अजब करार...! सर्वत्र होतेय चर्चा 
20
टाटा सिएरा खरेच ₹११.४९ लाखांना मिळणार? नेक्सॉन, हॅरिअरलाच खाऊन टाकणार..., हो, नाही...
Daily Top 2Weekly Top 5

सर्वात महागडे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 23:44 IST

राज्यातील कोणत्याच महापालिकेत किंवा नगर परिषदेत पाणीपट्टीसाठी ४ हजार रुपये वसूल करण्यात येत नाहीत. औरंगाबाद महापालिका याला अपवाद असून, राज्यात सर्वात महाग पाणी शहरात नागरिकांना देण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मुजीब देवणीकर ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : राज्यातील कोणत्याच महापालिकेत किंवा नगर परिषदेत पाणीपट्टीसाठी ४ हजार रुपये वसूल करण्यात येत नाहीत. औरंगाबाद महापालिका याला अपवाद असून, राज्यात सर्वात महाग पाणी शहरात नागरिकांना देण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नागरिकांकडून चार हजार रुपये वसूल करूनही मनपा फक्त ९० दिवसच पाणी देते, हे विशेष. १ एप्रिल २०१८ पासून पाणीपट्टीत आणखी दहा टक्केवाढ होणार म्हणजे औरंगाबादकरांना दरवर्षी ४५०० रुपये पाणीपट्टीपोटी मोजावे लागणार आहेत.नाशिक येथील गंगापूर, दारणा आदी धरणांमधून जायकवाडीत दरवर्षी पाणी येते. यंदाही नाशिकमधून मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने जायकवाडी धरण ८० टक्केभरले आहे. औरंगाबाद महापालिका जायकवाडीचेच पाणी नागरिकांना देते. नाशिक शहरात दररोज पाणीपुरवठा होतो. घरगुती नळधारकांकडून नाशिक मनपा १ हजार लिटर पाण्यापोटी फक्त ५ रुपये घेते. वाणिज्य वापरासाठी २५ रुपये दर आकारण्यात येतो. १९९२ पासून आजपर्यंत महापालिकेने पाणीपट्टीत वाढ केली नाही. दरवर्षी पाणीपुरवठ्याचा खर्च ३७ कोटी रुपये आहे. वसुली ४० कोटी रुपये होते. यामध्ये ४० टक्के पाण्याची गळती गृहीत धरलेली आहे. नाशिक शहराला दररोज ४०० एमएलडी पाणीपुरवठा होतो