शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

मोसंबीचा विमा अडकला तांत्रिक मुद्यात

By admin | Updated: August 26, 2015 23:58 IST

जालना : मोसंबीचा विमा तांत्रिक मुद्यात अडकल्याने शेकडो शेतकरी विम्याच्या लाभापासून वंचित राहिल्याचे उघडकीस आले आहे.

जालना : मोसंबीचा विमा तांत्रिक मुद्यात अडकल्याने शेकडो शेतकरी विम्याच्या लाभापासून वंचित राहिल्याचे उघडकीस आले आहे. जिल्ह्यातील मोसंबी उत्पादकांनी अवेळी पडणारा पाऊस, वाढणारे उष्ण तापमान यापासून बचाव व्हावा म्हणून मोसंबीसह इतर फळ पिकांचा लाखो रुपयांचा विमा भरला होता. मात्र यातील बहुतांश शेतकऱ्यांना हवामान यंत्रात नोंद न झाल्याचे कारण पुढे करीत विमा नाकारण्यात आला आहे. प्रत्यक्षात मोसंबीसह इतर फळपिकांचे नुकसान झालेले आहे. तीन वर्षांपूर्वी शासनाने फळपीक विमा योजना लागू केली. २०१३-२०१४ मध्ये अंबिया बहारासाठी ४९ महसूल मंडळातील फक्त ३० मंडळातील शेतकऱ्यांना काहीअंशी विमा मिळाला. १९ मंडळात तशा प्रकारचे हवामानच निर्माण झाले नसल्याचे अ‍ॅटोमॅटिक वेदर मशीन्सने नोंदविले. संबंधित विमा कंपनीने हा निकषच समोर ठेवून १९ मंडळातील शेतकऱ्यांना पीक नाकारला. विशेष म्हणजे २०१२-१३ मध्ये ४ हजार शेतकऱ्यांनी मोसंबीचा विमा भराला होता. प्रति हेक्टरी ३६०० रुपये या प्रमाणे सुमारे ४ कोटी रुपयांचा भरणा केला होता. अंबिया बहरासाठी हा विमा भरण्यात आला होता. संबंधित विमा कंपनीकडे हा विमा अडकल्याचे उत्पादकांचे म्हणणे आहे. २०१४ मध्ये २८५ शेतकऱ्यांनी २५७ हेक्टरसाठी विमा भरला होता. यापैकी १२२ शेतकऱ्यांना ७६. ५६ लाखांचा विमा वाटप करण्यात आला. उर्वरित शेतकऱ्यांना निकषाचा फटका बसला.जिल्हा कृषी अधीक्षक दशरथ तांभाळे म्हणाले, फळपिकांच्या विम्यासाठी काही प्रमाणके आहेत. त्यानुसारच विमा देण्यात येतो. काही ठिकाणी तांत्रिक मुद्दे असले तरी प्रमाणकांचा निकषच संबंधित विमा कंपनी ग्राह्य धरते. (प्रतिनिधी)शासनाने फळपिकांसाठी अवेळी पाऊस, अति तापमान, कमी तापमान हे निकष लावले आहेत. ते राज्यस्तरावरील आहेत. मराठवाड्यातील फळबागांसाठी येथील वातावरणाचा परिपूर्ण अभ्यास करुन अथवा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील हवामान केंद्रातील निकष लावावेत अशी मागणी मोसंबी उत्पादक संघाचे राज्य अध्यक्ष भगवानराव डोंगरे यांनी केली. २०१२-१३ मध्ये भरलेला विमाही अशाच तांत्रिक मुद्यात अडकला आहे. तत्कलिन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी हा विमा तत्काळ देण्याचे आदेशही दिले होते. मात्र लोकसभा निवडणुका लागल्याने प्रश्न पुन्हा प्रलंबितच राहिला.नुकसान भरपाई ठरविण्याचा आरखडा मागील २५ वर्षांचा हवामानाच्या आकडेवारीचा विचार करण्यात आलेला आहे. त्यानुसार मोसंबी तसेच इतर फळपिकांसाठी प्रमाणके (ट्रिगर) निश्चित केले आहेत. संदर्भ हवामान केंद्रातील नोंदणीप्रमाणे विमा निश्चित होणार होता. मात्र जालना जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी लावलेल्या यंत्रात या नोंदी झाल्या नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.४विशेष म्हणजे शासनाच्या परिपत्रकात नमूद केले आहे की, एखाद्या महसूल मंडळात लावलेल्या हवामान केंद्रामार्फत काही कारणास्तव आकडेवारी प्राप्त झाली नाही तर त्या कालावधीपुरती पर्यायी शासनाच्या कृषी विद्यापीठे, विज्ञान केंद्र हवामान केंद्राची आकडेवारी विचारात घेऊन देय विमा रक्कम निश्चित करावी. असे असले तरी याकडे दुर्लक्ष झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.