शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

कडक निर्बंधांमध्ये रमजान महिन्याला होणार सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:04 IST

औरंगाबाद : मागील वर्षी कडक लॉकडाऊनमध्ये पवित्र रमजान महिना गेला. मुख्य ईदगाहमध्ये ईदची नमाजही अदा करता आली नाही. याचे ...

औरंगाबाद : मागील वर्षी कडक लॉकडाऊनमध्ये पवित्र रमजान महिना गेला. मुख्य ईदगाहमध्ये ईदची नमाजही अदा करता आली नाही. याचे शल्य मुस्लिम बांधवांमध्ये असताना यंदाही रमजान महिना लॉकडाऊनमध्ये जाणार की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनामुळे शासनाने निर्बंध टाकले असले तरी रात्री विशेष नमाजासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी मुस्लिम संघटनांकडून जोर धरत आहे.

चंद्रदर्शन झाल्यानंतर १४ एप्रिलपासून पवित्र रमजान महिन्याला सुरुवात होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी मार्च महिन्यातच लॉकडाऊन लावण्यात आले होते. मे महिन्यात मुस्लिम बांधवांनी पाच वेळा घरातच नमाज अदा केली. महिनाभराचे उपवास ठेवल्यानंतर मुस्लिम बांधव शहरातील वेगवेगळ्या ईदगाहमध्ये जाऊन ईदची मुख्य नमाज अदा करतात. मागील वर्षी कोरोनामुळे मुस्लिम बांधवांनी ईदची मुख्य नमाज ईदगाहमध्ये जाऊन अदा केली नाही. यंदाही मार्च महिना सुरू होताच कोरोनाचा उद्रेक सुरू झाला आहे. शहर आणि ग्रामीण भागात जवळपास दीड हजार रुग्ण दररोज आढळून येत आहेत. चिंताजनक बाब म्हणजे घाटी आणि खाजगी रुग्णालयांमध्ये चोवीस तासांमध्ये पंचवीस ते तीस नागरिकांचा मृत्यू होत आहे. राज्यात सर्वत्र अशीच परिस्थिती असल्यामुळे राज्य शासनाने कडक निर्बंध जाहीर केले. सर्व धार्मिक स्थळे बंद करण्यात आली आहेत. पवित्र रमजान महिना लॉकडाऊनमध्येच जाणार की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. लॉकडाऊन मुद्द्यावर मुस्लिम बांधवांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

तरावीह पढण्याची परवानगी द्या

दिवसभर उपवास ठेवल्यानंतर रात्री शहरातील विविध मशिदींमध्ये पवित्र धर्मग्रंथाचे वाचन नमाजमध्ये करण्यात येते. रात्रीच्या तरावीहसाठी परवानगी द्या, अशी मागणी शहरातील मुस्लिम संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी शासनाकडे यासंदर्भात मागणी केली. मात्र, शासनाने यासंदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही.

व्यापाऱ्यांनी घेतला धसका

मुस्लिम बांधव रमजान महिन्यात मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. औरंगाबाद शहरात कोट्यवधी रुपयांची उलाढाल रमजान ईदच्या पूर्वी होते. रमजान महिन्यात व्यापारी मोठ्या प्रमाणात माल ठेवतात. मागील वर्षी व्यापाऱ्यांचा एक सीजन बुडाला. यंदाही मागील वर्षात सारखीच परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी चांगलाच धसका घेतला आहे.