शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
3
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
4
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
5
पगार आला की गायब होतोय? महिन्याच्या शेवटी खिसा रिकामा राहतोय? या सवयींनी व्हाल श्रीमंत
6
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
7
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
8
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...
9
"माझी बहीण १६ वर्षांनी लहान आहे, पण मी तिचं..." रश्मिका मंदानाने व्यक्त केली खंत
10
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
11
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
12
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
13
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
14
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
15
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
16
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
17
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
18
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
19
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
20
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...

वृक्षारोपणाऐवजी तोडच अधिक; प्लास्टिकचा वापरही अमर्याद

By admin | Updated: June 5, 2014 00:10 IST

जागतिक पर्यावरण दिन; निसर्गाचा असमतोल वाढतोय

परभणी : जागोजागी कचर्‍याचे ढिगारे, त्यावर चरणारे जनावरे आणि नाल्या तुंबल्याने साचलेले पाण्याचे डबके हे चित्र शहरात अनेक ठिकाणी पहावयास मिळते. स्वच्छतेसाठीच कोणी पुढाकार घेत नाहीतर पर्यावरणाचे संतुलन राखण्याचे प्रयत्न तर दूरच राहिले. शहरात अनेक भागांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव आहे. नाल्या तुंबलेल्या आहेत. ठिकठिकाणी कचर्‍याचे ढिगारे साचले असल्याने शहरातील वातावरण प्रदूषित होत आहे. शहर स्वच्छतेची जबाबदारी महानगरपालिकेवर आहे. परंतु, या कामात मनपा अपयशी ठरली आहे. मुख्य शहरी भागाबरोबरच शहराबाहेरील वसाहतीमध्येदेखील हीच परिस्थिती आहे. कचर्‍याचे ढिगारे आणि नाल्यांतील घाण पाण्यामुळे शहरामध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. नाल्यांवर वेळोवेळी फवारणी देखील केली जात नाही. स्वच्छता हा मूलभूत प्रश्न आहे. शहर स्वच्छ राहिले तर पर्यावरणदेखील चांगले राहील. मुळात स्वच्छतेकडेच दुर्लक्ष होत असल्याने पर्यावरणाचा प्रश्न निर्माण होत आहे. (प्रतिनिधी) प्रदूषण नियंत्रण कार्यालय नावालाच परभणी येथे प्रदूषण नियंत्रण कार्यालय कार्यरत आहे. या कार्यालयामार्फत वायू, ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याचे काम केले जाते. दिवाळी सणाच्या निमित्ताने होणार्‍या ध्वनी प्रदूषणाच्यासंदर्भात जाहीर आवाहन करण्या पलीकडे या कार्यालयाचा जिल्ह्यासाठी उपयोग होत नाही. ध्वनी प्रदूषणाची नोंद घेण्यासाठी पुरेशी यंत्रसामग्रीही उपलब्ध नसल्याने ध्वनी प्रदूषण किती प्रमाणात होत आहे, याची देखील नोंद होत नाही. झाडांच्या संगोपनाकडे दुर्लक्ष पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षलागवड हाती घेतली जाते. परंतु, लावलेल्या झाडांचे संगोपन होत नसल्याने ही मोहीम अयशस्वी ठरते. धुळीचा प्रादुर्भाव शहरातील रस्त्यांची मागील दोन वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. वाहनांची वाढलेली वर्दळ आणि रस्त्यांवर खड्डे यामुळे शहरात धुळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचून ही धूळ अधिकच वाढली आहे. वाहनधारक आणि सर्वसामान्य नागरिकांना या धुळीचा सामना करावा लागतो. धुळीमुळे श्वसनाचे आजारदेखील बळावले आहेत. वायू प्रदूषण वाढले मागील काही वर्षांपासून शहरात वाहनांची संख्या वाढली आहे. जुनी वाहनेदेखील मोठ्या प्रमाणात आहेत. पेट्रोलचे भाव वाढत असल्याने अनेक वाहनांमध्ये रॉकेलचादेखील वापर केला जातो. त्यामुळे रॉकेलमिश्रित इंधन वापरल्याने वायू प्रदूषण वाढत आहे. विशेष करुन अ‍ॅटो आणि चार चाकी वाहनांमध्ये रॉकेलचा वापर केला जात आहे. परंतु, याविरुद्ध कुठलीही कारवाई होत नाही.