शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
2
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
3
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
4
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
5
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
6
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
7
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
8
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
9
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
10
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
11
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
12
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
13
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
14
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
15
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
16
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
17
U19 Asia Cup 2025 : कोण आहे Aaron George? पाक विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियासाठी ठरला ‘संकटमोचक’
18
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
19
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
20
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
Daily Top 2Weekly Top 5

आणखी ९० लाखांची औषधी झाली कालबाह्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 00:21 IST

जिल्हा सामान्य रुग्णालयात तब्बल ५८ लाख रुपयांची औषधी कालबाह्य झाल्याचा धक्कादायक अहवाल मागील महिन्यात शासनाच्या भांडार तपासणी पथकाने आरोग्य उपसंचालकांना देऊन एकच खळबळ उडवून दिली.

मुजीब देवणीकर ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्हा सामान्य रुग्णालयात तब्बल ५८ लाख रुपयांची औषधी कालबाह्य झाल्याचा धक्कादायक अहवाल मागील महिन्यात शासनाच्या भांडार तपासणी पथकाने आरोग्य उपसंचालकांना देऊन एकच खळबळ उडवून दिली. या औषध खरेदी घोटाळ्याचा पर्दाफाश ‘लोकमत’ने मंगळवारच्या अंकात करताच आरोग्य विभागाची झोपच उडाली आहे. ‘लोकमत’ने या प्रकरणाच्या आणखी खोलात जाऊन माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला असता दुसरी खळबळजनक बाब समोर आली. आणखी ९० लाख रुपयांची औषधी कालबाह्य झालेली आहे. ही औषधी लपवून ठेवण्यात आली असून, भरारी पथकासमोर या औषधीची कागदपत्रेच सादर करण्यात आलेली नाहीत.जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयांसाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात औषधी पाठविण्यात येते. विभागनिहायही काही औषधी खरेदी करण्याचे अधिकार संबंधित अधिकाºयांना शासनाने दिलेले आहेत. आमखास मैदान येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाºयांनी चिकलठाणा येथील २०० खाटांच्या हॉस्पिटलसाठी मोठ्या प्रमाणात औषधी खरेदी करून ठेवल्याचे समोर आले आहे. ही औषधी कालबाह्यही झाली आहे. त्यामुळे शासनाला तब्बल दीड कोटी रुपयांना चुना लागला आहे.लेखा कोषागार कार्यालयातील एका पथकाला आपल्या विभागातील कोणतेही शासकीय भांडार तपासण्याचे अधिकार आहे. शासन आदेशानुसार हे पथक संबंधित विभागाला कोणतीही पूर्वसूचना न देता भांडार विभागाची तपासणी करीत असते. मागील महिन्यात या कार्यालयातील भरारी पथकाने आमखास येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या भांडार विभागाची अचानक झाडाझडती घेतली. त्यात दीड कोटी रुपयांची औषधी कालबाह्य झाल्याचे पथकासमोर आले. हे दृश्य पाहून पथकही चक्रावले. पथकातील कर्मचाºयांनी प्राथमिक चौकशी केली असता ५८ लाख रुपयांची औषधी कालबाह्य झाल्याचे समोर आले.रेकॉर्डच केले गायबकोणत्याही भांडार विभागात लाइव्ह स्टॉक आणि डेड स्टॉक रजिस्टर मेन्टेन करण्याची पद्धत असते. जिल्हा सामान्य रुग्णालयातील भांडार विभागाने असे काहीच केलेले नाही. कोणत्या रुग्णालयाला आजपर्यंत किती औषधी पाठविली, याचेही रेकॉर्ड नाही. भांडार विभागात एकूण दीड कोटी रुपयांची औषधी कालबाह्य झालेली आहे.याच्या चौकशीसाठी कागदपत्रांची वारंवार मागणी केल्यानंतरही भरारी पथकाला कागदपत्रे देण्यात आली नाहीत. हे सर्व रेकॉर्ड अधिकारी व कर्मचाºयांनी गायब केल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.उच्चस्तरीय चौकशीची गरजदीड कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आल्यानंतरही आरोग्य उपसंचालक, मुंबई येथील आरोग्य विभाग अजूनही हे प्रकरण गांभीर्याने हाताळायला तयार नाही. मागील तीन दिवसांपासून फक्त चौकशीचा फार्स मांडण्यात आला आहे. दोषींवर कारवाई करणारच, असा आव आणण्यात येत आहे. सर्व वस्तुस्थिती पाण्यासारखी समोर असतानाही काही अधिकारी व कर्मचाºयांना वाचविण्यासाठी स्थानिक स्तरावर जोरदार प्रयत्न सुरू आहेत. आरोग्य विभागाने मुंबईच्या अधिकाºयांना पाचारण करून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.