शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
3
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
4
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
5
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
6
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
7
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
8
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
9
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
10
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
11
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
12
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
13
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
14
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
15
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
16
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
17
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
19
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
20
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती

फळ पिकविण्यासाठी रसायनांचा सर्रास वापर!

By admin | Updated: May 7, 2017 00:18 IST

जालना : शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी फळ पिकविण्यासाठी रसायनांचा सर्रास वापर करण्यात येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी फळ पिकविण्यासाठी रसायनांचा सर्रास वापर करण्यात येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सुदृढ आरोग्यासाठी फळांचा वापर नित्याचा झाला आहे. मात्र गत काही वर्षांपासून फळे विषारी बनत आहेत. सृदढ आरोग्याऐवजी आजार वाढत आहेत. विशेषत: केळी, पपई, आंबे व अन्य फळ पिकविण्यासोबतच ती आकर्षक दिसावीत म्हणून रसायनांचा वापर केला जात आहे. फळ पिकविण्यासाठी विशेषत: कॅल्शिअम कार्बाईडचा वापर करण्यात येतो. याचा वापर ग्राहकांच्या जिवावरही बेतू शकतो.या रसायनांचे फळांमध्ये उतररून त्याचे अपाय होत आहेत. याकडे अन्न व औषध प्रशासन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. सततच्या इथेलिन व कार्बाईडचा वापर केल्याने फळे खावीत की नाही, असा प्रश्न पडत आहेत. जालना शहरात सूरत, हैदराबाद, नाशिक, कोकण, नांदेड, सोलापूर इ. भागांतून केळी, आंबे तसेच इतर फळे येतात. आंबे, केळी आणि पपईसाठी औषधींचा वापर हमखास होतो. फळे आकर्षक दिसण्यासाठीही औषधींचा वापर होतो. छुप्या पद्धतीने या रसायनांचा वापर होत असल्याने त्याची माहिती सामान्य माणसाला होत नाही. त्यामुळे आजाराचे प्रमाण वाढत आहे. अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरवसे म्हणाल्या, जालना शहरात जी फळे पिकविली जातात. त्यात कार्बाईडचा वापर आढळून आलेला नाही. गत आठवड्यातच अशा फळांचे नमुने घेतले असून, फळ विक्रेत्यांना सूचना दिल्या आहेत.