शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
4
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
5
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
6
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
7
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
8
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
9
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
10
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
11
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
12
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
13
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
14
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
15
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
16
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
17
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
18
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
19
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
20
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
Daily Top 2Weekly Top 5

कडक निर्बंधांमध्ये रमजान महिन्याला होणार सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:04 IST

औरंगाबाद : मागील वर्षी कडक लॉकडाऊनमध्ये पवित्र रमजान महिना गेला. मुख्य ईदगाहमध्ये ईदची नमाजही अदा करता आली नाही. याचे ...

औरंगाबाद : मागील वर्षी कडक लॉकडाऊनमध्ये पवित्र रमजान महिना गेला. मुख्य ईदगाहमध्ये ईदची नमाजही अदा करता आली नाही. याचे शल्य मुस्लिम बांधवांमध्ये असताना यंदाही रमजान महिना लॉकडाऊनमध्ये जाणार की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनामुळे शासनाने निर्बंध टाकले असले तरी रात्री विशेष नमाजासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी मुस्लिम संघटनांकडून जोर धरत आहे.

चंद्रदर्शन झाल्यानंतर १४ एप्रिलपासून पवित्र रमजान महिन्याला सुरुवात होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी मार्च महिन्यातच लॉकडाऊन लावण्यात आले होते. मे महिन्यात मुस्लिम बांधवांनी पाच वेळा घरातच नमाज अदा केली. महिनाभराचे उपवास ठेवल्यानंतर मुस्लिम बांधव शहरातील वेगवेगळ्या ईदगाहमध्ये जाऊन ईदची मुख्य नमाज अदा करतात. मागील वर्षी कोरोनामुळे मुस्लिम बांधवांनी ईदची मुख्य नमाज ईदगाहमध्ये जाऊन अदा केली नाही. यंदाही मार्च महिना सुरू होताच कोरोनाचा उद्रेक सुरू झाला आहे. शहर आणि ग्रामीण भागात जवळपास दीड हजार रुग्ण दररोज आढळून येत आहेत. चिंताजनक बाब म्हणजे घाटी आणि खाजगी रुग्णालयांमध्ये चोवीस तासांमध्ये पंचवीस ते तीस नागरिकांचा मृत्यू होत आहे. राज्यात सर्वत्र अशीच परिस्थिती असल्यामुळे राज्य शासनाने कडक निर्बंध जाहीर केले. सर्व धार्मिक स्थळे बंद करण्यात आली आहेत. पवित्र रमजान महिना लॉकडाऊनमध्येच जाणार की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. लॉकडाऊन मुद्द्यावर मुस्लिम बांधवांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

तरावीह पढण्याची परवानगी द्या

दिवसभर उपवास ठेवल्यानंतर रात्री शहरातील विविध मशिदींमध्ये पवित्र धर्मग्रंथाचे वाचन नमाजमध्ये करण्यात येते. रात्रीच्या तरावीहसाठी परवानगी द्या, अशी मागणी शहरातील मुस्लिम संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी शासनाकडे यासंदर्भात मागणी केली. मात्र, शासनाने यासंदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही.

व्यापाऱ्यांनी घेतला धसका

मुस्लिम बांधव रमजान महिन्यात मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. औरंगाबाद शहरात कोट्यवधी रुपयांची उलाढाल रमजान ईदच्या पूर्वी होते. रमजान महिन्यात व्यापारी मोठ्या प्रमाणात माल ठेवतात. मागील वर्षी व्यापाऱ्यांचा एक सीजन बुडाला. यंदाही मागील वर्षात सारखीच परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी चांगलाच धसका घेतला आहे.