शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

मुद्रा योजनेचे कर्ज तर सोडाच, अर्जही मिळेनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 00:07 IST

‘गरजेनुसार कर्ज, अपेक्षेनुसार प्रगती’ अशा जाहिराती प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या केल्या जात आहेत. प्रत्यक्षस्थिती मात्र, वेगळीची आहे. मुद्रा कर्ज सोडाच; पण अर्जही देण्यास बँकेचे अधिकारी टाळाटाळ करीत आहेत. यामुळे बेरोजगार युवक बँकांमध्ये खेटे मारून वैतागले आहेत. काहींनी तर आता मुद्रा कर्ज घेण्याचा नादही सोडून दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘गरजेनुसार कर्ज, अपेक्षेनुसार प्रगती’ अशा जाहिराती प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या केल्या जात आहेत. प्रत्यक्षस्थिती मात्र, वेगळीची आहे. मुद्रा कर्ज सोडाच; पण अर्जही देण्यास बँकेचे अधिकारी टाळाटाळ करीत आहेत. यामुळे बेरोजगार युवक बँकांमध्ये खेटे मारून वैतागले आहेत. काहींनी तर आता मुद्रा कर्ज घेण्याचा नादही सोडून दिला आहे. उल्लेखनीय, म्हणजे यावर निगराणी ठेवणा-या अग्रणी बँकेकडेही जिल्हानिहाय व शाखानिहाय कर्जवाटप केल्याची माहिती उपलब्ध नसल्याचे सत्य समोर आले आहे.शासनाच्या विविध योजनांतर्गत बेरोजगारांना रोजगारासाठी जिल्हा उद्योग केंद्र, विविध महामंडळे, बँकांमधून कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. मात्र, तिथून कर्जाची रक्कम लवकर हाती पडत नव्हती. हा तिढा सोडविण्यासाठी पंतप्रधान मुद्रा कर्ज योजना जाहीर करण्यात आली. कमीत कमी वेळात कर्ज पुरवठा होऊन बेरोजगारांनी उद्योग-व्यवसाय सुरू करावा हा त्याच्यामागील हेतू होय. या शिशू योजनेंंतर्गत ५० हजारांपर्यंत, किशोर योजनेंतर्गत ५० हजार ते ५ लाखांपर्यंत, तर तरुण योजनेंतर्गत ५ लाखांपासून १० लाखांपर्यंत कर्ज दिले जाते. राष्ट्रीयीकृत व खाजगी बँकांवर मुद्रा कर्ज देण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे. दोन वर्षांच्या कालावधीत बँकांनी मुद्रा कर्ज पुरवठा केला; पण नंतर कर्ज सोडाच; पण अर्जही देण्यास टाळाटाळ केली जाऊ लागली. अग्रणी बँक असलेल्या बँक आॅफ महाराष्ट्राकडे सर्व बँकांनी मुद्रा कर्ज वाटपासंदर्भात माहिती देणे अपेक्षित आहे. मात्र, अन्य बँका या अग्रणी बँकेला माहिती कळवत नसल्याचे आढळून आले आहे. यासंदर्भात नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात मुद्रा बँक योजना समन्वय समितीची बैठक झाली. या बैठकीत बँकेचे अधिकारी औरंगाबाद जिल्ह्यातील किती बँकांनी किती मुद्रा कर्ज वाटप केले याची माहिती देऊ शकले नाहीत. बँकांना शाखानिहाय मुद्रा बँक योजना उद्दिष्टपूर्तीचा अहवाल मागवून तो पुढील बैठकीत सादर करावा, असे निर्देश उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे यांनी या बैठकीत दिले. यासंदर्भात आमचे प्रतिनिधीने अग्रणी बँकेचे मुख्य व्यवस्थापक प्रदीप कुतवळ यांची भेट घेतली असता त्यांनी औरंगाबाद जिल्ह्याऐवजी संपूर्ण महाराष्ट्रात मुद्रा कर्ज वाटपाची एकूण आकडेवारी सांगितली. कारण, त्यांच्याकडेही जिल्ह्यातील बँकांच्या शाखानिहाय माहिती उपलब्ध नव्हती. विशेष म्हणजे आता कर्ज वाटपाचे उद्दिष्टपूर्ण झाले असे सांगत बँकांनी मुद्रा कर्ज वाटप करणेच बंद केले आहे. आकडेवारी दाखवणार कुठून, अशीच परिस्थिती राहिली तर ज्या हेतूने प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरू केली त्याच उद्देशालाच बँकांडून हरताळ फासला जातो की काय, अशी शंका नागरिकांच्या मनात निर्माण होऊ लागली आहे.