शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
3
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
4
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
5
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
6
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
7
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
8
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
9
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
10
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
11
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
12
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
13
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
14
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
15
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

अर्ध्याहून अधिक झाडे जळाली

By admin | Updated: June 9, 2017 00:04 IST

परभणी : गतवर्षी पावसाळ्यात मोठा गाजावाजा करुन लावलेल्या झाडांपैकी अर्ध्याहून अधिक झाडे जळाली

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : गतवर्षी पावसाळ्यात मोठा गाजावाजा करुन लावलेल्या झाडांपैकी अर्ध्याहून अधिक झाडे जळाली असल्याचे ‘लोकमत’ने गुरुवारी केलेल्या पाहणीत दिसून आले. राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी पावसाळ्यामध्ये वृक्ष लागवड मोहीम राबविली जाते. मागील वर्षी द्विकोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत शासनाच्या प्रत्येक विभागाला झाडे लावण्याचे उद्दिष्ट दिले होते. परंतु, वृक्षारोपणासंदर्भात गांभीर्याने प्रयत्न होत नसल्याचेच दिसत आहे. त्यामुळे पुढे पाठ आणि मागे सपाट अशी परिस्थिती वृक्षारोपणासंदर्भात झाली आहे. परभणी शहरात मागील वर्षी लावलेली झाडे किती जगली, याचे गुरूवारी स्टिंग आॅपरेशन केले असता लावलेल्या झाडांपैकी बहुतांश झाडे जळाल्याचेच दिसून येत आहे. मागील वर्षी १ जुलै रोजी राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालय परिसरात वृक्षारोपणाचा मुख्य कार्यक्रम घेण्यात आला. तत्कालीन पालकमंत्री दिवाकर रावते यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरावरील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांनी या ठिकाणी झाडे लावली. त्यामुळे हा परिसर काही दिवसांनी हिरवागार दिसेल, अशी अपेक्षा होती. परंतु, झाडे तर वाढली नाहीत. त्या जागी गवत मात्र मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. ७ जून रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास या परिसराची पाहणी केली असता हिरवागार होणारा हा परिसर उजाड झाल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे पालकमंत्री दिवाकर रावते यांनी स्वत: लावलेले झाड देखील जळाले आहे. तसेच वन विभागाचे प्रमुख अधिकारी, महापालिकेचे आयुक्त यांनी लावलेली झाडे या ठिकाणी जळाल्याचे दिसून आले. मागील वर्षी वृक्षारोपण झालेल्या ठिकाणी केवळ लोखंडी ट्री गार्ड वृक्षारोपणाची साक्ष देत आहेत. परंतु, या ट्री गार्डमध्ये झाडच नसल्याचे पहावयास मिळाले. त्यामुळे वृक्षारोपणाचे काम गाजावाजा करीत होत असले तरी संवर्धनाकडे मात्र पाठ फिरवली जात आहे. परिणामी वृक्षारोपण मोहीम म्हणजे पुढे पाठ मागे सपाट अशी ठरु लागली आहे. जुना पेडगावरोड भागातील झाडांची पाहणी केली असता अनेक झाडे बऱ्यापैकी वाढली असली तरी ८ ते १० झाडे वाळली आहेत. या ठिकाणी प्रत्येक झाडाला ट्री गार्ड लावण्यात आले होते. परंतु, ट्री गार्डच चोरीला गेल्याचे या पाहणीत दिसून आले. अशीच परिस्थिती जेल कॉर्नर ते नानलपेठ रस्त्यावर पहावयास मिळाली. या रस्त्यावरील गटविकास अधिकाऱ्यांच्या निवासस्थानासमोर ट्री गार्डसह झाडेही गायब झाल्याचे पहावयास मिळाले. त्यामुळे वृक्षारोपण मोहिमांवर होणारा खर्च केवळ उदासीनतेमुळे दरवर्षी वाया जात असून परभणी जिल्ह्याचे हरित स्वप्न स्वप्नच राहत आहे.