शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
5
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
6
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
7
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
8
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
9
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
10
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
11
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
12
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
13
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
14
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
15
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
17
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
18
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
19
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

दुष्काळासाठी देखरेख समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 19:41 IST

नैसर्गिक परिस्थितीमुळे अथवा अन्य कारणामुळे निर्माण होणाºया दुष्काळी परिस्थितीवर नजर ठेवण्यासाठी आता जिल्ह्यात दुष्काळ देखरेख समितीची स्थापना करण्यात आली असून, ही समिती प्रत्येक आठवड्यात परिस्थितीचे मूल्यांकन करुन त्याचा अहवाल राज्य शासनाला पाठविणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : नैसर्गिक परिस्थितीमुळे अथवा अन्य कारणामुळे निर्माण होणाºया दुष्काळी परिस्थितीवर नजर ठेवण्यासाठी आता जिल्ह्यात दुष्काळ देखरेख समितीची स्थापना करण्यात आली असून, ही समिती प्रत्येक आठवड्यात परिस्थितीचे मूल्यांकन करुन त्याचा अहवाल राज्य शासनाला पाठविणार आहे.निसर्गाच्या अवकृपेमुळे राज्यात मागील काही वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. याचा सर्वाधिक फटका कृषी क्षेत्राला बसतो. दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करताना अनेक वेळा आकडेवारीचा गोंधळ निर्माण होत असे़ अशा वेळी दुष्काळाची पारदर्शक परिस्थिती समोर येत नव्हती़ या सर्व परिस्थितीवर उपाय करण्यासाठी राज्य शासनाने आता दुष्काळ देखरेख समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला आहे़ या समितीमध्ये विविध विभागांमधील १२ तज्ज्ञ सदस्यांचा समावेश असेल़ ही समिती प्रत्येक आठवड्याला जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीच्या अनुषंगाने मूल्यांकन करणार आहे़ पर्जन्यमान, वनस्पती निर्देशांक, मृदू आर्द्रता निर्देशांक, जलविषयक निर्देशांक, पिकांचे क्षेत्रीय सर्वेक्षण आदी बाबींचा शास्त्रीय दृष्टीकोनातून अभ्यास करीत त्याचे विश्लेषण करण्यात येणार आहे़ त्यानंतर तालुक्यात, गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे का किंवा नाही, या विषयीचे मूल्यांकन करणार आहे़ मूल्यांकनाचा हा अहवाल प्रत्येक आठवड्याला राज्यस्तरीय देखरेख समितीला सादर केला जाणार असून, या अहवालावरूनच दुष्काळाचे मूल्यमापन करून शासन उपाययोजना करणार आहे़दुष्काळी परिस्थितीवर देखरेख ठेवण्यासाठी राज्य शासनाने समिती गठीत केल्यामुळे आता दुष्काळ जाहीर करण्याची परिमाने देखील बदलली आहेत़ केवळ पिकांची उत्पादकता हा एकमेव परिमाण न मानता सर्व परिस्थितीचा शास्त्रीय अभ्यास करून दुष्काळाचे मूल्यमापन केले जाणार आहे़ त्यामुळे पात्र लाभार्थ्यांपर्यंत शासनाची मदत पोहचविण्यास सोयीचे होणार आहे़