शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

मनी पेज/भारत

By | Updated: November 28, 2020 04:00 IST

भारताच्या निर्यातीला बसू शकतो फटका नवी दिल्ली : चीनच्या नेतृत्वाखालील १५ आशियाई देशांच्या व्यापार संघटनेमुळे भारताच्या निर्यातीला फटका बसू ...

भारताच्या निर्यातीला बसू शकतो फटका

नवी दिल्ली : चीनच्या नेतृत्वाखालील १५ आशियाई देशांच्या व्यापार संघटनेमुळे भारताच्या निर्यातीला फटका बसू शकतो, असे जाणकारांचे मत आहे.

चीनच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या १५ देशांच्या ‘विभागीय सर्वंकष आर्थिक भागीदारी’ (आरसीईपी) या संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय गेल्या वर्षी भारताने घेतला होता. जाणकारांच्या मते, ही संघटना दहा प्रमुख क्षेत्रांतील भारताची गुंतवणूक खेचून घेण्याचा धोका आहे. अभियांत्रिकी वस्तू, रसायने, औषधी आणि इलेक्ट्रॉिनिक्स यांचा त्यात समावेश आहे. यातील अभियांत्रिकी उत्पादनांच्या निर्यातीचा देशाच्या एकूण वस्तू निर्यातीतील वाटा तब्बल २५ टक्के आहे.

नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूरचे वरिष्ठ संशोधक अमितेंदू पलित यांनी सांगितले की, जागतिक पुरवठा साखळीतील भारताच्या योगदानाच्या दृष्टीने आरसीईपी प्रतिकूल सिद्ध होईल. आरसीईपीअंतर्गत व्यापाराचा खर्च लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. सदस्य देशांसाठी हे मोठ्या प्रमाणात लाभदायक ठरेल.

सूत्रांनी सांगितले की, या व्यापार करारामुळे सदस्य देशांतील व्यापारी वस्तूंच्या दरात ९२ टक्क्यांपर्यंत कपात होण्याची शक्यता आहे. भारत सदस्य असलेल्या ‘एफटीए’च्या तुलनेत ही कपात खूपच अधिक आहे. एफटीएमध्ये जपान आणि दक्षिण कोरिया यांचा समावेश आहे.

सूत्रांनी सांगितले की, आरसीईपी हा शेतकऱ्यांसाठीचा जगातील सर्वात मोठा मुक्त व्यापार करार आहे. पंतप्रधान मोदी यांनी या करारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तेव्हा, तो भारतातील गरिबांचा विजय असल्याचे सांगण्यात येत होते. तथापि, कोरोना विषाणूच्या साथीनंतर अर्थव्यवस्थेची स्थिती कमालीची बिघडली आहे. अशा परिस्थितीत आरसीईपी आंतरराष्ट्रीय व्यापारात उपयुक्त ठरणार असल्याचे मानले जात आहे. सदस्य राष्ट्रांसाठी आंतरराष्ट्रीय व्यापारातील अडथळे दूर करण्याचे काम हा करार करील.

................