शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

मनी पेज/भारत

By | Updated: November 28, 2020 04:00 IST

भारताच्या निर्यातीला बसू शकतो फटका नवी दिल्ली : चीनच्या नेतृत्वाखालील १५ आशियाई देशांच्या व्यापार संघटनेमुळे भारताच्या निर्यातीला फटका बसू ...

भारताच्या निर्यातीला बसू शकतो फटका

नवी दिल्ली : चीनच्या नेतृत्वाखालील १५ आशियाई देशांच्या व्यापार संघटनेमुळे भारताच्या निर्यातीला फटका बसू शकतो, असे जाणकारांचे मत आहे.

चीनच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या १५ देशांच्या ‘विभागीय सर्वंकष आर्थिक भागीदारी’ (आरसीईपी) या संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय गेल्या वर्षी भारताने घेतला होता. जाणकारांच्या मते, ही संघटना दहा प्रमुख क्षेत्रांतील भारताची गुंतवणूक खेचून घेण्याचा धोका आहे. अभियांत्रिकी वस्तू, रसायने, औषधी आणि इलेक्ट्रॉिनिक्स यांचा त्यात समावेश आहे. यातील अभियांत्रिकी उत्पादनांच्या निर्यातीचा देशाच्या एकूण वस्तू निर्यातीतील वाटा तब्बल २५ टक्के आहे.

नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूरचे वरिष्ठ संशोधक अमितेंदू पलित यांनी सांगितले की, जागतिक पुरवठा साखळीतील भारताच्या योगदानाच्या दृष्टीने आरसीईपी प्रतिकूल सिद्ध होईल. आरसीईपीअंतर्गत व्यापाराचा खर्च लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. सदस्य देशांसाठी हे मोठ्या प्रमाणात लाभदायक ठरेल.

सूत्रांनी सांगितले की, या व्यापार करारामुळे सदस्य देशांतील व्यापारी वस्तूंच्या दरात ९२ टक्क्यांपर्यंत कपात होण्याची शक्यता आहे. भारत सदस्य असलेल्या ‘एफटीए’च्या तुलनेत ही कपात खूपच अधिक आहे. एफटीएमध्ये जपान आणि दक्षिण कोरिया यांचा समावेश आहे.

सूत्रांनी सांगितले की, आरसीईपी हा शेतकऱ्यांसाठीचा जगातील सर्वात मोठा मुक्त व्यापार करार आहे. पंतप्रधान मोदी यांनी या करारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तेव्हा, तो भारतातील गरिबांचा विजय असल्याचे सांगण्यात येत होते. तथापि, कोरोना विषाणूच्या साथीनंतर अर्थव्यवस्थेची स्थिती कमालीची बिघडली आहे. अशा परिस्थितीत आरसीईपी आंतरराष्ट्रीय व्यापारात उपयुक्त ठरणार असल्याचे मानले जात आहे. सदस्य राष्ट्रांसाठी आंतरराष्ट्रीय व्यापारातील अडथळे दूर करण्याचे काम हा करार करील.

................