शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
3
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
4
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
5
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
6
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
7
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
8
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
9
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
10
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
11
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
12
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
13
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
14
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
15
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
16
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
17
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
18
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
19
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
20
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...

फळ पिकविण्यासाठी रसायनांचा सर्रास वापर!

By admin | Updated: May 7, 2017 00:18 IST

जालना : शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी फळ पिकविण्यासाठी रसायनांचा सर्रास वापर करण्यात येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी फळ पिकविण्यासाठी रसायनांचा सर्रास वापर करण्यात येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सुदृढ आरोग्यासाठी फळांचा वापर नित्याचा झाला आहे. मात्र गत काही वर्षांपासून फळे विषारी बनत आहेत. सृदढ आरोग्याऐवजी आजार वाढत आहेत. विशेषत: केळी, पपई, आंबे व अन्य फळ पिकविण्यासोबतच ती आकर्षक दिसावीत म्हणून रसायनांचा वापर केला जात आहे. फळ पिकविण्यासाठी विशेषत: कॅल्शिअम कार्बाईडचा वापर करण्यात येतो. याचा वापर ग्राहकांच्या जिवावरही बेतू शकतो.या रसायनांचे फळांमध्ये उतररून त्याचे अपाय होत आहेत. याकडे अन्न व औषध प्रशासन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. सततच्या इथेलिन व कार्बाईडचा वापर केल्याने फळे खावीत की नाही, असा प्रश्न पडत आहेत. जालना शहरात सूरत, हैदराबाद, नाशिक, कोकण, नांदेड, सोलापूर इ. भागांतून केळी, आंबे तसेच इतर फळे येतात. आंबे, केळी आणि पपईसाठी औषधींचा वापर हमखास होतो. फळे आकर्षक दिसण्यासाठीही औषधींचा वापर होतो. छुप्या पद्धतीने या रसायनांचा वापर होत असल्याने त्याची माहिती सामान्य माणसाला होत नाही. त्यामुळे आजाराचे प्रमाण वाढत आहे. अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरवसे म्हणाल्या, जालना शहरात जी फळे पिकविली जातात. त्यात कार्बाईडचा वापर आढळून आलेला नाही. गत आठवड्यातच अशा फळांचे नमुने घेतले असून, फळ विक्रेत्यांना सूचना दिल्या आहेत.