शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
5
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
6
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
7
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
8
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
9
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
10
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
11
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
12
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
13
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
14
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
15
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
16
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
17
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
18
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
19
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
20
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

मनी पेज/भारत

By | Updated: November 28, 2020 04:00 IST

भारताच्या निर्यातीला बसू शकतो फटका नवी दिल्ली : चीनच्या नेतृत्वाखालील १५ आशियाई देशांच्या व्यापार संघटनेमुळे भारताच्या निर्यातीला फटका बसू ...

भारताच्या निर्यातीला बसू शकतो फटका

नवी दिल्ली : चीनच्या नेतृत्वाखालील १५ आशियाई देशांच्या व्यापार संघटनेमुळे भारताच्या निर्यातीला फटका बसू शकतो, असे जाणकारांचे मत आहे.

चीनच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या १५ देशांच्या ‘विभागीय सर्वंकष आर्थिक भागीदारी’ (आरसीईपी) या संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय गेल्या वर्षी भारताने घेतला होता. जाणकारांच्या मते, ही संघटना दहा प्रमुख क्षेत्रांतील भारताची गुंतवणूक खेचून घेण्याचा धोका आहे. अभियांत्रिकी वस्तू, रसायने, औषधी आणि इलेक्ट्रॉिनिक्स यांचा त्यात समावेश आहे. यातील अभियांत्रिकी उत्पादनांच्या निर्यातीचा देशाच्या एकूण वस्तू निर्यातीतील वाटा तब्बल २५ टक्के आहे.

नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूरचे वरिष्ठ संशोधक अमितेंदू पलित यांनी सांगितले की, जागतिक पुरवठा साखळीतील भारताच्या योगदानाच्या दृष्टीने आरसीईपी प्रतिकूल सिद्ध होईल. आरसीईपीअंतर्गत व्यापाराचा खर्च लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. सदस्य देशांसाठी हे मोठ्या प्रमाणात लाभदायक ठरेल.

सूत्रांनी सांगितले की, या व्यापार करारामुळे सदस्य देशांतील व्यापारी वस्तूंच्या दरात ९२ टक्क्यांपर्यंत कपात होण्याची शक्यता आहे. भारत सदस्य असलेल्या ‘एफटीए’च्या तुलनेत ही कपात खूपच अधिक आहे. एफटीएमध्ये जपान आणि दक्षिण कोरिया यांचा समावेश आहे.

सूत्रांनी सांगितले की, आरसीईपी हा शेतकऱ्यांसाठीचा जगातील सर्वात मोठा मुक्त व्यापार करार आहे. पंतप्रधान मोदी यांनी या करारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तेव्हा, तो भारतातील गरिबांचा विजय असल्याचे सांगण्यात येत होते. तथापि, कोरोना विषाणूच्या साथीनंतर अर्थव्यवस्थेची स्थिती कमालीची बिघडली आहे. अशा परिस्थितीत आरसीईपी आंतरराष्ट्रीय व्यापारात उपयुक्त ठरणार असल्याचे मानले जात आहे. सदस्य राष्ट्रांसाठी आंतरराष्ट्रीय व्यापारातील अडथळे दूर करण्याचे काम हा करार करील.

................