शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

फेब्रुवारीच्या २० दिवसांतच जानेवारीपेक्षा अधिक रूग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:02 IST

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा एकदा विळखा वाढत आहे. फेब्रुवारी महिन्याच्या २० दिवसांतच जानेवारीपेक्षा अधिक कोरोना रुग्णांचे निदान ...

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा एकदा विळखा वाढत आहे. फेब्रुवारी महिन्याच्या २० दिवसांतच जानेवारीपेक्षा अधिक कोरोना रुग्णांचे निदान झाले. रुग्णांमध्ये दररोज मोठी भर पडत असल्याने आरोग्य यंत्रणेकडून चिंता व्यक्त होत आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात गतवर्षी मार्चमध्ये कोरोनाचा विळखा सुरू झाला. त्यानंतर तब्बल ७ महिने कोरोनाचा आलेख वाढता होता. ऑक्टोबरनंतर नव्या रुग्णांची संख्या कमी होत गेली. जानेवारीपर्यंत म्हणजे, तीन महिने हा आलेख घसरता होता. या काळात दररोज दुहेरी संख्येतच रुग्णांचे निदान होत गेले. मात्र, फेब्रुवारी महिना उजाडला आणि कोरोनाने पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. जानेवारीच्या ३१ दिवसांत जेवढे नवीन रुग्ण आढळले, त्यापेक्षाही अधिक रुग्ण फेब्रुवारीच्या गेल्या २० दिवसांतच आढळले आहेत.

जानेवारीत १, ३८३ नवीन रुग्ण आढळले. त्यातुलनेत १ ते २० फेब्रुवारीदरम्यान १,४५० नव्या रुग्णांची भर पडली.

राज्यासह औरंगाबाद जिल्ह्यातही पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना पहायला मिळत आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना संक्रमित रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. यापाठीमागे दुसरी लाट, कोरोनाचा नवीन स्ट्रेन असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. विदर्भात ये- जा होणाऱ्यांची संख्या पाहता औरंगाबाद जिल्ह्यातही ही भीती व्यक्त होत आहे. मात्र, नवीन स्ट्रेन नसल्याचा आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे कोणतीही चिंता करण्याची गरज नाही, मात्र, खबरदारी घेणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट केले आहे.

----

नवीन स्ट्रेन नाही

कोरोनाचा नवीन स्ट्रेन नाही, पण नवीन स्ट्रेन असो की जुना, खबरदारी यापूर्वी जी घेतली आहे, तीच आताही घ्यायची आहे. नागरिकांनी मास्क वापरावा, वारंवार हात धुवावेत. सोशल डिस्टन्सचे पालन करावे. मोठी गर्दी होईल, असा लग्नसोहळा टाळावा.

-डॉ. स्वप्निल लाळे, आरोग्य उपसंचालक

जानेवारीत आढळलेले रुग्ण-१,३८३

फेब्रुवारीत आतापर्यंत आढळलेले रुग्ण-१,४५०