शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
3
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
4
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
5
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
6
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
7
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
8
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
9
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
10
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
11
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
12
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
13
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
14
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
15
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
16
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
17
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
18
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
19
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
20
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल

फळ पिकविण्यासाठी रसायनांचा सर्रास वापर!

By admin | Updated: May 7, 2017 00:18 IST

जालना : शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी फळ पिकविण्यासाठी रसायनांचा सर्रास वापर करण्यात येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी फळ पिकविण्यासाठी रसायनांचा सर्रास वापर करण्यात येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सुदृढ आरोग्यासाठी फळांचा वापर नित्याचा झाला आहे. मात्र गत काही वर्षांपासून फळे विषारी बनत आहेत. सृदढ आरोग्याऐवजी आजार वाढत आहेत. विशेषत: केळी, पपई, आंबे व अन्य फळ पिकविण्यासोबतच ती आकर्षक दिसावीत म्हणून रसायनांचा वापर केला जात आहे. फळ पिकविण्यासाठी विशेषत: कॅल्शिअम कार्बाईडचा वापर करण्यात येतो. याचा वापर ग्राहकांच्या जिवावरही बेतू शकतो.या रसायनांचे फळांमध्ये उतररून त्याचे अपाय होत आहेत. याकडे अन्न व औषध प्रशासन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. सततच्या इथेलिन व कार्बाईडचा वापर केल्याने फळे खावीत की नाही, असा प्रश्न पडत आहेत. जालना शहरात सूरत, हैदराबाद, नाशिक, कोकण, नांदेड, सोलापूर इ. भागांतून केळी, आंबे तसेच इतर फळे येतात. आंबे, केळी आणि पपईसाठी औषधींचा वापर हमखास होतो. फळे आकर्षक दिसण्यासाठीही औषधींचा वापर होतो. छुप्या पद्धतीने या रसायनांचा वापर होत असल्याने त्याची माहिती सामान्य माणसाला होत नाही. त्यामुळे आजाराचे प्रमाण वाढत आहे. अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरवसे म्हणाल्या, जालना शहरात जी फळे पिकविली जातात. त्यात कार्बाईडचा वापर आढळून आलेला नाही. गत आठवड्यातच अशा फळांचे नमुने घेतले असून, फळ विक्रेत्यांना सूचना दिल्या आहेत.