शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

सरपंचावर पैशांच्या अपहाराचा ठपका!

By admin | Updated: August 7, 2014 00:16 IST

आखाडा बाळापूर : आश्रमशाळेला पाणीपुरवठा करण्याच्या बदल्यात मिळणारी अधिग्रहणाची पावणेचार लाख रुपयांची रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा केली

आखाडा बाळापूर : आश्रमशाळेला पाणीपुरवठा करण्याच्या बदल्यात मिळणारी अधिग्रहणाची पावणेचार लाख रुपयांची रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा केली न करता ती परस्पर हडप केल्याचा ठपका एका सरपंचावर ठेवण्यात आला आहे. कळमनुरी पंचायत समितीने नेमलेल्या चौकशी समिती पथकाने कळमनुरी तालुक्यातील बेलथर येथील सरपंचावर ठेवला आहे. कळमनुरी तालुक्यातील गोटेवाडी येथील आदिवासी आश्रमशाळेला सन २००९- २०१३ पर्यंत बेलथर येथील ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा केला आहे. या अधिग्रहणापोटी शाळेने ३ लाख ९२ हजार ८९ रुपये सरपंचास अदा केले होती. ही रक्कम सरपंचाने ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा न करता परस्पर उचलून खर्च केली. या रकमेची व आश्रमशाळेसाठी ठक्कर बापा योजनेंतर्गत मिळालेल्या साडेपाच लाख रुपयांच्या विहिरीची घोषणा बेलथर येथील माजी ग्रा. पं. सदस्य राजू पाईकराव याने माहिती अधिकारांतर्गत उघड केली. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी पं. स. समोर ३ जून रोजी उपोषण केले होते. तेव्हा बीडीओंनी विस्तार अधिकारी एस. टी. खंदारे यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक केली होती. त्यात ९ जुलै रोजी सरपंच व ग्रामसेवक यांना पाणी अधिग्रहणाच्या ३ लाख ९२ हजार ८९ रुपये खर्चाची कारणे दाखवा नोटीस बजावली. ग्रामसेवकांनी सदर रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्यावर जमाच झाली नसल्याने सचिव म्हणून खर्च करण्याचा प्रश्नच नसल्याचे सांगितले. तर ही रक्कम नाली बांधकामावर सरपंचाने खर्च केल्याचे सादर केलेल्या खुलाशात म्हटले आहे; परंतु हा खर्च कायदेशीर बाबीत बसत नसल्याने आपणास ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम ३९ प्रमाणे पदावरून बडतर्फ का करण्यात येऊ नये? असे चौकशी अधिकाऱ्याने बजावले आहे. दुसरीकडे ठक्करबापा योजनेंतर्गत मिळालेली विहिरच गायब झाल्याने ग्रामसेवक, अभियंते, कंत्राटदार, गटविकास अधिकारी या बड्यांची साखळीच आता गळाला लागणार असल्याने मागील दोन महिन्यांपासून चौकशी थंडबस्त्यात आहे. या विहिरीचीही चौकशी करण्याची मागणी असताना चौकशी करून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा रंगली आहे. ग्रामस्थांमध्ये चर्चापाईकराव यांनी माजी सरपंचाला सोडून विद्यमान सरपंचाच्याच कार्यकाळाची चौकशीसाठी उपोषण केले. मागील आठ ते नऊ वर्षांपासून परस्पर पैसे उचलून दोन्ही सरपंचांनी खर्च केले आहेत. त्यांच्या कार्यकाळाची चौकशीही व्हावी, अशी मागणी आहे. रक्कम परस्पर उचलून बेकायदेशीर खर्च केल्याने सरपंचाच्या अपात्रतेचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविणार आहे. विहिरीविषयीचे प्रकरण उपअभियंत्याकडे पाठवले आहे. - एस.टी. खंदारे, चौकशी अधिकारी कळमनुरी.उचललेली रक्कम बेलथरच्या विकास कामांसाठी खर्च केली आहे. त्यामध्ये नालीचे बांधकाम केले आहे. त्या कामात कुठल्याही प्रकारचा अपहार केलेला नाही. - रामराव खंदारे, सरपंच, बेलथर, ता. कळमनुरी